शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदीची गुढी, पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 02:00 IST

मराठी नववर्षाच्या शुभारंभी राज्यभरात प्लास्टिक कॅरिबॅग बंदीची गुढी उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

मराठी नववर्षाच्या शुभारंभी राज्यभरात प्लास्टिक कॅरिबॅग बंदीची गुढी उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये जागोजागी फेकलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी साठून राहिले होते. परिणामी फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. बहुदा या अनुभवातून प्लास्टिक कॅरिबॅग बंदीचा निर्णय घेण्याची उपरती सरकारला झाली असावी. परंतु त्याची अंमलबजावणी किती गांभीर्याने केली जाते यावरच त्याचे यश अवलंबून आहे. प्लास्टिकबंदीचा निर्णय हा काही नवा नाही. यापूर्वीही तसा प्रयत्न झाला आहे. पण प्लास्टिकला आपण राज्यातून आणि आपल्या आयुष्यातूनही हद्दपार करू शकलेलो नाही. उलटपक्षी त्याचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकच्या अमर्याद वापराने पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. पण याचे गांभीर्य अजूनही आपण ओळखलेले नाही. प्लास्टिक युगाचा प्रारंभ एवढा घातक ठरेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. आपल्या हातातील कापडी पिशव्या बघताबघता गायब झाल्या आणि त्यांची जागा प्लास्टिक कॅरिबॅगने घेतली. हे प्लास्टिक दरवर्षी लाखो जनावरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते. जमिनीवर प्लास्टिक कुजण्यास १००० वर्षे तर पाण्यात ४०० वर्षे लागतात. पण तोपर्यंत या प्लास्टिकने अनेकांचे जीवन कुजते. खरे तर अनेक देशांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात येताच त्याचा वापर कमी अथवा बंद करून विघटनशील पिशव्यांचा उपयोग सुरू केला आहे. भारतातही केंद्र आणि राज्य सरकारांकडून गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकचा अमर्याद वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण लोकांमधील प्लास्टिकच्या व्यसनाधीनतेमुळे ते निष्फळ ठरले. केंद्र सरकारने देशातील सर्व राष्टÑीय स्मारके आणि पर्यटन स्थळांवर प्लास्टिकबंदी जाहीर केली होती. ती कितपत अमलात आली कुणास ठाऊक. त्यामुळे शासनाला खरोखरच प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर बंद करायचा असल्यास लोकसहभागातून एक चळवळच उभी करावी लागणार आहे. काही वर्षांपूर्वी लातूर शहरात असा प्रयोग झाला होता. शहरातील शाळा महाविद्यालये आणि सर्व प्रभागांमध्ये प्लास्टिक मुक्तीबाबत जागरण करण्यात आले. या धर्तीवर मोठे प्रयोग करावे लागतील. कारण शेवटी लोकांनी मनावर घेतले तरच प्लास्टिक कॅरिबॅगपासून मुक्ती शक्य आहे.