शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पवारांचे ‘नमोमीलन’!

By admin | Updated: January 24, 2015 00:31 IST

राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र आल्याने सर्द झालेले राजकारण उष्ण होऊ लागले आहे.

राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राला धरून अनेक विषय घोंगावू लागले आहेत. किरण बेदी, अरविंद केजरीवाल या शिष्योत्तमांमुळे अण्णा हजारे, वादग्रस्त विधानांनी बिहार सरकार व जदयूला अडचणीत आणणारे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा जातीय समीकरणांची गोळाबेरीज करणारा महाराष्ट्र दौरा, राज्यपाल राम नाईक यांच्या सुधारणावादामुळे उत्तर प्रदेश दिनाच्या मुंबईतील कार्यक्रमातून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना मिळालेला डच्चू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांसोबतची सलगी, सर्द झालेल्या उत्तरेतील राजकारणाला उष्ण करू पाहत असल्याने मोदी-पवारांचे हे ‘मनोमीलन’ असेल की ‘नमो-मीलन’ हे वेळच सांगेल.दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या वर्षी अरविंद केजरीवाल यांनी उडी घेतली. त्यांचे गुरू अण्णा हजारे त्यामुळे खट्टू झाले. आता किरण बेदी यांनी तोच कित्ता गिरवला. दोघेही अण्णांचे शिष्य व दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा! साहजिकच आशीर्वादासाठी भुकेल्या असलेल्या बेदी-केजरीवाल यांना अण्णाशीर्वादाची ‘सिद्धी’ मिळाली नाही! या दोघांपेक्षाही अधिक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या अण्णांनी या दोघांसाठी ‘मौना’चा एकच न्याय लावला आणि फोन घेतले नाहीत. ‘अण्णांची लाइन माझ्यासाठी व्यस्त आहे’ असा टोमणा बेदींनी हाणला, तर ‘ते माझ्यासाठी जनतेला संदेश देतील’ असे संकेत केजरीवाल यांनी दिले. याचाच एक अर्थ असा, माध्यमांचे ‘कारण’ समजलेले अण्णा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चर्चेत राहतील आणि नैतिकतेचा तराजू तोलून, न जाणो एका शिष्याला पाठिंबाही देतील! दुसरीकडे, बेताल बोलण्याने पक्षात जड झालेले बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी पक्षांतर्गत विरोध मोडून काढण्यासाठी दलितांचा राष्ट्रीय नेता होण्याचा अजेंडा हाती घेतला आहे. मांझींनी बिहारातील अडीचशे दलित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बिहारपर्यंतच असलेला त्यांचा हा अट्टहास एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेल्या कल्पनेने विस्तारला व त्यांनी बिहारच्या रोजगाराचा थेट संबंध मुंबईशी असल्याने तिथे जाऊन दलित बिहारींची मोट बांधण्याचा इरादा पक्का करून महाराष्ट्रात मोर्चा वळविला. ते दोन दिवस राज्यात फिरले. पण फेरी फुकट गेली. बिहारबाजूच्या उत्तर प्रदेशातही मुंबईतील ‘उत्तर प्रदेश दिवसावरून’ चांगलेच मानापमान नाट्य रंगू लागले. आजचा हा दिवस झोकात करण्याची मुंबईच्या ४० लाख उत्तरप्रदेशी बांधवांची इच्छा राज्यपाल राम नाईक यांनी उचलून धरल्याने मुख्यमंत्री अखिलेश यादव अकारण खफा झाले आहेत. २५ वर्षांपासून ‘अभियान’ ही मुंबईतील संस्था मुंबईत हा दिवस साजरा करते. यावेळी महाराष्ट्र, गुजरात व बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशानेही थाटामाटात हा दिन साजरा करताना, मुंबईकर उत्तरप्रदेशी बांधवांनी उत्तर प्रदेशातील एक गाव दत्तक घ्यावे, अशा काही सूचना नाईक यांनी केल्या. बहुधा त्या मुख्यमंत्र्यांना रुचल्या नाहीत! त्यांनी मुंबईत येणार नाही, असे जाहीर केल्याने भय्या लोकांचे डोके आता पार बिघडले! सुधारणावादी नाईक लोकप्रिय झाल्याचेही लक्षण आहे. बारामतीकर शरद पवारांचे मोदीप्रेम वाढले आहे. स्वच्छता अभियान, मग फडणवीस सरकारला पाठिंबा आणि आता ‘पंतप्रधान आपल्या दारी..!’ हा त्यांचा उपक्रम म्हणजे सुखासुखी राजकारण करू नका, हाच संदेश देतो. साखरेच्या मुद्द्यावरून दिल्लीला चर्चेला येण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार यांना भेटल्याने आधीच अंतरावर असलेले खासदार राजू शेट्टी महायुतीपासून आणखी दुरावले. निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना व केंद्राचा ढब्बू पैसाही राज्याच्या तिजोरीत आला नसताना, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढ्यात पंतप्रधान बारामतीला जाऊन शेती पाहणी करणार असल्याने हे ‘मनोमीलन’ असेल की ‘नमो-मीलन’ हे वेळच सांगेल.- रघुनाथ पांडे