शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

वेध - ‘मामा’ कोण, दादा की पवार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 00:09 IST

सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अपक्ष खुर्चीवर बसले. राजकीय सारिपाटाचे सूत्रधार चंद्रकांतदादा पाटील व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा धाकले-थोरले पवार यात नक्की ‘मामा’ कोण बनले...?

राजकारणात कात्रजचा घाट दाखविणे, टप्प्यातील सावज, खिंडीत पकडले यासारखे वाक्प्रचार नेहमी वापरले जातात. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘मामा बनविणे’ हा वाक्प्रचार खूप गाजतोय. जि.प.त राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे संख्याबळ असतानाही अपक्ष असलेले संजय शिंदे जिल्हा परिषदेचे बिनविरोध अध्यक्ष बनले. योगायोगाने त्यांना ‘संजयमामा’ या टोपणनावानेच ओळखले जाते. त्यामुळे आपण चर्चा करीत असलेल्या ‘मामा बनविणे’ या वाक्प्रचाराला विशेष महत्त्व. राज्यातल्या जिल्हा परिषदा भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याची खास मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राबविली व फत्तेही केली. तरीही सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर अपक्षच विराजमान झाले. आकडेमोडीच्या तांत्रिक गणितात सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपाच्या बेरजेत जात नाही. बेरीज-वजाबाकीच्या दृष्टीने पाहिले तर जि.प.च्या राजकारणात नक्की कोण आणि कसे ‘मामा बनले’ या प्रश्नाचे उत्तर जो-तो आपल्या सोयीने देतोय. ६८ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत १४ सदस्यांना घेऊन सत्तेची मोट बांधणे चंद्रकांतदादा यांच्यासह या मोहिमेचे सूत्रधार सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सोपे नव्हते. शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आयुष्यभर अभिमानाने खांद्यावर घेणाऱ्या आमदार गणपतराव देशमुख यांची भूमिका असो, एरवी बंद पाकीट पाठवून पदाधिकारी निवडण्याची सवय असणाऱ्या राष्ट्रवादीच्या थोरले व धाकले पवार यांची भूमिका असो, सुशीलकुमार शिंदे यांच्या आशीर्वादाने कृष्णा-खोरे महामंडळापासून गृहराज्य मंत्रिपदापर्यंतची पदे मिळविणाऱ्या अक्कलकोटच्या आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची भूमिका असो, साखर कारखानदारी उद्योगात आपले साम्राज्य निर्माण करणाऱ्या ‘पवारभक्त’ आमदार बबनराव शिंदे यांची भूमिका असो, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कचखाऊ धोरणामुळे विधान परिषद निवडणुकीत नामुष्कीचा पराभव सोसणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांची भूमिका असो, आपले चिरंजीव विक्रांत यांना जि.प. अध्यक्ष करण्याचा नाद अचानक सोडून देण्याची माजी आमदार राजन पाटील यांची भूमिका असो, माजी मंत्री बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी ‘जो जे वांछिल...’ किंवा ‘जे जे घडेल ते पाहत राहावे’ अशी घेतलेली भूमिका असो, कडवे पवारनिष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर डोंगरे यांनी सुरुवातीपासून राष्ट्रवादीच्याच विरोधी घेतलेली भूमिका असो, करमाळ्याच्या रश्मीताई बागल यांची शेवटपर्यंत असलेली ‘तळ्यात-मळ्यात’ भूमिका असो, आमदार प्रशांत परिचारक संकटाचे दु:ख पोटात घेऊन भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, बार्शीचे राजेंद्र राऊत, दक्षिण सोलापूरच्या सुरेश हसापुरेंसारख्या शिलेदारांना घेऊन डाव मांडण्याची उमेश परिचारक यांची भूमिका असो आणि सरतेशेवटी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह व पुतणे धैर्यशील यांची पवार काका-पुतण्याच्या धोरणाकडे डोळे लावून बसण्याची भूमिका असो या सर्व भूमिकांचे पोस्टमार्टेम केले तर जि. प. राजकारणात कोणी कोणाला ‘मामा बनविले’ या प्रश्नाचे उत्तर ज्याच्या-त्याच्या सोयीचे निघते. त्या सोयीचे नाते भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशी जोडले तर मात्र ‘सर्वच मामा’ बनल्याचा निष्कर्ष निघू शकतो. बाकी काहीही असो, राष्ट्रवादी पक्षाच्या व्हिपच्या जाहिराती झळकूनही शेवटच्या क्षणी माघार घेण्याचा अधिकृत निरोप राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने दिला हे गुलदस्त्यातच आहे. एक मात्र खरे सोलापूर जिल्ह्याने या मोहिमेतून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा यांना राज्याच्या गणितात बेरजेचे ठरणारे व फुटण्यास सज्ज असे दोन आमदार दिले आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून राष्ट्रवादीच्या विरोधात लढणारा उमेदवार दिला. शेवटी जिल्ह्याच्या राजकीय सारिपाटात नक्की ‘मामा’ फडणवीस-चंद्र्रकांतदादा बनले की धाकले-थोरले पवार हे काळच ठरवेल.- राजा माने