शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

महाकवी दु:खाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

मराठी काव्यपरंपरेच्या क्षितिजाला आपल्या कवितेने गवसणी घालत गूढ शब्दांआडून डोकावत ‘प्राचीन नदीपरि खोल असलेला दु:खाचा महाकवी’ अशी ओळख असलेल्या ग्रेस यांच्या १० मे रोजी झालेल्या जयंतीनिमित्त-

- विजय बाविस्कर‘मी महाकवी दु:खाचाप्राचीन नदीपरि खोल...’मराठी प्रांतात आपली वेगळी शैली निर्माण करणारे ज्येष्ठ कवी माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ ग्रेस स्वत:चे वर्णन आपल्या या काव्यपंक्तीतून करायचे. वृत्त, मात्रा, लयता अशा साचेबद्ध चौकटींना छेदत जाणिवांची मांडणी करून त्याचा अर्थ शोधण्याचे आव्हान देणारे त्यांचे काव्य प्रथम वाचनात अवघड वाटणारे; परंतु अर्थबोध झाल्यानंतर मात्र मनाचा ठाव घेणारे बनत असे. जनप्रवाहापासून कायम दूर राहिलेले असे कवी हे प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व होते.मराठी काव्यपरंपरेच्या क्षितिजाला त्यांनी आपल्या कवितेने देखणा मोरपंखी वर्ख दिला. प्रत्येक नव्या पिढीतील काव्यपे्रमींना त्यांच्या कविता अंतर्मुख करतात. मराठी कवितेची भाषाच नाही तर कविता आणि कविताप्रेमी यांच्यातील संवादाची धाटणीही या शब्दप्रभूने बदलली. ग्रेस यांची कविता मैफिलीची कविता नव्हती. व्यासपीठावर तिचे स्थान नव्हते. टाळ्यांच्या कडकडाटात, रसिकांच्या वाहवामध्ये ती आसुसलेली नव्हती. निवांतपणी प्रत्येकाने स्वत:च वाचावी आणि शब्दांच्या नितळ प्रवाहात न्हाऊन जावे, अशी त्यांची कविता म्हणजे वेदनेचा हळवा सूर आहे.ग्रेस यांच्या कविता काव्यप्रेमींपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचविल्या त्या पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी. ग्रेस आणि मंगेशकर यांचे नाते काही अनोखेच होते. ‘ग्रेस यांच्या कविता एक प्रकारचे आत्मचिंतन असल्याने मला भावतात’, असे हृदयनाथ म्हणत. मनाला स्पर्शून जाणारे शब्द मोजक्या प्रतिभावंतांच्या लेखणीतून जन्माला येतात. कवी ग्रेस यात अग्रणी होते. त्यांच्या काव्याला असलेले वेगवेगळे पदर वाचणाºया प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ दर्शविणारे असतात. त्यांच्या कवितेचे हेच तर वैशिष्ट्य आहे.‘संध्याकाळच्या कविता’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध झाला. त्यानंतर कविता आणि ललित लेखांच्या माध्यमातून त्यांनी आशयगर्भ रचना आणि शब्दांमध्ये प्रतिमांचा वापर अत्यंत सृजनशीलतेने केला. त्यामुळे ग्रेस यांचा शब्दसंचार लोकप्रियतेची दाद मिळवून गेला. नंतरच्या ‘राजपुत्र आणि डार्लिंग’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’, ‘सांजभयाच्या साजणी’ या काव्यसंग्रहांना रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘चर्चबेल’, ‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘कावळे उडाले स्वामी’, ‘ओल्या वेळूची बासरी’ या ललित लेखसंग्रहातून त्यांची असामान्य प्रतिभा समोर आली. गेयता, छंद, वृत्त यावर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. ग्रेस हे कलंदर व्यक्तिमत्त्व होते. काहिशा गूढ आणि आत्ममग्न वृत्तीमुळे रसिकांच्या मनात ग्रेस यांच्याविषयी कायमच कुतूहलाची भावना होती. ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या कवितेची व्यवस्था मी केव्हाच करून ठेवली आहे’ असे मनोगत व्यक्त करताना-‘घरभर सरणाचे पात्र सांडूनि जाईफिरुनी फिरुनी माझा वंश निर्वंश होई...या शब्दांमधून त्यांच्या अंतर्मनातील वेदना समोर आली. त्यांनी चौकटी, रूढी यांची पर्वा केली नाही. मानवी अस्तित्व, वेदना, दिवस आणि रात्रीच्या सीमारेषेवरील सायंकाळ हे ग्रेस यांच्या कवितेच्या चिंतनाचे विषय होते. नादाने अनुभूती पोहोचविणारे ते कवी होते. आपल्या अनन्वय शक्तीने स्वत:ची कविता चिरकाल करणारे महाकवी असलेले कवी ग्रेस म्हणूनच मराठीतील आत्मनिष्ठ सौंदर्यपीठाचे शिल्पकार मानले जातात. त्यांच्या शब्दांनी रसिक मनाला केलेला स्पर्श काळाला पुसता येणार नाही.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यnewsबातम्या