शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

संधीसाधूंचे राजकारण!

By admin | Updated: February 6, 2017 00:05 IST

हरियाणामधील एक आमदार गयालाल यांनी १९६७ मध्ये एकाच दिवशी तीन पक्ष बदलले. या प्रकरणात हरियाणा जनहित पार्टीने न्यायालयात धाव घेतली होती.

हरियाणामधील एक आमदार गयालाल यांनी १९६७ मध्ये एकाच दिवशी तीन पक्ष बदलले. या प्रकरणात हरियाणा जनहित पार्टीने न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणाचा निकाल देताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ‘आयाराम-गयाराम’ असा शब्दप्रयोग सर्वप्रथम केला होता. तेव्हापासून भारतीय राजकारणाला नवा वाक्प्रचार मिळाला. त्यानंतर हा वाक्प्रचार म्हणजे राजकारणाचे प्राक्तन ठरले आहे. सध्या सुरू असलेल्या राज्यातील महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये अशा आयाराम-गयारामांची संख्या फक्त वाढलेलीच दिसते असे नाही, तर त्यांच्या राजकीय कोलांटउड्यांना ‘स्टेटस’ मिळू लागल्याने आता ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरुद कोणत्याच पक्षाला मिरवता येणार नाही. राजकारणाच्या बदलत्या प्रवाहामध्ये कार्यकर्त्यांच्या निष्ठा जशा हरवत चालल्या आहेत, तसा नेत्यांचा कार्यकर्त्यांवरील विश्वासही कमी होत चालला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकाही पक्षाने उमेदवारी जाहीर करण्याचा धोका पत्करला नाही. ज्या ठिकाणी अशा याद्या आधी जाहीर झाल्या, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘राडे’ केले. पुण्यात तर नाराज कार्यकर्ते चक्क उपोषणास बसले. हा सर्व प्रकार राजकारणाला नवा नाही; मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा किती टोकाच्या झाल्या आहेत, याचे प्रत्यंतर आले. राजकारणात काम करायचे असेल, तर आधी समाजकार्य केले पाहिजे, हा धडा आता गिरवला जात नाही. नावापुरता झाडू हाती घेतला, एखाद-दोन रक्तदान शिबिरे, एखादी क्रीडा स्पर्धा किंवा महिला मेळावा घेतला म्हणजे समाजकार्याचा ‘कोटा’ पूर्ण झाला अन् निवडणुकीची पूर्वतयारी झाली, हाच कार्यकर्त्यांचा विचार झाला आहे. नेत्यांनीही त्यांच्या सोयीसाठी हा समज कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवला; पण अनेक कार्यकर्ते एकाच महत्त्वाकांक्षेने भारित झाले की जो गोंधळ उडतो, तो काल उभ्या महाराष्ट्राने पाहिला. अवघे सात-साडेसात हजार रुपये महिना मानधन असलेले नगरसेवकाचे पद मिळविण्यासाठी ज्या पद्धतीने लाखोंची उधळण केली जाते, ती पाहता त्यामागचा उद्देश सर्वसामान्यांपासून लपून राहत नाही. समाजसेवेसाठी राजकारण करण्याची कितीही भलावण केली जात असली, तरी अशा समाजसेवेचा वसा घेण्यासाठी आपल्या पक्षाने तिकीट नाकारताच दुसऱ्या पक्षाच्या दारात जाण्यामध्ये कुणालाही गैर वाटत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी पाच वर्षे सतरंज्या उचलल्या, त्यांना बाजूला सारत आयारामांसाठी पायघड्या टाकण्यात राजकीय पक्षांनाही चुकीचे वाटत नाही. यामुळे प्रत्येक पक्षातून निष्ठावंत कार्यकर्ते कमी होतील. राजकारण हे ‘मनी अ‍ॅण्ड मसल पॉवर’चे झालेच आहे. ते पुढे फक्त आणि फक्त संधीसाधूंचेच होईल!