शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:14 IST

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी बुधवारी भारताच्या भूमीवरून पाकिस्तानला अत्यंत कडक भाषेत संदेश दिला. दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी बुधवारी भारताच्या भूमीवरून पाकिस्तानला अत्यंत कडक भाषेत संदेश दिला. दहशतवाद्यांसाठीचे नंदनवन अजिबात सहन केले जाणार नाही, अशी तंबीच त्यांनी पाकिस्तानला दिली. भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्र तंत्रज्ञान देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे भारतातील राष्ट्रवाद्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, टिलरसन यांच्या वक्तव्यानंतर भारत व अमेरिकेदरम्यानचे संबंध प्रगाढ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काही दिवसांपासून विविध मुद्यांवर बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत असल्याने, मोदी सरकारद्वारा टिलरसन यांच्या वक्तव्याचे जोशपूर्ण स्वागत केले जाणे समजण्यासारखे आहे; मात्र अमेरिकेचा पूर्वेतिहास बघू जाता, फार जास्त हुरळून गेल्याने फटफजितीची पाळी येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देऊन पदारुढ झाले असले तरी, परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अमेरिकेचे धोरण सुरुवातीपासून ‘अमेरिका फर्स्ट’ हेच राहिले आहे. स्वहित साधण्यासाठी जगाला वारंवार महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेणे, वेळप्रसंगी अडचणीचे ठरणारे देश बेचिराख करून टाकणे, हे त्या देशाचे सर्वपरिचित उद्योग आहेत. त्यामुळे अमेरिकेला सध्या भारताविषयी जो प्रेमाचा उमाळा आला आहे, त्याकडे सावधगिरीने बघणेच योग्य ठरेल. भारत ही सर्वात मोठी आणि अमेरिका ही सर्वात जुनी लोकशाही असल्यामुळे आमचे द्विपक्षीय संबंध नैसर्गिक असल्याचे, अमेरिका हल्ली जगाला वारंवार सांगत असते. प्रामुख्याने लष्करशहांच्या अधिपत्याखाली राहिलेल्या पाकिस्तानची आतापर्यंत पाठराखण करताना अमेरिकेला ही वस्तुस्थिती का आठवत नव्हती? त्याची साधी कारणमीमांसा ही आहे की, तेव्हा अमेरिकेला स्वहितासाठी पाकिस्तान जास्त महत्त्वाचा होता आणि बदललेल्या परिस्थितीत भारत जास्त सोईचा वाटत आहे. अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्याची झालेली घाई, चीनमुळे आंतरराष्ट्रीय पटलावर निर्माण झालेला नवा प्रतिस्पर्धी, उत्तर कोरियाच्या रुपाने उभे ठाकलेले नवे संकट, यामुळे आज अमेरिकेला पाकिस्तानपेक्षा भारत अधिक उपयुक्त वाटत आहे. त्यामुळेच पाकिस्तानसारख्या कधीकाळच्या जीवश्चकंठश्च मित्राला दूर करायला अमेरिकेला जराही वेळ लागला नाही. चीनचा उदय, त्या देशाची एकूणच आंतरराष्ट्रीय पटलावरील व विशेषत: हिंद महासागरातील वाढती महत्त्वाकांक्षा, त्यासाठी भारताच्या शेजारी देशांबरोबरचे संबंध वृध्दिंगत करून भारताला घेरण्याची तयारी आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पाकिस्तानसोबत दिवसेंदिवस प्रगाढ होत असलेली त्या देशाची मैत्री, ही सगळी परिस्थिती लक्षात घेता, भारतालाही अमेरिकेसोबतच्या मैत्रीची गरज आहेच; पण म्हणून ‘गरज सरो, वैद्य मरो’ या अमेरिकेच्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमेरिकेला भारतासोबत संबंध वृध्दिंगत करावेसे वाटत असल्याच्या वस्तुस्थितीने हरखून न जाता, भारतीय नेतृत्वाने अमेरिकेचा पूर्वेतिहास ध्यानी घेऊन, जबाबदारीपूर्वक पावले उचलायला हवीत. अमेरिकेसोबत संबंध वाढवताना नाते बरोबरीचे असेल तर कोणत्याही मुद्यावर एकट्या अमेरिकेचे हित साधले जाणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्या परिस्थिती बदलल्यावर अमेरिकेने पुन्हा भूमिका बदलली तर आपला पाकिस्तान होणार नाही, याची काळजी नेतृत्वाने घ्यायलाच हवी. सरकारे बदलत असतात, देश मात्र कायमस्वरुपी असतो हे लक्षात ठेवूनच कोणत्याही सरकारने धोरणविषयक निर्णय घ्यायला हवे.

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान