शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

महाराष्ट्राचे दरवाजे उघडा..!

By admin | Updated: November 2, 2014 01:59 IST

विकासाकडे नेणारे आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य अशी घोषणा देत भाजपा सत्तेत आला आहे. मंत्नालयातील प्रत्येक मजल्यावर असलेला आणि प्रत्येक फाइलखाली असलेला भ्रष्टाचार काही लपून राहिलेला नाही.

विकासाकडे नेणारे आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य अशी घोषणा देत भाजपा सत्तेत आला आहे. मंत्नालयातील प्रत्येक मजल्यावर असलेला आणि प्रत्येक फाइलखाली असलेला भ्रष्टाचार काही लपून राहिलेला नाही. आपण ‘एक खिडकी’ योजना राबवून देखील भ्रष्टाचार कमी झालेला नाही. आता त्याच्या जागी ‘ओपन डोअर’ पॉलिसीचा विचार व्हायला पाहिजे. त्याने पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’च्या मोहिमेला महाराष्ट्रातून एक दिशा मिळू शकते. 
 
 
कास या एका शब्दावर देश ढवळून काढणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि महाराष्ट्रात सत्ताबदल घडवून आणला आणि महाराष्ट्रानेसुद्धा अस्मिता व कुठल्याही भावनात्मक विषयांना थारा न देता त्यांच्या पारडय़ात घवघवीत यश घातले. त्यामुळे महाराष्ट्राच्या अपेक्षा अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडून जरा जास्तच वाढलेल्या आहेत, असं म्हटले तर चुकीचे होणार नाही. नव्हे, त्या रास्तच आहेत.
महाराष्ट्र ही देशाची औद्योगिक आणि मुंबई आर्थिक राजधानी समजली जाते; तरी अजूनही आपल्याला एकाही उद्योग क्षेत्नात स्वत:ची अशी एक खास जागतिक ओळख निर्माण करता आलेली नाही, हे मोठे दुर्दैव. म्हणून त्या अर्थाने आपली अजूनही खरी प्रगती झालीच नाही़ कारण यशवंतराव चव्हाणांनंतर एकही दुरदर्शी नेतृत्व महाराष्ट्राला ख:या अर्थाने लाभलेलेच नाही. अगदी सहकार क्षेत्नाचं उदाहरण द्यायचे तर बाजूच्या गुजरातने त्याच सहकारातून ‘अमूल’ निर्माण करून स्वत:च जागतिक स्तरावर स्थान मिळवले. जे त्यांना एका उत्पादनातून जमले ते आपल्याला साखर, ऊस, कापूस आणि इतर उत्पादनात का मिळाले नाही? सहकार क्षेत्नानंतर आपण उच्च शिक्षणात काम करण्याचा प्रयत्न केला; पण अजूनही आपण जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था घडवू शकलो नाही. आमच्या राज्यकत्र्यानी फक्त मुंबईचे भूखंड विकले! म्हणून आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते श्रीमंत आणि राज्य कर्जबाजारी, असं विदारक दृश्य बघायला मिळते आहे.
गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ केला आह़े निदान त्यांना साथ म्हणून तरी महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्नाला निश्चित दिशा देणो गरजेचे आहे. जे काम मोदींनी गुजरातमध्ये केले आणि जे चंद्राबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशात केले, ते आपल्याला 
का जमू नये? महाराष्ट्रात आज मीडिया अॅण्ड एनटरटेन्मेंट (मुंबई), पर्यटन (कोकण) आणि शिक्षणात (पुणो) अशा क्षेत्नांत मूलभूत काम झालेले आहे, पण अजून भरपूर काम करण्यासारखे आहे. या तिन्ही उद्योगांतून मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते.
महाग वीज, जमीन, एलबीटी/ऑक्ट्रॉय यांसारखे असंख्य विषय आहेत. तसेच हजारो आजारी उद्योग व लहान उद्योगांना भेडसावणा:या समस्या काय आहेत, त्याचा नीट अभ्यास करून उपाययोजना करणो गरजेच आहे. झपाटय़ाने निर्णय घ्यावे लागतील. 
                       (लेखक कॉर्पोरेट लॉयर आहेत.)
 
- नितीन पोतदार