शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्लास्टिकबंदीची गुढी, पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 02:00 IST

मराठी नववर्षाच्या शुभारंभी राज्यभरात प्लास्टिक कॅरिबॅग बंदीची गुढी उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

मराठी नववर्षाच्या शुभारंभी राज्यभरात प्लास्टिक कॅरिबॅग बंदीची गुढी उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये जागोजागी फेकलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी साठून राहिले होते. परिणामी फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. बहुदा या अनुभवातून प्लास्टिक कॅरिबॅग बंदीचा निर्णय घेण्याची उपरती सरकारला झाली असावी. परंतु त्याची अंमलबजावणी किती गांभीर्याने केली जाते यावरच त्याचे यश अवलंबून आहे. प्लास्टिकबंदीचा निर्णय हा काही नवा नाही. यापूर्वीही तसा प्रयत्न झाला आहे. पण प्लास्टिकला आपण राज्यातून आणि आपल्या आयुष्यातूनही हद्दपार करू शकलेलो नाही. उलटपक्षी त्याचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकच्या अमर्याद वापराने पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. पण याचे गांभीर्य अजूनही आपण ओळखलेले नाही. प्लास्टिक युगाचा प्रारंभ एवढा घातक ठरेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. आपल्या हातातील कापडी पिशव्या बघताबघता गायब झाल्या आणि त्यांची जागा प्लास्टिक कॅरिबॅगने घेतली. हे प्लास्टिक दरवर्षी लाखो जनावरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते. जमिनीवर प्लास्टिक कुजण्यास १००० वर्षे तर पाण्यात ४०० वर्षे लागतात. पण तोपर्यंत या प्लास्टिकने अनेकांचे जीवन कुजते. खरे तर अनेक देशांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात येताच त्याचा वापर कमी अथवा बंद करून विघटनशील पिशव्यांचा उपयोग सुरू केला आहे. भारतातही केंद्र आणि राज्य सरकारांकडून गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकचा अमर्याद वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण लोकांमधील प्लास्टिकच्या व्यसनाधीनतेमुळे ते निष्फळ ठरले. केंद्र सरकारने देशातील सर्व राष्टÑीय स्मारके आणि पर्यटन स्थळांवर प्लास्टिकबंदी जाहीर केली होती. ती कितपत अमलात आली कुणास ठाऊक. त्यामुळे शासनाला खरोखरच प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर बंद करायचा असल्यास लोकसहभागातून एक चळवळच उभी करावी लागणार आहे. काही वर्षांपूर्वी लातूर शहरात असा प्रयोग झाला होता. शहरातील शाळा महाविद्यालये आणि सर्व प्रभागांमध्ये प्लास्टिक मुक्तीबाबत जागरण करण्यात आले. या धर्तीवर मोठे प्रयोग करावे लागतील. कारण शेवटी लोकांनी मनावर घेतले तरच प्लास्टिक कॅरिबॅगपासून मुक्ती शक्य आहे.