शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वेध - वृक्षवल्ली कोणा सोयरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 00:06 IST

मेट्रोच्या कामासाठी मुंबापुरीतली उणीपुरी पाच हजार झाडं कापली जाणार आहेत, म्हणे! या महानगरातली माणसंही झाडं मातीतच लावतात. पण ही माती जमिनीवर नव्हे, तर कुंडीत असते.

हाती नाही बळ, दारी नाही आड त्याने फुलझाड, लावू नये...प्रतिभेचे संत गदिमांनी व्यवहारे दिलेलं हे अक्षरधन आजही गैरलागू नाही. एकीकडे सुधीर मुनगंटीवारांसारखा विदर्भाच्या जंगलात वाढलेला मंत्री कोटी-कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडतो आणि दुसरीकडे शहरी विकासाच्या ‘मेट्रो’साठी नोकरशाही मुंबईतली पाच हजार झाडं तोडण्याचा प्लॅन बनवतेय. काँक्रीटच्या जंगलातला उरलासुरला प्राणवायू बंद केल्यानं काय साधणार आहे, हा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांनीच विचारायला सुरुवात केली आहे. तसं पाहिलं तर मुंबईला काही वर्षांपूर्वी एक ब्रीदवाक्य मिळालं. स्वच्छ मुंबई, हरित मुंबई! ते राजकीय राहिलं आणि कागदावरही! अर्थात १०४ चौरस कि.मी. पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग वगळला तरी उरलेल्या तीन चतुर्थांश मुंबईत आजही पूर्णत: सावलीत असलेले अनेक भाग आहेत. धरित्रीची हिरवी वसने ल्यालेल्या वस्त्या आहेत. एक काळ होता, जेव्हा वृक्षांची लागवड व्हायची. आताशा वृक्षारोपणाच्या नावाखाली लावली जाणारी झाडं इथल्या पावसात तग धरू नाही शकत. ही अल्पायुषी झाडं कधीही उन्मळून पडतात. डॉ. होमी भाभांसारख्या द्रष्ट्या वैज्ञानिकानं संस्था उभारणीच्या आड येणारं झाड कापण्यापेक्षा आराखड्यात बदल करण्याचा मार्ग स्वीकारला. याच मुंबईत काही वर्षांपूर्वी गुडघ्यांच्या प्रत्यारोपणासाठी आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनीही एक आगळा वस्तुपाठ घालून दिला होता. झाड लावणं हा एक खराखुरा कार्यानुभव. वरकरणी वाटतं, की झाड लावणं खूप सोप्पं आहे. पुरेशी जमीन किंवा माती मिळाली की बस्स! पण म्हटलं तर जमिनीत झाड लावणं तितकंसं सोपं नाही. झाड लावायचं तर गुडघ्यात वाकावं लागतं. गुडघ्यात न वाकता जमिनीच्या जवळ जाता येत नाही. या निसर्गनियमानुसार आॅपरेशनसाठी आलेल्या अटलजींनी मुंबईत गुडघे टेकले होतेच की! वडाचं झाड लावून त्यांनी इथल्या मातीशी असलेलं बुनियादी नातं आणखी बुलंद केलं होतं. तो वटवृक्ष जगलाही. सुदैवानं त्याभोवती राजकीय व्रतवैकल्यांनी फेर नाही धरला. वटपौर्णिमेला त्याभोवती गुंडाळलेलं सूत काँग्रेसच्या चरख्यावरचं आहे का, अशी फाजील राजकीय चिकित्सा झाली नाही. तसं पाहिलं तर आपले राजकारणी असंख्य वेळा या ना त्या कारणानं वृक्षारोपण करत असतात. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांनी खूप वर्षांपूर्वी सांगितलेला अनुभव खूपच बोलका आहे. एका संस्थेनं सुधीरभाऊंना वृक्षारोपणासाठी बोलावलं होतं. संयोजकांनी या उपक्रमाबद्दल उत्साहानं माहिती देताना त्यांना आणखी माहिती पुरवली... ‘आम्ही दरवर्षी याच जागी वृक्षारोपण करतो’! म्हणूनच राजकारण्यांनी लावलेल्या रोपांतली किती जगली, याच्या खानेसुमारीच्या फंदात मुंबईकर कधी पडलेच नाहीत. एरव्ही नेहरूंपासून पवारांपर्यंत आणि बापूजींपासून रामदेवांपर्यंत कैक मंडळींनी जितकी झाडं लावली, ती सगळी जगली असती तर भारत हा कांगो खोऱ्यासारखा निबिड अरण्याचा प्रदेश झाला असता. तसं होणं अंमळ कठीणच होतं म्हणा. कारण पुढाऱ्यांच्या तळहातावरच्या उत्कर्षरेषा ठळक असल्या तरी त्यांचा अंगठा हिरवा कुठं असतो? ज्यानं लावलेलं झाड हमखास जगतं, त्याचा अंगठा हिरवा समजावा, हा निसर्गाचा थम्ब रूल! हा रूल फॉलो करायला केस पांढरे झाले तरी मन हिरवं लागतं. मुंबईवर राज्य करणाऱ्यांचं मन हिरवं आहे का, याची ‘मेट्रो’च्या निमित्तानं कसोटी लागणार आहे.मुंबई हरित आंदोलनांसाठी प्रसिद्ध नाही. पण अलीकडच्या काळात आरे कॉलनीचा हिरवा पट्टा वाचविण्यासाठी जनमनानं आक्रोश केला. शिवाजी पार्कला केटरिंग कॉलेजच्या बाहेर रस्त्याच्या मधोमध असलेलं झाड वाचविण्यासाठीही एक छोटेखानी आंदोलन झालं होतं. त्याची व्याप्ती उत्तर प्रदेशात ४३ वर्षांपूर्वी झालेल्या ‘चिपको’ आंदोलनासारखी मोठी नव्हती. मेट्रोसाठी मुंबईच्या फुफ्फुसांचा बळी द्यायचा का, हा प्रश्न आहे. अडीच हजार झाडांची कत्तल वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांच्या प्रेरणेतून गौरादेवींसारख्या सामान्य महिलांनी झाडांना मिठी मारून ‘चिपको’ आंदोलन केले. त्यानंतर इंदिरा गांधींनी हिमालयाच्या कुशीतलं एकही झाड कापल्यावर १५ वर्षांचा निर्बंध घातला होता. मुंबईही आज अशा एखाद्या गौरादेवीच्या प्रतीक्षेत आहे. शिवाय या मुंबईला तुकोबांचं एक वचन पक्कं ठाऊक आहे...दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी,माफी नाही तरी। शिक्षेतुनी।।हे नोकरशहा समजून घेतील का, एवढाच प्रश्न आहे!- चंद्रशेखर कुलकर्णी-