शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वयंसुधारणेला संधी !

By किरण अग्रवाल | Updated: August 15, 2018 15:23 IST

परदु:ख जाणून घेतल्याखेरीज स्वत:च्या चिंता वा विवंचनेची तीव्रता कमी होत नाही.

परदु:ख जाणून घेतल्याखेरीज स्वत:च्या चिंता वा विवंचनेची तीव्रता कमी होत नाही. गुरु, गुरुजी, बुवा-बाबाच काय; मोटिव्हेशनल स्पीकर, म्हणजे प्रेरक वक्ते म्हणून हितोपदेश करणारेही तेच सूत्र मांडत असतात, जे महात्मा गांधीजींच्या ‘पिड परायी जाने रेऽ’शी नाते सांगत असते. मर्यादांची वेस ओलांडून पुढे पाऊल टाकल्याशिवाय व संकुचिततेतून बाहेर पडून स्वत:ला मोठ्या प्रवाहात समाहित करून घेतल्याखेरीज त्याची अनुभूती येत नसते. यशाची पायरी गाठण्यासाठी तुलनेच्या झोपाळ्यावर झुलणे त्यासाठीच गरजेचे असते. कोणत्याही स्पर्धा अगर सर्वेक्षणात सहभागी होऊन आपण नेमके कुठे आहोत, हे जाणून घेण्याचे प्रयत्नही याच अनुभूतीच्या कक्षेत मोडणारे असतात, म्हणूनच जगण्यासाठी सुगम ठरणारी शहरे निवडण्याकरिता देशभरात केले गेलेले सर्वेक्षण व त्यातील निष्कर्षांकडे याच भूमिकेतून बघता यावे.

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने यंदा प्रथमच देशातील ‘इझ आॅफ लिव्हिंग’ म्हणजेच जगण्यासाठी सुखावह अथवा सुगम अशा १११ शहरांचा सर्व्हे करून गुणानुक्रमानुसार त्याची यादी घोषित केली आहे. यात राज्यातील आठ शहरांचा समावेश असून, त्यातील निम्मी म्हणजे चार शहरे तर ‘टॉप-१०’ मध्ये आली आहेत. राज्यातील या आठ किंवा देशातील १११ शहरांखेरीज अन्य शहरे राहण्या किंवा जगण्यासाठी सुखावह नाहीत, असाही याचा अर्थ लावता येईल व कुठे व कुणास आले अच्छे दिन असा सवालही उपस्थित करता येईल; परंतु याकडे तसे न पाहता अन्य शहरांमधील जीवनमान कसे व कोणत्या आधारावर उंचावता येईल, या दृष्टिकोनातून पाहता यावे. कारण, त्या त्या शहरातील प्रशासन, सामाजिक संस्था व त्याद्वारे केले जाणारे काम, आर्थिक स्थिती आणि पायाभूत सुविधा अशा निकषांअंतर्गत तब्बल ७८ मुद्द्यांवर हे सर्वेक्षण केले गेले व प्रत्येक शहरातील सुमारे ६० हजारांवर नागरिकांची मते जाणून घेऊन त्याआधारे निष्कर्ष काढले गेले आहेत. त्यामुळे तुलनात्मकतेतून सिद्ध व सादर केली गेलेली सुगमता आत्मपरीक्षणाला तसेच स्वयंसुधारणेला संधी देणारीच म्हटली पाहिजे.

महत्त्वाचे म्हणजे, पुणे आता ‘आक्टोपस’ प्रमाणे वाढलेय, तेथील ट्रॅफिक डोकेदुखीची ठरते, असे कितीही म्हटले जात असले तरी जगण्यासाठीच्या सुखावहतेत पुणे देशात अव्वल, सर्वोत्तम ठरले आहे, हा केवळ पुण्याचाच नव्हे; राज्याच्याही अभिमानाचा विषय ठरावा. नवी मुंबई व बृहन्मुंबई ही शहरेही अनुक्रमे द्वितीय व तृतीयस्थानी असल्याने ‘टॉप-३’चा मान महाराष्ट्राला लाभला आहे. या यादीत ठाणे सहाव्या क्रमांकावर असून, वसई-विरार विसाव्या तर नाशिक एकविसाव्या स्थानी आहे. नाशिक पाठोपाठ सोलापूर २२ व्या क्रमांकावर आहे. सदरचे सर्वेक्षण जगण्यासंबंधीचे असले तरी, तुलनेतील सुखावहता अशी की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेले बनारस ३३ व्या, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम टाउन’ नागपूर हे ३१ व्या क्रमांकावर आहेत. म्हणजे देशाचे व राज्याचे नेतृत्व करणारे आपल्या शहरांना तितके राहण्यायोग्य करू शकले नाहीत जितके त्यापुढील शहरांनी सिद्ध केले.

तुलनात्मकदृष्ट्या विचार करता ही बाबदेखील लक्षात घेता येणारी आहे की, अहमदाबाद (२३), हैदराबाद (२७), बंगळुरू (५८) व दिल्ली (६५) पेक्षाही महाराष्ट्रातील ठाणे, वसई-विरार, नाशिक व सोलापूर पुढे आहेत. यात पुन्हा अहमदाबाद म्हणजे पंतप्रधानांचा गढ. पण, टॉप-१० मध्ये गुजरातेततील एकही शहर येऊ शकले नाही. मोदींच्याच राज्यात विकास पराभूत झाल्याच्या आरोपाला पुन्हा संधी देणारीच ही बाब ठरावी. अर्थात, देशातील ‘स्मार्ट सिटी’च्या स्पर्धेत असलेल्या शंभर शहरांचा यात प्रामुख्याने समावेश केला गेल्याने इतर शहरांना आपली सुखावहता सिद्ध करायला फारशी संधी मिळाली नाही, पण यातील निकष लक्षात घेता आगामी काळात सर्वेक्षणाबाहेरील शहरांनाही तयारीला लागता येईल. विशेषत: मुंबई-पुण्यासोबतच्या सुवर्ण त्रिकोणात गणले जाणारे नाशिक २१ व्या क्रमांकावर राहिले, अशा शहरांनाही पायाभूत सुविधा व प्रशासनिक सुधारणेला यानिमित्ताने दिशा मिळावी. त्यादृष्टीने या सर्वेक्षणाकडे पाहिले गेले, तरच त्यामागील उद्देशपूर्ती घडून येऊ शकेल.