शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची युद्धखोरी

By admin | Updated: January 6, 2015 23:17 IST

पाकिस्तान हे दहशतखोर राष्ट्र आहे आणि तसा शिक्का त्याच्यावर साऱ्या जगानेच आता उमटविला आहे.

पाकिस्तान हे दहशतखोर राष्ट्र आहे आणि तसा शिक्का त्याच्यावर साऱ्या जगानेच आता उमटविला आहे. तरीदेखील अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद रोखण्याचे यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल जाहीर प्रमाणपत्र द्यावे आणि बदल्यात वाढीव मदतही देऊ करावी, ही अमेरिकी सरकारची दुटप्पी परराष्ट्र नीतीदेखील येथे लक्षात घ्यावयाची आहे. पाकिस्तानने भारतावर तीन उघड व तीन छुपी युद्धे लादली आहेत. शिवाय त्याचे सैनिक भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचा भंग करून त्यावर दरदिवशीच गोळीबार करीत आहेत. याच स्वरुपाचा गोळीबार सीमा प्रांतात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु आहे. त्यापायी तब्बल ५७ गावांमधील हजारो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. पाकिस्तानच्या आजवरच्या हिंसाचारात भारताची अनेक निरपराध माणसे व स्त्रिया ठार झाल्या. लष्कराचे आणि सीमा सुरक्षा दलाचे अनेक जवान शहीद झाले. भारताने या प्रकाराकडे गंभीरपणे पहायला सुरूवात केली आणि जशास तसे या धोरणाचा अवलंब केला तेव्हा भारतीय लष्करानेही पाकिस्तानी रेंजर्सचे आणि सैनिकांचे सीमेवर बळी घेतल्याचे दिसले. मात्र सीमेवरील मर्यादित गोळाबारी आणि तीत बळी पडणारी माणसे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना फारसे काही शिकवू शकत नाहीत असाच आजवरचा आपला अनुभव आहे. २६/११ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानी हल्ल्यात १६६ जण मुंबईत ठार झाले. भारतीय पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सारे हल्लेखोर मारले गेले. त्याआधी पाकिस्तानने भारताच्या संसदेवरच आपले हस्तक धाडून तिच्या आवारात मोठा हिंसाचार घडवून आणला. या साऱ्या घटना पाकिस्तानी सरकारच्या नियंत्रणात नसणाऱ्या टोळ््यांकडून घडतात हा त्या सरकारचा खुलासाही आता अविश्वसनीय व हास्यास्पद झाला आहे. काय वाट्टेल ते करून भारताच्या सीमा अस्वस्थ ठेवायच्या आणि जमेल तेव्हा त्यावर रक्तपात घडवून आणायचा हा पाकिस्तानचा आताचा इरादा आहे. त्या देशाचे पहिले अध्यक्ष बॅ. मोहम्मद अली जीना यांच्यापासून सुरू असलेला हा रक्तरंजित मामला आताच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजवटीपर्यंत अखंड सुरू राहिला आहे. १९६५ व १९७१ मध्ये झालेले समोरासमोरचे युद्ध हा याचा जसा एक पुरावा तसा अटलबिहारी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत कारगीलवर झालेला हल्ला हा त्याचा आणखी एक पुरावा ठरावा. या सगळ््याच हल्ल्यात पाकिस्तानला म्हणावे तसे यश कधी हाती लागले नाही आणि त्या हल्ल्यांनी भारतही कधी नामोहरम झालेला दिसला नाही. तरीही पाकिस्तान या दहशतखोरीचा सातत्याने वापर करीत असेल तर त्याचा अर्थ त्याच्या भारतविषयक भूमिकेशीच जुळवावा लागतो. भारत हे आपले शत्रूराष्ट्र आहे आणि त्याच्यापासून आपल्याला धोका आहे एवढी एकच गोष्ट त्या देशाच्या सरकारने आपल्या जनतेच्या गळी उतरविली आहे. त्यासाठी सातत्याने तेथे भारतविरोधी प्रचार सुरू आहे आणि त्या प्रचाराचा एक दर्शनी भाग म्हणूनच सीमेवरचे त्याचे हे हल्लेही सुरू आहेत. या हल्ल्यांचा एकमुस्त बंदोबस्त करणे भारताला सहज शक्य आहे. मात्र भारत तशा आक्रमणाला अद्याप तयार होत नाही याची काही कारणे आहेत. पाकिस्तान हे लष्कराच्या नियंत्रणात असलेले युद्धसज्ज राष्ट्र आहे. शिवाय ते अण्वस्त्रधारी आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते आपल्या अणुबॉम्बचा उपयोग आपण कधीही करू शकतो असे उघडपणे सांगणारे आहेत आणि त्यांच्या त्या उद्दामपणाविषयीचा विश्वास वाटावा असेच त्यांचे वर्तनही आहे. भारतही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. मात्र अण्वस्त्रांचे युद्ध कोणालाही विजयी होऊ देणार नाही आणि ते साऱ्यांचाच विनाश घडवून आणील असे मानण्याची यथार्थ भूमिका भारताची आहे. याच भूमिकेने भारताच्या आजवरच्या साऱ्या राज्यकर्त्यांची मानसिकता तयार केली आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते मात्र नेमक्या या मानसिकतेचा फायदा घेताना दिसत आहेत. एकेकाळी चीनचे राज्यकर्ते माओ-त्से-तुंग म्हणायचे, सारे जग नष्ट झाले तरी चीनची एक तृतीयांश जनता त्यानंतरही शिल्लकच राहणार आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते असे काही म्हणत नसले तरी त्यांचा भारतद्वेष तेवढ्याच टोकाचा आहे. पाकिस्तानचे लष्कर भारताच्या तुलनेत कमी आहे. त्याचे शस्त्रबळही भारताहून कमी आहे. मात्र त्याची अण्वस्त्रे भारताएवढीच विनाशकारी आणि क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याची आहेत. भारतीय राज्यकर्त्यांना आपले पाकिस्ताविषयीचे धोरण आखताना नेमक्या या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. भारताच्या यासंदर्भातील धीमेपणावर अनेकजण नाराज आहेत व ते सरकारवर टीका करणारेही आहेत. अणुयुद्धाची भीषण परिणामकारकता लक्षात घेतल्याखेरीज सरकारी धोरणाचा एकांगी विचार करणारी ही माणसे फारशी गंभीरपणे घ्यायची नसतात. अखेर सरकारची पहिली जबाबदारी देशरक्षण व जनतेच्या जिविताचे रक्षण ही आहे. त्यामुळे आवश्यक तेथे बळाचा वापर आणि जरुर तेथे वाटाघाटी असेच आपले पाकिस्तानविषयक धोरण त्याला आखावे लागणार आहे. यात दुबळेपणा नाही. एक धीरोदात्त व सावध वाटचालच तेवढी आहे. दोन देशांत विश्वासाचे वातावरण हे अजूनही स्वप्न वाटावे असे आहे. मात्र ते वास्तवात उतरावे अशीच आता अपेक्षा आहे.