शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

संधीसाधूंचे राजकारण!

By admin | Updated: February 6, 2017 00:05 IST

हरियाणामधील एक आमदार गयालाल यांनी १९६७ मध्ये एकाच दिवशी तीन पक्ष बदलले. या प्रकरणात हरियाणा जनहित पार्टीने न्यायालयात धाव घेतली होती.

हरियाणामधील एक आमदार गयालाल यांनी १९६७ मध्ये एकाच दिवशी तीन पक्ष बदलले. या प्रकरणात हरियाणा जनहित पार्टीने न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणाचा निकाल देताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ‘आयाराम-गयाराम’ असा शब्दप्रयोग सर्वप्रथम केला होता. तेव्हापासून भारतीय राजकारणाला नवा वाक्प्रचार मिळाला. त्यानंतर हा वाक्प्रचार म्हणजे राजकारणाचे प्राक्तन ठरले आहे. सध्या सुरू असलेल्या राज्यातील महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये अशा आयाराम-गयारामांची संख्या फक्त वाढलेलीच दिसते असे नाही, तर त्यांच्या राजकीय कोलांटउड्यांना ‘स्टेटस’ मिळू लागल्याने आता ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरुद कोणत्याच पक्षाला मिरवता येणार नाही. राजकारणाच्या बदलत्या प्रवाहामध्ये कार्यकर्त्यांच्या निष्ठा जशा हरवत चालल्या आहेत, तसा नेत्यांचा कार्यकर्त्यांवरील विश्वासही कमी होत चालला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकाही पक्षाने उमेदवारी जाहीर करण्याचा धोका पत्करला नाही. ज्या ठिकाणी अशा याद्या आधी जाहीर झाल्या, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘राडे’ केले. पुण्यात तर नाराज कार्यकर्ते चक्क उपोषणास बसले. हा सर्व प्रकार राजकारणाला नवा नाही; मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा किती टोकाच्या झाल्या आहेत, याचे प्रत्यंतर आले. राजकारणात काम करायचे असेल, तर आधी समाजकार्य केले पाहिजे, हा धडा आता गिरवला जात नाही. नावापुरता झाडू हाती घेतला, एखाद-दोन रक्तदान शिबिरे, एखादी क्रीडा स्पर्धा किंवा महिला मेळावा घेतला म्हणजे समाजकार्याचा ‘कोटा’ पूर्ण झाला अन् निवडणुकीची पूर्वतयारी झाली, हाच कार्यकर्त्यांचा विचार झाला आहे. नेत्यांनीही त्यांच्या सोयीसाठी हा समज कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवला; पण अनेक कार्यकर्ते एकाच महत्त्वाकांक्षेने भारित झाले की जो गोंधळ उडतो, तो काल उभ्या महाराष्ट्राने पाहिला. अवघे सात-साडेसात हजार रुपये महिना मानधन असलेले नगरसेवकाचे पद मिळविण्यासाठी ज्या पद्धतीने लाखोंची उधळण केली जाते, ती पाहता त्यामागचा उद्देश सर्वसामान्यांपासून लपून राहत नाही. समाजसेवेसाठी राजकारण करण्याची कितीही भलावण केली जात असली, तरी अशा समाजसेवेचा वसा घेण्यासाठी आपल्या पक्षाने तिकीट नाकारताच दुसऱ्या पक्षाच्या दारात जाण्यामध्ये कुणालाही गैर वाटत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी पाच वर्षे सतरंज्या उचलल्या, त्यांना बाजूला सारत आयारामांसाठी पायघड्या टाकण्यात राजकीय पक्षांनाही चुकीचे वाटत नाही. यामुळे प्रत्येक पक्षातून निष्ठावंत कार्यकर्ते कमी होतील. राजकारण हे ‘मनी अ‍ॅण्ड मसल पॉवर’चे झालेच आहे. ते पुढे फक्त आणि फक्त संधीसाधूंचेच होईल!