शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणच भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:59 IST

‘नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस फॉर आयएएस गाइज, आपण प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत’ - वरिष्ठ शासकीय अधिकारी. ‘एक वेळ मुख्यमंत्र्यांना काढून टाकता येईल; पण आयएएस आणि आयपीएस अधिका-यांची केवळ बदलीच होऊ शकते’ - मुख्यमंत्री.

‘नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस फॉर आयएएस गाइज, आपण प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत’ - वरिष्ठ शासकीय अधिकारी. ‘एक वेळ मुख्यमंत्र्यांना काढून टाकता येईल; पण आयएएस आणि आयपीएस अधिका-यांची केवळ बदलीच होऊ शकते’ - मुख्यमंत्री.प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष मांडणाºया एका मराठी चित्रपटातील हे संवाद. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा कारभार चालविला जातो. लोकशाहीच्या रथाची ही दोन चाके. कठोर स्पर्धा परीक्षांतून अत्यंत बुद्धिमान तरुणांची निवड करून प्रशासनाची रचना होते. विविध निवडणुकांतून लोकप्रतिनिधी निवडले जातात. गेल्या ७० वर्षांचा अनुभव पाहिल्यास, या दोन्ही घटकांत फार खटके उडालेले दिसत नाहीत. त्यामुळेच जेव्हा काही घडते, तेव्हा त्याची चर्चा होते. पुणे महानगर परिवहन लिमिटेडमधून तुकाराम मुंढे यांच्या झालेल्या बदलीची चर्चा त्यामुळेच आहे. पुणे महापालिकेतील राजकारणच भारी ठरले आणि मुंढे यांची बदली झाली, असे मानले जाते. मुंढे यांनी पीएमपीच्या कारभारात राजकारण्यांचा कमी केलेला हस्तक्षेप आणि कर्मचाºयांना लावलेली शिस्त, हे कारण ठरले. पुण्यातील पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यात मुंढे यांच्या बदलीचा निर्णय झाला. अवघ्या १० महिन्यांत केलेल्या या बदलीमुळे पुणेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निमित्ताने अधिकाºयांच्या बदल्यांचे निकष काय, याचीही चर्चा होऊ लागली आहे. कायदेशीरदृष्ट्या आयएएस अधिकाºयांना ३ वर्षे एका ठिकाणी ठेवावे, असा फक्त संकेत आहे. परंतु राज्यात सुमारे ३०० आयएएस अधिकारी असून, त्यांच्या बदल्या कोठेही आणि केव्हाही मुख्यमंत्र्यांना करता येऊ शकतात. याउलट, राज्य सरकारी कर्मचाºयांच्या बदल्या ३ वर्षांपर्यंत करू नयेत, असा नियम आहे. हे डावलून बदली झाली, तर कर्मचारी मॅटमध्ये जाऊ शकतो आणि बहुतांश वेळा कर्मचाºयांच्या बाजूने निकाल लागतो. आयएएस अधिकाºयांनाही केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे (कॅट) जाता येते, परंतु कॅटकडे जाण्याची अगदीच तुरळक प्रकरणे घडलेली आहेत. याचे कारण म्हणजे, थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाण्याची मानसिकता अधिकाºयांची नसते. शिवाय, बदली ही एका अर्थाने बढतीच असते. त्यामुळे तर अधिकारी म्हणतात, ‘आजवर आम्हाला आमच्या बुद्धीने काम करून दिले असते तर...’ आणि लोकप्रतिनिधी म्हणतात, ‘शंका तुमच्या बुद्धीबाबत नाही, तर तिच्या वापराबाबत आहे. बदल्यांचे शस्त्र हातात असल्याने, तो वापर राजकारण्यांच्याच हातात आहे आणि राहणार. त्यामुळे ‘राजकारणच भारी’ हेदेखील एक कटू वास्तवच!

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस