शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

विरोध हा द्रोहच?

By admin | Updated: March 7, 2016 01:00 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार यांची जामिनावर मुक्तता करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ज्या शर्ती लागू केल्या आहेत

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार यांची जामिनावर मुक्तता करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ज्या शर्ती लागू केल्या आहेत आणि जे निकालपत्र दिले आहे त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली आहे. या निकालपत्रातून एक अर्थ असा काढता येईल की देशविरोधी वक्तव्य करणे हाही एकप्रकारचा देशद्रोहच ठरू शकतो. संसदेवरील हल्ला प्रकरणी फासावर लटकविल्या गेलेल्या अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा देणे अथवा त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणे देशविरोधी असल्याचे आणि विद्यापीठातील शिक्षकांनी इत:पर असे होऊ न देण्याची काळजी घेण्याचे आवाहनदेखील याच निकालपत्राद्वारे केले गेले आहे. विद्यापीठाच्या आवारात गेल्या नऊ तारखेस ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यांच्यामागे कन्हैया होता अथवा नाही यावर टिप्पणी न करता (कारण तपास जारी आहे) तशा घोषणा देण्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली संरक्षण मिळू शकत नाही, असे या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु न्यायालयाच्या या अभिप्रायास कन्हैयाने लगेचच छेद दिला आहे. मुक्ततेनंतर त्याने केलेल्या भाषणात वा मुलाखतींमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की, अफझल गुरूहा काश्मीरचा म्हणजे भारताचा नागरिक होता आणि त्यामुळे त्याला झालेल्या शिक्षेची चर्चा करण्याची मुभा राज्यघटनेने दिली आहे. येथे निश्चितच विसंवाद निर्माण होतो. अफझल गुरू यास झालेल्या शिक्षेबाबत चर्चा करणे वा विरोधी घोषणा देणे हे जर देशविरोधी असेल तर देशाच्या माजी पंतप्रधानांची अत्यंत निर्ममतेने हत्त्या करणाऱ्या आणि शिक्षा भोगणाऱ्या मारेकऱ्यांचा कळवळा येऊन तामिळनाडू राज्यातील दोन्ही प्रतिस्पर्धी पक्ष केवळ या मुद्द्यावर एकत्र येतात व राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी पुन:पुन्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या या प्रयत्नांना नेमके काय म्हणायचे असते? जामिनावर मुक्त झाल्यानंतर कन्हैयाने देशातील विद्यमान सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे हा त्याचा मूलभूत हक्क असताना त्याची जिव्हा कापून आणणारास पाच लाखांच,े तर प्राण हरण करणारास अकरा लाखांचे इनाम जाहीर करणारा भाजपा युवा मोर्चाचा कुणी कुलदीप वा आदर्श यांच्या या धमक्यांची संभावना तरी कशी करायची असते? परंतु तितकेच कशाला, विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मध्यंतरी परदेश दौऱ्यावर असताना आपण सत्तेत येण्यापूर्वी भारतात जन्मणे लोकांना लज्जास्पद वाटत होते असे जे विधान केले होते ते देशप्रेमाचे म्हणायचे की देशविरोधी? भले त्यांचा रोख काँग्रेस राजवटीकडे असेल पण त्यात ओढला गेला होता तो देशच! देशात आजही अधूनमधून सहिष्णुता आणि असहिष्णुतेची चर्चा होत असते. जनसामान्यांच्या व्याख्येत सहिष्णुता म्हणजे चक्क डोळेझाक करणे वा दुर्लक्ष करणे. मोदी सरकार वा या सरकारच्या दिल्लीतील पोलिसांनी कन्हैयाच्या बाबतीत अशीच जराशी ‘सहिष्णुता’ दाखविली असती तर देशात वा परदेशात कशाला, खुद्द दिल्लीतदेखील कोण कन्हैयाकुमार हे कोणाला कळलेही नसते.