शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पक्ष स्वयंपाकघरात!

By admin | Updated: January 29, 2017 23:12 IST

कुणाच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर सर्वप्रथम त्याच्या पोटापर्यंत पोहोचावे लागते. लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली की त्यांची मने जिंकणे सहज शक्य होते

कुणाच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर सर्वप्रथम त्याच्या पोटापर्यंत पोहोचावे लागते. लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली की त्यांची मने जिंकणे सहज शक्य होते. हाच फंडा सध्या देशाच्या राजकारणातही वापरला जात असल्याचे दिसते. हे पक्ष थेट मतदारांच्या स्वयंपाकघरातच शिरले आहेत. पुढील महिन्यात पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता विविध राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रावर नजर टाकली तरी हे लक्षात येते.

गरिबांची मते आपल्या पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत अशी नानाविध आश्वासने या पक्षांकडून दिली जात आहेत. अर्थात ही आश्वासने म्हणजे निव्वळ राजकीय जुमला असतो हे न समजण्याइतपत मतदारही आता अज्ञानी राहिलेले नाहीत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी राज्यातील गरिबांच्या पोटापाण्याची संपूर्ण व्यवस्थाच करून टाकली आहे. ते सत्तेत आल्यास गरिबांना गहू, तांदूळ, दूध, तूप, प्रेशर कुकर सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे.

थोडक्यात म्हणजे लोकांना केवळ स्वयंपाक तयार करण्याचे कष्ट तेवढे घ्यावे लागतील. तिकडे पंजाबमध्येसुद्धा काँग्रेस, भाजपा, अकाली दल, आम आदमी पार्टी या पक्षांनी त्यांच्या ‘व्होटर फ्रेंडली’ घोषणापत्रांमध्ये अशा आश्वासनांची खिरापतच वाटली आहे. ही आश्वासने बघून मतदारही संभ्रमात पडले असतील तर त्यात नवल ते काय? सत्ताधारी अकाली दलाने गरिबांना केवळ २५ रुपयात एक किलो साजूक तूप आणि १० रुपये किलो साखर देण्याचे जाहीर केले आहे.

हे आश्वासन अकाली दल कसे पूर्ण करणार ते त्यालाच माहिती. पण दोन वेळच्या जेवणास मुकणाऱ्या गरिबांच्या मनात मात्र यामुळे नवी आशा पल्लवित झाली असणार. लोकांना मोफत सोयीसुविधांची आश्वासने देण्यात काँग्रेसही मागे नाही. या पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि गरिबांच्या मुलींना पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे जाहीर केले आहे. या राजकीय पक्षांना मतदारांच्या रोजीरोटीची, पोटापाण्याची एवढीच चिंता असेल तर त्यांनी गरिबांसाठी तामिळनाडूतील अम्मा कॅण्टिनच्या धर्तीवर आपले कॅण्टिन सुरू करण्यास काय हरकत आहे?

अलीकडे राजस्थानातही अन्नपूर्णा भोजन योजनेअंतर्गत केवळ पाच रुपयात नाश्ता आणि आठ रुपयात थाळी दिली जाते. राज्यात ही रसोई केंद्रे सुरू झाली आहेत. शिवाय ८० फिरती स्वयंपाकघरे राज्यभरात अत्यंत वाजवी दरात गरिबांना अन्न पुरविणार आहे. हा आदर्श राजकीय पक्षांनी घ्यावा.