शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

दारूबंदीचे कवित्व!

By admin | Updated: February 25, 2017 00:01 IST

देशाच्या राजकारणामधील काही घोषणा सदासर्वकाळ चालणाऱ्या आहेत. स्व. इंदिरा गांधींनी दिलेला ‘गरिबी हटाव’ हा नारा असो, की अलीकडील नरेंद्र मोदींची ‘

देशाच्या राजकारणामधील काही घोषणा सदासर्वकाळ चालणाऱ्या आहेत. स्व. इंदिरा गांधींनी दिलेला ‘गरिबी हटाव’ हा नारा असो, की अलीकडील नरेंद्र मोदींची ‘अच्छे दिन’ ही ‘टॅग लाइन’ असो; या घोषणांच्या भूलभुलय्यामध्ये काही जण सत्ताधीश झाले; मात्र घोषणांची पूर्ती झाल्याचे कधीच दिसले नाही. अशीच एक घोषणा म्हणजे दारूबंदी ! महिलांच्या हजारो संघटना, अनेक सामाजिक कार्यकर्ते, गांधीवादी यांनी सातत्याने ही मागणी लावून धरली; मात्र संपूर्ण दारूबंदीच्या दिशेने आपण जाऊ शकलेलो नाही. या मागणीने आता तामिळनाडूतील राजकीय घडामोडीनंतर पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. अम्मा ते चिनम्मा या प्रवासात पनीरसेल्वम् यांची ‘विकेट’ गेल्यानंतर, सत्तेच्या ‘क्रीज’वर आलेल्या मुख्यमंत्री ई.के. पलाणीस्वामी यांनी सूत्रे स्वीकारली आणि राज्यातील पाचशे दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेऊन षटकार ठोकला. अण्णाद्रमुकला पुन्हा सत्ता दिल्यास दारूची किरकोळ विक्रीची दुकाने बंद करण्याची घोषणा जयललिता यांनी केली होती. मुख्यमंत्री या नात्याने पलाणीस्वामी अम्माच्या घोषणेच्या पूर्ततेच्या दिशेने निघाले आहेत. तामिळनाडूमध्ये राज्य सरकारच्या वतीनेच दारूची दुकाने चालविली जातात. राज्य सरकारला दारूविक्रीतून २६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. त्यातील ६,३०० कोटी रुपये या किरकोळ दारूविक्रीच्या दुकानांमधून मिळतो; मात्र महसुलाची पर्वा न करता, टप्प्याटप्प्याने दारूबंदीकडे वाटचाल हे पलाणीस्वामी यांचे ध्येय आहे. ज्यावेळी तामिळनाडू सरकार दारूबंदीच्या दिशेने पाऊल टाकत होते, त्याचेळी महाराष्ट्रात निवडणुकीचा फड रंगला होता. या रणधुमाळीत अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल येथे राजकीय नेत्याने दिलेल्या ओल्या पार्टीत मद्य प्राशन केल्यामुळे नऊ लोकांचा बळी गेला. त्यानंतरही मतदानाचा दिवस व त्याआधीचे दोन दिवस जाहीर करण्यात आलेले ‘ड्राय डे’ रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. न्यायालयानेही १९ फेब्रुवारीचा ‘ड्राय डे’ रद्द केला व २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवसाऐवजी, केवळ निकाल जाहीर होईपर्यंत ‘ड्राय डे’ कायम ठेवला. दारूसंदर्भातील परस्परविरोधी अशा या घटना एकाच आठवड्यात घडल्याने ‘दारू बंदी’चे कवित्व पुन्हा एकदा सुरू झाले आहे. दारूबंदीचा ठराव विधानसभेत मांडण्याचे आश्वासन देणारे आजचे विरोधक सत्तेत असताना मात्र दारूबंदीसंदर्भात उदासीन होते. सत्ताधाऱ्यांचीही तीच मानसिकता आहे. महाराष्ट्रात गत काही काळापासून गुटखाबंदी आहे; पण गुटखा मिळत नाही असे एकही ठिकाण राज्यात नाही. ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये दारू बंदी आहे, तिथेही दारू कशी मिळते, हे वर्धा नदीचे पात्र सांगते. तामिळनाडू सरकारचा आदर्श समोर ठेवत ठोस निर्णय घेऊन प्रयत्न केल्यास दारूबंदीच्या दिशेने जाता येईल; अन्यथा तामिळनाडूमधील निर्णय हा दारूबंदीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भाषणासाठी आणखी एक मुद्दा तेवढा ठरेल!