शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

स्वभावाने राजकारणी कमी; पण शिस्तीच्या बाबतीत ‘कडक हेडमास्तर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:57 IST

राज्यातल्या पाणीप्रश्नापासून ते क्रिकेटपर्यंतचे त्यांचे ज्ञान अचंबित करणारे होते. विधानसभेत एकदा प्रश्नोत्तराच्या तासात एफ. एम. पिंटो हे काँग्रेसचे सदस्य क्रिकेटच्या भाषेत प्रश्न विचारत होते. त्यावर शंकरराव चव्हाण यांनीदेखील क्रिकेटच्याच भाषेत सगळी उत्तरे दिली होती.

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. महाराष्टÑाच्या भरीव योगदान देणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दूरदृष्टी असलेला नेता राज्यकारभार करताना विकास केंद्रस्थानी मानून सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे पुढच्या अनेक पिढ्यांना त्याची फळे चाखता येतात. हा वर्षानुवर्षांच्या अनुभवातून पुढे आलेला सिद्धांत आहे आणि यासाठी शंकरराव चव्हाण हे उत्तम उदाहरण आहे. अत्यंत कठोर शिस्तीचे अशी त्यांची ओळख. राज्यातल्या पाणीप्रश्नापासून ते क्रिकेटपर्यंतचे त्यांचे ज्ञान अचंबित करणारे होते. विधानसभेत एकदा प्रश्नोत्तराच्या तासात एफ. एम. पिंटो हे काँग्रेसचे सदस्य क्रिकेटच्या भाषेत प्रश्न विचारत होते. त्यावर शंकरराव चव्हाण यांनीदेखील क्रिकेटच्याच भाषेत सगळी उत्तरे दिली होती.

निरस प्रश्नोत्तराचा सामना त्यांच्या क्रिकेटच्या शैलीतील प्रश्नोत्तराने गाजला आणि स्वत: विधानसभेचे अध्यक्ष क्रिकेटप्रेमी बॅ. शेषराव वानखेडे यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले होते. असे हे शंकरराव सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील होते. ते मुख्यमंत्री असताना पोलीस उपनिरीक्षकांच्या भरतीची प्रक्रिया होणार होती. तेव्हा त्यांनी त्यासंबंधीची फाईल मंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना ‘तुमचे मत द्या’ असे सांगत दिली. शिंदे यांनी त्या फाईलचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना लक्षात आले की, ‘शेड्युल्ड कास्ट’मध्ये मेहतर, सफाई कामगार, मातंग समाजाला या निवडीत स्थान मिळायला हवे. त्यावर त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यातून मार्ग काढल्यामुळे या समाजातील तरुणांना पोलीस उपनिरीक्षक होता आले. आपण मुख्यमंत्री आहोत, आपल्यालाच सगळे कळते, असा त्यांना आव कधी नसायचा.

संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाºया जायकवाडी धरणासाठीदेखील त्यांचा आग्रही पाठपुरावा हेच मुख्य कारण होते. राज्यात ‘झिरो बजेट’ची कल्पना मांडणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या विकासासाठी आग्रही भूमिका घेण्याचा ठामपणा त्यांच्याकडे होता. ज्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यघटनेतील कलम ३७१ वरून वैधानिक विकास मंडळे स्थापन केली, तेव्हा एकमेव शंकरराव चव्हाण असे नेते होते ज्यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. राज्यात विधिमंडळ सर्वोच्च आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी करून ते राज्यपालांना देण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. राज्याच्या दीर्घकालीन वाटचालीत ते अत्यंत घातक ठरेल, असे घणाघाती भाषण त्यांनी केले होते. मात्र, त्यावेळी तो निर्णय घेतला गेला, पण पुढे त्याच शरद पवार यांना तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांना घेऊन वैधानिक मंडळांच्या निधीसाठी राज्यपाल अलेक्झांडर यांच्याकडे जाऊन बसावे लागले.

आपला तो निर्णय त्यावेळी चुकला, असे शरद पवार यांनीही नंतर मान्य केले होते. बाबरी मशिदीच्या वेळीदेखील उत्तर प्रदेश सरकारची आंदोलकांना फूस आहे, अशा बातम्या येत होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा, म्हणजे पुढचे अनुचित प्रकार रोखता येतील, असा आग्रह केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतला होता, पण तो मान्य झाला नाही. पुढचा इतिहास माहितीच आहे. दूरदृष्टी असणारे नेते म्हणूनच त्यांची ओळख होती. मुख्यमंत्री होण्याआधी त्यांचा पेहराव धोतर, झब्बा आणि टोपी असा असायचा. मुख्यमंत्री झाल्यानंतर जोधपुरी सुटात ते वावरत. मंत्रालयात सगळ्या मंत्र्यांनी सकाळी साडेनऊ वाजता आलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. अत्यंत साधेपणा हा त्यांचा विशेष गुण होता. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांना मुंबईत राहण्यासाठी घर नव्हते. तेव्हा ते संपूर्ण परिवारासह आकाशवाणी आमदार निवासात राहायला गेले. माजी मुख्यमंत्री आमदार निवासाच्या एका खोलीत राहतात, अशा बातम्या आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना बाबूलनाथ येथे घर दिले. राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर एका खोलीत राहणारे एकमेव मुख्यमंत्री असा उल्लेख शंकरराव चव्हाण यांच्या नावावर आहे. राज्याच्या विकासाची जाण असणाºया या नेत्याची आज जयंती. यानिमित्ताने लोकमत परिवारातर्फे त्यांना विनम्र अभिवादन.

टॅग्स :Politicsराजकारण