शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

महाराष्ट्राचे दरवाजे उघडा..!

By admin | Updated: November 2, 2014 01:59 IST

विकासाकडे नेणारे आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य अशी घोषणा देत भाजपा सत्तेत आला आहे. मंत्नालयातील प्रत्येक मजल्यावर असलेला आणि प्रत्येक फाइलखाली असलेला भ्रष्टाचार काही लपून राहिलेला नाही.

विकासाकडे नेणारे आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य अशी घोषणा देत भाजपा सत्तेत आला आहे. मंत्नालयातील प्रत्येक मजल्यावर असलेला आणि प्रत्येक फाइलखाली असलेला भ्रष्टाचार काही लपून राहिलेला नाही. आपण ‘एक खिडकी’ योजना राबवून देखील भ्रष्टाचार कमी झालेला नाही. आता त्याच्या जागी ‘ओपन डोअर’ पॉलिसीचा विचार व्हायला पाहिजे. त्याने पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’च्या मोहिमेला महाराष्ट्रातून एक दिशा मिळू शकते. 
 
 
कास या एका शब्दावर देश ढवळून काढणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि महाराष्ट्रात सत्ताबदल घडवून आणला आणि महाराष्ट्रानेसुद्धा अस्मिता व कुठल्याही भावनात्मक विषयांना थारा न देता त्यांच्या पारडय़ात घवघवीत यश घातले. त्यामुळे महाराष्ट्राच्या अपेक्षा अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडून जरा जास्तच वाढलेल्या आहेत, असं म्हटले तर चुकीचे होणार नाही. नव्हे, त्या रास्तच आहेत.
महाराष्ट्र ही देशाची औद्योगिक आणि मुंबई आर्थिक राजधानी समजली जाते; तरी अजूनही आपल्याला एकाही उद्योग क्षेत्नात स्वत:ची अशी एक खास जागतिक ओळख निर्माण करता आलेली नाही, हे मोठे दुर्दैव. म्हणून त्या अर्थाने आपली अजूनही खरी प्रगती झालीच नाही़ कारण यशवंतराव चव्हाणांनंतर एकही दुरदर्शी नेतृत्व महाराष्ट्राला ख:या अर्थाने लाभलेलेच नाही. अगदी सहकार क्षेत्नाचं उदाहरण द्यायचे तर बाजूच्या गुजरातने त्याच सहकारातून ‘अमूल’ निर्माण करून स्वत:च जागतिक स्तरावर स्थान मिळवले. जे त्यांना एका उत्पादनातून जमले ते आपल्याला साखर, ऊस, कापूस आणि इतर उत्पादनात का मिळाले नाही? सहकार क्षेत्नानंतर आपण उच्च शिक्षणात काम करण्याचा प्रयत्न केला; पण अजूनही आपण जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था घडवू शकलो नाही. आमच्या राज्यकत्र्यानी फक्त मुंबईचे भूखंड विकले! म्हणून आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते श्रीमंत आणि राज्य कर्जबाजारी, असं विदारक दृश्य बघायला मिळते आहे.
गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ केला आह़े निदान त्यांना साथ म्हणून तरी महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्नाला निश्चित दिशा देणो गरजेचे आहे. जे काम मोदींनी गुजरातमध्ये केले आणि जे चंद्राबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशात केले, ते आपल्याला 
का जमू नये? महाराष्ट्रात आज मीडिया अॅण्ड एनटरटेन्मेंट (मुंबई), पर्यटन (कोकण) आणि शिक्षणात (पुणो) अशा क्षेत्नांत मूलभूत काम झालेले आहे, पण अजून भरपूर काम करण्यासारखे आहे. या तिन्ही उद्योगांतून मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते.
महाग वीज, जमीन, एलबीटी/ऑक्ट्रॉय यांसारखे असंख्य विषय आहेत. तसेच हजारो आजारी उद्योग व लहान उद्योगांना भेडसावणा:या समस्या काय आहेत, त्याचा नीट अभ्यास करून उपाययोजना करणो गरजेच आहे. झपाटय़ाने निर्णय घ्यावे लागतील. 
                       (लेखक कॉर्पोरेट लॉयर आहेत.)
 
- नितीन पोतदार