शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

परफॉर्मन्सची स्मृती

By admin | Updated: February 26, 2016 04:37 IST

अलीकडच्या काळात ज्यांना असाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्या सामाजिक माध्यमांमधील प्रतिक्रिया हा कोणत्याही गोष्टीच्या भले-बुरेपणाचा यथार्थ निकष मानायचा झाल्यास

अलीकडच्या काळात ज्यांना असाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्या सामाजिक माध्यमांमधील प्रतिक्रिया हा कोणत्याही गोष्टीच्या भले-बुरेपणाचा यथार्थ निकष मानायचा झाल्यास केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी संसदेत जे भाषण केले तो म्हणजे त्यांचा काही काळ स्मृतीत राहाणारा चांगला परफॉर्मन्स होता हे मान्य करावे लागेल. कारण त्यांचे भाषण हा सामाजिक माध्यमांचीच भाषा वापरायची तर एक ‘हॉट फेवर्ड’ विषय बनून राहिला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनाही या भाषणाने बरीच भुरळ पाडल्याचे दिसून आले. अर्थात स्मृती इराणी मूळच्या कलावंत असल्याने त्यांनी केलेला अभिनय उत्तम होता अशी तिरकस टीकाही काँग्रेसने केली आहे. या दोन्ही प्रतिक्रिया घटकाभर बाजूला सारल्या तरी त्यामधून काही बाबी स्पष्ट झाल्या. मागील पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनदेखील नरेन्द्र मोदी सरकारच्या दृष्टीने अडथळ्याचीच शर्यत ठरणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वार्धात कोणतीही वादग्रस्त विधेयके सादर करु नका असा इशारा काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी अगोदरच देऊन ठेवला आहे. गेल्या मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाचा प्रारंभ झाला व संसद हे गोंधळ घालून बंद पाडण्याचे नव्हे तर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे असा इशारा याच अभिभाषणात राष्ट्रपतींनी दिला होता. पण तो कोणीही फारसा मनावर घेतल्याचे निदान गेल्या दोन दिवसात तरी आढळून आले नाही. अन्य कोणतेही कामकाज न करता रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठातील बुद्धिमान विद्यार्थ्याची आत्महत्त्या आणि जेएनयुमधील काही विद्यार्थ्यांवर ठेवलेला देशद्रोहाचा आरोप याच विषयांवर चर्चा करण्याचा विरोधकांचा आग्रह होता. अंतस्थ हेतू अर्थातच स्मृती इराणी यांना अडचणीत आणण्याचा होता. सरकारने विरोधकांची मागणी मान्य केली. स्वाभाविकच त्यांनी म्हणजे काँग्रेस आणि डाव्यांनी इराणी यांच्यावर तुफानी हल्ला चढविला. परंतु या हल्ल्यास उत्तर देण्यासाठी स्मृती इराणी सरसावल्या तेव्हां मात्र बहुतेक सारे सभागृहाबाहेर निघून गेले. पण अंमळ अधिक आणि कदाचित अकारणही त्वेषाने इराणी यांनी त्यांच्यावर केलेले सारे आरोप परतवून लावले. परंतु केवळ तितकेच नव्हे तर आपल्या काही कट्टर विरोधकाना त्यांनी उघडेदेखील पाडले. वास्तविक पाहाता चर्चेचा आग्रह धरणाऱ्यांनी आणि राष्ट्रपतींचा व त्यांच्या वक्तव्यांचा आदर करतो असे सांगणाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही व स्मृती इराणी यांना अनायासेच रान मोकळे मिळाले. त्याचा त्यांनी मन:पूत वापर करुन घेतला.