शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पेटत्या पाण्यात राजकीय निखारे

By admin | Updated: November 25, 2015 23:02 IST

पुढच्या काळातील युद्धे पाण्यावरून होतील, असे म्हटले जाते. त्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.

पुढच्या काळातील युद्धे पाण्यावरून होतील, असे म्हटले जाते. त्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी नगर-नाशिक आणि मराठवाड्यात संघर्ष पेटला, तर उजनीत पाणी सोडण्यावरून, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष निर्माण झाला आहे. उजनीत तब्बल ६४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असूनही पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. पुण्यात या विरोधात संघर्ष सुरू झाला, तरी सोलापूरमधून आंदोलन उभे राहिले नाही. यावरूनच या प्रश्नाकडे शासन पातळीवरच किती असंवदेनशीलतेने पाहिले जाते, हे दिसून येते. मुळात दुष्काळी परिस्थितीचा विचार करताना अभ्यासच केला जात नाही. त्यामुळे असे निर्णय होतात, हेच दुर्दैव आहे. जायकवाडीच्या पाण्यावरून सगळा वाद सुरू असतानाच, उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला. यासाठीची कोणतीही कारणमीमांसा दिली नाही. ६४ टीएमसी अचलसाठा वापरला जाऊ शकतो, याचा अनुभव असताना हा निर्णय झाला. पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची हाक देत न्यायालयात याचिका दाखल केल्या. मात्र, प्राधिकरणाने त्याकडे लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे, तर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालक म्हणून भूमिका निभावत जलसंधारण सचिवांना पत्र पाठवून उजनीत पाणी सोडण्याची गरज नाही, असे सांगितले होते. पुणे जिल्ह्यातील २५ धरणात मिळून आहे, त्यापेक्षा अधिक पाणी उजनीत शिल्लक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली. तरीही याबाबत प्राधिकरणाने निर्णय घेतला नाही. प्रश्न न्यायालयात आणि रस्त्यावर आला. मुळात उजनीसारख्या मोठ्या धरणांची रचना लक्षात घेणे आवश्यक आहेत. सखल भागात धरण असल्याने मृतसाठा जादा असतो. उजनीनंतर भीमेवर महाराष्ट्रात कोणतेही धरण नाही. त्यामुळे या धरणातील पाणी वापराची पद्धतीही तशीच आहे. याचा विचारच केला गेला नाही. राजकीय फायद्यासाठी निर्णय घेताना सोलापूर-पुण्यात भांडण लावून दिले. गरज असताना पुणे जिल्ह्यातून उजनीत पाणी सोडण्यात आले त्यावेळी एक स्वरही निघाला नाही; पण आता एवढ्या पातळीवर विरोध का केला जातो, याचा विचार करण्याची गरज आहे. मुळात धरणातील पाण्यावर अधिकार कोणाचा, हा प्रश्न अत्यंत सनातन आहे. पुणे जिल्ह्यातीलच कुकडी प्रणालीचे उदाहरण घेतल्यास पुणे, नगर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांपर्यंत हे पाणी जाते. पिण्यासाठी राखीव ठेवले जाते. या पाण्यासाठीही याचिकांचे युद्ध सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातून आलेल्या याचिकेवर प्राधिकरणाने खरिपासाठी १.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. पुढच्या उन्हाळ्यापर्यंत पिण्यासाठी पाणी कसे पुरवायचे, हा प्रश्न असताना खरिपाच्या आवर्तनासाठीची मागणी मान्य होते, यासारखे दुर्दैव नाही. आगामी काळ अवघड असून, पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी वापरण्याचे आव्हान सर्वांपुढे आहे. या काळात याचिकांवर निर्णय घेताना प्राधिकरणाने तज्ज्ञांचे मत घेणे आवश्यक आहे; अन्यथा आगामी काळात शासनाकडून या पद्धतीने निर्णय झाल्यास जिल्ह्यांमध्येच नव्हे, तर तालुक्यांमध्येही भांडणे लागतील. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, धरणांच्या पाण्यावर विसंबून आपली सर्व पुंजी लावून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचू शकते. उद्या धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील. एका बाजूला विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचा कलंक महाराष्ट्रावर आहे. तेच लोण शासकीय पातळीवरील चुकीच्या निर्णयांमुळे धरण क्षेत्रांतही येऊ नये, याचे भान राज्यकर्त्यांनी राखायला हवे. - विजय बाविस्कर