शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वेध अर्थसंकल्पाचे

By admin | Updated: January 18, 2016 00:13 IST

जानेवारी उजाडला, की वेध लागतात ते अर्थसंकल्पाचे! जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढवून सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल तर विशेष उत्सुकता असते

जानेवारी उजाडला, की वेध लागतात ते अर्थसंकल्पाचे! जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढवून सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल तर विशेष उत्सुकता असते. जगभरात व्याप्त असलेली एक प्रकारची अस्वस्थता, चिनी अर्थव्यवस्थेमध्ये आलेला भूकंप, त्याचे जगभरातील अर्थव्यवस्थांना बसत असलेले हादरे, भारतात सलग तिसऱ्या वर्षी पडलेला दुष्काळ आणि सरकारने गत वर्षभरात केलेल्या विविध विकास प्रकल्प व योजनांच्या महत्त्वाकांक्षी घोषणा, या पृष्ठभूमीवर अपेक्षा आणि रुपयाची आवक व जावक यांचा ताळमेळ सरकार कसा बसविणार, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. देशात मंदीचे वातावरण आहे, हे सांगण्यासाठी कुण्या अर्थतज्ज्ञाची आवश्यकता नाही. चिनी अर्थव्यवस्थेवर जमलेल्या काळ्या ढगांमुळे त्या देशाने जगभरातील बाजारांमध्ये स्वस्त वस्तूंचा अक्षरश: पूर आणला आहे. परिणामी देशांतर्गत उद्योग संकटात सापडले आहेत. उद्योग संकटात सापडल्यामुळे नवी रोजगार निर्मिती तर सोडाच, कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबण्याची पाळी लवकरच येऊ शकते, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यात मोठी भूमिका बजावलेल्या बेरोजगार युवकांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. हा वर्ग नाराज होणे सरकारला परवडण्यासारखे नाही. स्टार्ट अप इंडिया आणि स्टॅँड अप इंडियासारख्या योजनांच्या निमित्ताने या वर्गाची भलामण करण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात रोजगार उपलब्ध होणार नाहीत, तोवर बेरोजगार युवक आणि विद्यार्थी वर्गातील अस्वस्थता वाढतीच राहील. सलग तिसऱ्या वर्षी पडलेला दुष्काळ, प्रचंड वाढलेला भांडवली खर्च, उत्पादन खर्चही भरून निघण्याची हमी न देणारी बाजार व्यवस्था आणि काही राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या शेतकरी आत्महत्त्या, यामुळे शेतकरी वर्ग बेरोजगार युवकांपेक्षाही किती तरी जास्त अस्वस्थ आहे. सरकारने किमान कृषी कर्ज माफ करून दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ती पूर्ण करायची झाल्यास अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येऊन, विकास प्रकल्पांना कात्री लावण्याची पाळी सरकारवर येऊ शकते. थोडक्यात, सरकारपुढील आव्हान खूप मोठे आहे आणि सर्वच आघाड्यांवर चित्र निराशाजनक आहे. सरकारसाठी दिलासादायक बाब एकच आहे आणि ती म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात झालेली अभूतपूर्व घसरण! केवळ त्या बळावर विविध घटकांचे समाधान करू शकणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे शिवधनुष्य सरकार कसे पेलते, हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.