शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

राजकीय उनाडपणा

By admin | Updated: December 19, 2015 03:48 IST

लोकसभा आणि राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी विशिष्ट राजकीय पक्षांशी संबंधित असतात आणि म्हणूनच त्या पदांपर्यंत पोहोचतात हे वास्तव असले तरी त्यांनी एकदा का

लोकसभा आणि राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी विशिष्ट राजकीय पक्षांशी संबंधित असतात आणि म्हणूनच त्या पदांपर्यंत पोहोचतात हे वास्तव असले तरी त्यांनी एकदा का हे पद ग्रहण केले की सर्वपक्षसमभाव या न्यायाने कारभार पाहावा अशी अपेक्षा असते. पण ही अपेक्षा सहसा पूर्ण होत नाही. राज्यपालाचे पद खरे तर याहून फार वेगळे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून हे पददेखील राजकीय परंपरेतूनच वाटले जात असल्याने या पदावरील लोकदेखील आपला राजकीय अभिनिवेश बाजूला सारु शकत नाहीत व स्वपक्षीय धोरणे राबवू पाहातात हे कितीही गैर आणि कटू असले तरी तेच वास्तव आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल राजखोवा हे त्याचे अगदी ताजे उदाहरण. तिथे काँग्रेसची सत्ता असून नबाम तुकी हे मुख्यमंत्री आहेत. विरोधात असलेल्या भाजपाच्या ११ सदस्यांनी काँग्रेसच्या २२ बंडखोरांना हाताशी धरुन आधी तेथील विधानसभेचे अध्यक्ष नेबाम रेबिया यांच्याविरुद्ध महाभियोग चालवून त्यांना बरखास्त केले व नंतर मुख्यमंत्र्यांची राजवटदेखील उलथवून लावली. त्या बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून उपाध्यक्ष नोर्बू थोंगडॉक यांनी काम पाहिले. पण तत्पूर्वी रेबिया यांनी विधानसभेच्या इमारतीला टाळे ठोकल्यामुळे महाभियोगाची आणि सरकार बरखास्तीची प्रक्रिया एका समाज मंदिरात चालवली गेली. हे सारे राज्यपाल जे.पी.राजखोवा यांच्या आशीर्वादाने झाले हे विशेष. काँग्रेसमधील बंडखोरीच्या परिणामी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशा दोहोंच्या विरोधात महाभियोगाची नोटीस जारी असताना उपाध्यक्षांनी अध्यक्षांच्या विरोधात तो चालविला. याचा सरळ अर्थ मुळात एक निवृत्त सनदी नोकर असलेल्या राजखोवा यांनी आपल्याला प्राप्त पदाचे उपकार स्मरुन भाजपाला मदत केली. आता गोहाती उच्च न्यायालयाने ही सारी प्रक्रियाच येत्या एक फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निवाडा जाहीर केला आहे. तिकडे अरुणाचलात राज्यपालांच्या आशीर्वादाने हा राजकीय उनाडपणाचा जो खेळ चालला होता त्याची तीव्र प्रतिक्रिया संसदेत उमटली आणि संसदेचे कामकाज बंद पाडले गेले. त्यात काँग्रेसचा पुढाकार होता हे उघड आहे. पण तो घेताना काँग्रेस पक्षालाही रोमेश भंडारी, कमला बेनीवाल, हंसराज भारद्वाज आदि प्रभृतींचे विस्मरण झाले असावे.