शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष स्वयंपाकघरात!

By admin | Updated: January 29, 2017 23:12 IST

कुणाच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर सर्वप्रथम त्याच्या पोटापर्यंत पोहोचावे लागते. लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली की त्यांची मने जिंकणे सहज शक्य होते

कुणाच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर सर्वप्रथम त्याच्या पोटापर्यंत पोहोचावे लागते. लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली की त्यांची मने जिंकणे सहज शक्य होते. हाच फंडा सध्या देशाच्या राजकारणातही वापरला जात असल्याचे दिसते. हे पक्ष थेट मतदारांच्या स्वयंपाकघरातच शिरले आहेत. पुढील महिन्यात पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता विविध राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रावर नजर टाकली तरी हे लक्षात येते.

गरिबांची मते आपल्या पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत अशी नानाविध आश्वासने या पक्षांकडून दिली जात आहेत. अर्थात ही आश्वासने म्हणजे निव्वळ राजकीय जुमला असतो हे न समजण्याइतपत मतदारही आता अज्ञानी राहिलेले नाहीत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी राज्यातील गरिबांच्या पोटापाण्याची संपूर्ण व्यवस्थाच करून टाकली आहे. ते सत्तेत आल्यास गरिबांना गहू, तांदूळ, दूध, तूप, प्रेशर कुकर सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे.

थोडक्यात म्हणजे लोकांना केवळ स्वयंपाक तयार करण्याचे कष्ट तेवढे घ्यावे लागतील. तिकडे पंजाबमध्येसुद्धा काँग्रेस, भाजपा, अकाली दल, आम आदमी पार्टी या पक्षांनी त्यांच्या ‘व्होटर फ्रेंडली’ घोषणापत्रांमध्ये अशा आश्वासनांची खिरापतच वाटली आहे. ही आश्वासने बघून मतदारही संभ्रमात पडले असतील तर त्यात नवल ते काय? सत्ताधारी अकाली दलाने गरिबांना केवळ २५ रुपयात एक किलो साजूक तूप आणि १० रुपये किलो साखर देण्याचे जाहीर केले आहे.

हे आश्वासन अकाली दल कसे पूर्ण करणार ते त्यालाच माहिती. पण दोन वेळच्या जेवणास मुकणाऱ्या गरिबांच्या मनात मात्र यामुळे नवी आशा पल्लवित झाली असणार. लोकांना मोफत सोयीसुविधांची आश्वासने देण्यात काँग्रेसही मागे नाही. या पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि गरिबांच्या मुलींना पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे जाहीर केले आहे. या राजकीय पक्षांना मतदारांच्या रोजीरोटीची, पोटापाण्याची एवढीच चिंता असेल तर त्यांनी गरिबांसाठी तामिळनाडूतील अम्मा कॅण्टिनच्या धर्तीवर आपले कॅण्टिन सुरू करण्यास काय हरकत आहे?

अलीकडे राजस्थानातही अन्नपूर्णा भोजन योजनेअंतर्गत केवळ पाच रुपयात नाश्ता आणि आठ रुपयात थाळी दिली जाते. राज्यात ही रसोई केंद्रे सुरू झाली आहेत. शिवाय ८० फिरती स्वयंपाकघरे राज्यभरात अत्यंत वाजवी दरात गरिबांना अन्न पुरविणार आहे. हा आदर्श राजकीय पक्षांनी घ्यावा.