शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

परफॉर्मन्सची स्मृती

By admin | Updated: February 26, 2016 04:37 IST

अलीकडच्या काळात ज्यांना असाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्या सामाजिक माध्यमांमधील प्रतिक्रिया हा कोणत्याही गोष्टीच्या भले-बुरेपणाचा यथार्थ निकष मानायचा झाल्यास

अलीकडच्या काळात ज्यांना असाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्या सामाजिक माध्यमांमधील प्रतिक्रिया हा कोणत्याही गोष्टीच्या भले-बुरेपणाचा यथार्थ निकष मानायचा झाल्यास केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी संसदेत जे भाषण केले तो म्हणजे त्यांचा काही काळ स्मृतीत राहाणारा चांगला परफॉर्मन्स होता हे मान्य करावे लागेल. कारण त्यांचे भाषण हा सामाजिक माध्यमांचीच भाषा वापरायची तर एक ‘हॉट फेवर्ड’ विषय बनून राहिला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनाही या भाषणाने बरीच भुरळ पाडल्याचे दिसून आले. अर्थात स्मृती इराणी मूळच्या कलावंत असल्याने त्यांनी केलेला अभिनय उत्तम होता अशी तिरकस टीकाही काँग्रेसने केली आहे. या दोन्ही प्रतिक्रिया घटकाभर बाजूला सारल्या तरी त्यामधून काही बाबी स्पष्ट झाल्या. मागील पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनदेखील नरेन्द्र मोदी सरकारच्या दृष्टीने अडथळ्याचीच शर्यत ठरणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वार्धात कोणतीही वादग्रस्त विधेयके सादर करु नका असा इशारा काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी अगोदरच देऊन ठेवला आहे. गेल्या मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाचा प्रारंभ झाला व संसद हे गोंधळ घालून बंद पाडण्याचे नव्हे तर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे असा इशारा याच अभिभाषणात राष्ट्रपतींनी दिला होता. पण तो कोणीही फारसा मनावर घेतल्याचे निदान गेल्या दोन दिवसात तरी आढळून आले नाही. अन्य कोणतेही कामकाज न करता रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठातील बुद्धिमान विद्यार्थ्याची आत्महत्त्या आणि जेएनयुमधील काही विद्यार्थ्यांवर ठेवलेला देशद्रोहाचा आरोप याच विषयांवर चर्चा करण्याचा विरोधकांचा आग्रह होता. अंतस्थ हेतू अर्थातच स्मृती इराणी यांना अडचणीत आणण्याचा होता. सरकारने विरोधकांची मागणी मान्य केली. स्वाभाविकच त्यांनी म्हणजे काँग्रेस आणि डाव्यांनी इराणी यांच्यावर तुफानी हल्ला चढविला. परंतु या हल्ल्यास उत्तर देण्यासाठी स्मृती इराणी सरसावल्या तेव्हां मात्र बहुतेक सारे सभागृहाबाहेर निघून गेले. पण अंमळ अधिक आणि कदाचित अकारणही त्वेषाने इराणी यांनी त्यांच्यावर केलेले सारे आरोप परतवून लावले. परंतु केवळ तितकेच नव्हे तर आपल्या काही कट्टर विरोधकाना त्यांनी उघडेदेखील पाडले. वास्तविक पाहाता चर्चेचा आग्रह धरणाऱ्यांनी आणि राष्ट्रपतींचा व त्यांच्या वक्तव्यांचा आदर करतो असे सांगणाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही व स्मृती इराणी यांना अनायासेच रान मोकळे मिळाले. त्याचा त्यांनी मन:पूत वापर करुन घेतला.