शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:14 IST

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी बुधवारी भारताच्या भूमीवरून पाकिस्तानला अत्यंत कडक भाषेत संदेश दिला. दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी बुधवारी भारताच्या भूमीवरून पाकिस्तानला अत्यंत कडक भाषेत संदेश दिला. दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही, अशी तंबीच त्यांनी पाकिस्तानला दिली. भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्र तंत्रज्ञान देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे भारतातील राष्ट्रवाद्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, टिलरसन यांच्या वक्तव्यानंतर भारत व अमेरिकेदरम्यानचे संबंध प्रगाढ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काही दिवसांपासून विविध मुद्यांवर बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत असल्याने, मोदी सरकारद्वारा टिलरसन यांच्या वक्तव्याचे जोशपूर्ण स्वागत केले जाणे समजण्यासारखे आहे; मात्र अमेरिकेचा पूर्वेतिहास बघू जाता, फार जास्त हुरळून गेल्याने फटफजितीची पाळी येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देऊन पदारुढ झाले असले तरी, परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अमेरिकेचे धोरण सुरुवातीपासून ‘अमेरिका फर्स्ट’ हेच राहिले आहे. स्वहित साधण्यासाठी जगाला वारंवार महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेणे, वेळप्रसंगी अडचणीचे ठरणारे देश बेचिराख करून टाकणे, हे त्या देशाचे सर्वपरिचित उद्योग आहेत. त्यामुळे अमेरिकेला सध्या भारताविषयी जो प्रेमाचा उमाळा आला आहे, त्याकडे सावधगिरीने बघणेच योग्य ठरेल. भारत ही सर्वात मोठी आणि अमेरिका ही सर्वात जुनी लोकशाही असल्यामुळे आमचे द्विपक्षीय संबंध नैसर्गिक असल्याचे, अमेरिका हल्ली जगाला वारंवार सांगत असते. प्रामुख्याने लष्करशहांच्या अधिपत्याखाली राहिलेल्या पाकिस्तानची आतापर्यंत पाठराखण करताना अमेरिकेला ही वस्तुस्थिती का आठवत नव्हती? त्याची साधी कारणमीमांसा ही आहे की, तेव्हा अमेरिकेला स्वहितासाठी पाकिस्तान जास्त महत्त्वाचा होता आणि बदललेल्या परिस्थितीत भारत जास्त सोईचा वाटत आहे. अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्याची झालेली घाई, चीनमुळे आंतरराष्ट्रीय पटलावर निर्माण झालेला नवा प्रतिस्पर्धी, उत्तर कोरियाच्या रुपाने उभे ठाकलेले नवे संकट, यामुळे आज अमेरिकेला पाकिस्तानपेक्षा भारत अधिक उपयुक्त वाटत आहे. त्यामुळेच पाकिस्तानसारख्या कधीकाळच्या जीवश्चकंठश्च मित्राला दूर करायला अमेरिकेला जराही वेळ लागला नाही. चीनचा उदय, त्या देशाची एकूणच आंतरराष्ट्रीय पटलावरील व विशेषत: हिंद महासागरातील वाढती महत्त्वाकांक्षा, त्यासाठी भारताच्या शेजारी देशांबरोबरचे संबंध वृध्दिंगत करून भारताला घेरण्याची तयारी आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पाकिस्तानसोबत दिवसेंदिवस प्रगाढ होत असलेली त्या देशाची मैत्री, ही सगळी परिस्थिती लक्षात घेता, भारतालाही अमेरिकेसोबतच्या मैत्रीची गरज आहेच; पण म्हणून ‘गरज सरो, वैद्य मरो’ या अमेरिकेच्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमेरिकेला भारतासोबत संबंध वृध्दिंगत करावेसे वाटत असल्याच्या वस्तुस्थितीने हरखून न जाता, भारतीय नेतृत्वाने अमेरिकेचा पूर्वेतिहास ध्यानी घेऊन, जबाबदारीपूर्वक पावले उचलायला हवीत. अमेरिकेसोबत संबंध वाढवताना नाते बरोबरीचे असेल तर कोणत्याही मुद्यावर एकट्या अमेरिकेचे हित साधले जाणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्या परिस्थिती बदलल्यावर अमेरिकेने पुन्हा भूमिका बदलली तर आपला पाकिस्तान होणार नाही, याची काळजी नेतृत्वाने घ्यायलाच हवी. सरकारे बदलत असतात, देश मात्र कायमस्वरुपी असतो हे लक्षात ठेवूनच कोणत्याही सरकारने धोरणविषयक निर्णय घ्यायला हवे.

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान