शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

राजकारणच भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:59 IST

‘नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस फॉर आयएएस गाइज, आपण प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत’ - वरिष्ठ शासकीय अधिकारी. ‘एक वेळ मुख्यमंत्र्यांना काढून टाकता येईल; पण आयएएस आणि आयपीएस अधिका-यांची केवळ बदलीच होऊ शकते’ - मुख्यमंत्री.

‘नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस फॉर आयएएस गाइज, आपण प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत’ - वरिष्ठ शासकीय अधिकारी. ‘एक वेळ मुख्यमंत्र्यांना काढून टाकता येईल; पण आयएएस आणि आयपीएस अधिका-यांची केवळ बदलीच होऊ शकते’ - मुख्यमंत्री.प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष मांडणाºया एका मराठी चित्रपटातील हे संवाद. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा कारभार चालविला जातो. लोकशाहीच्या रथाची ही दोन चाके. कठोर स्पर्धा परीक्षांतून अत्यंत बुद्धिमान तरुणांची निवड करून प्रशासनाची रचना होते. विविध निवडणुकांतून लोकप्रतिनिधी निवडले जातात. गेल्या ७० वर्षांचा अनुभव पाहिल्यास, या दोन्ही घटकांत फार खटके उडालेले दिसत नाहीत. त्यामुळेच जेव्हा काही घडते, तेव्हा त्याची चर्चा होते. पुणे महानगर परिवहन लिमिटेडमधून तुकाराम मुंढे यांच्या झालेल्या बदलीची चर्चा त्यामुळेच आहे. पुणे महापालिकेतील राजकारणच भारी ठरले आणि मुंढे यांची बदली झाली, असे मानले जाते. मुंढे यांनी पीएमपीच्या कारभारात राजकारण्यांचा कमी केलेला हस्तक्षेप आणि कर्मचाºयांना लावलेली शिस्त, हे कारण ठरले. पुण्यातील पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यात मुंढे यांच्या बदलीचा निर्णय झाला. अवघ्या १० महिन्यांत केलेल्या या बदलीमुळे पुणेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निमित्ताने अधिकाºयांच्या बदल्यांचे निकष काय, याचीही चर्चा होऊ लागली आहे. कायदेशीरदृष्ट्या आयएएस अधिकाºयांना ३ वर्षे एका ठिकाणी ठेवावे, असा फक्त संकेत आहे. परंतु राज्यात सुमारे ३०० आयएएस अधिकारी असून, त्यांच्या बदल्या कोठेही आणि केव्हाही मुख्यमंत्र्यांना करता येऊ शकतात. याउलट, राज्य सरकारी कर्मचाºयांच्या बदल्या ३ वर्षांपर्यंत करू नयेत, असा नियम आहे. हे डावलून बदली झाली, तर कर्मचारी मॅटमध्ये जाऊ शकतो आणि बहुतांश वेळा कर्मचाºयांच्या बाजूने निकाल लागतो. आयएएस अधिकाºयांनाही केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे (कॅट) जाता येते, परंतु कॅटकडे जाण्याची अगदीच तुरळक प्रकरणे घडलेली आहेत. याचे कारण म्हणजे, थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाण्याची मानसिकता अधिकाºयांची नसते. शिवाय, बदली ही एका अर्थाने बढतीच असते. त्यामुळे तर अधिकारी म्हणतात, ‘आजवर आम्हाला आमच्या बुद्धीने काम करून दिले असते तर...’ आणि लोकप्रतिनिधी म्हणतात, ‘शंका तुमच्या बुद्धीबाबत नाही, तर तिच्या वापराबाबत आहे. बदल्यांचे शस्त्र हातात असल्याने, तो वापर राजकारण्यांच्याच हातात आहे आणि राहणार. त्यामुळे ‘राजकारणच भारी’ हेदेखील एक कटू वास्तवच!

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस