शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

...तरच स्त्रिया खऱ्या अर्थाने सुरक्षित!

By admin | Updated: May 8, 2016 02:03 IST

स्त्री आणि पुरुष दोघंही समान आहेत. प्रकृती - पुरुष या २ तत्त्वांवर निसर्गचक्र चालू आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले अशा थोर व्यक्तींनी स्त्री-सुधारणेसाठी आयुष्य वेचलं, हे आपला इतिहास

- अश्विनी एकबोटेस्त्री आणि पुरुष दोघंही समान आहेत. प्रकृती - पुरुष या २ तत्त्वांवर निसर्गचक्र चालू आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले अशा थोर व्यक्तींनी स्त्री-सुधारणेसाठी आयुष्य वेचलं, हे आपला इतिहास सांगतो. तरी, आपल्याला स्त्रीचा सन्मान करा, आदर करा हे शिकवावं लागतंय यासारखी लज्जास्पद ती दुसरी कुठली गोष्ट असेल?स्त्री पुरुषापेक्षा कधीच कमी नव्हती, कमी नाही. हे सिद्ध करायची काहीच गरज नाही. आपण हे सिद्ध करण्याचा अट्टाहास करतो. याचाच अर्थ कुठेतरी आपण हे मान्य केल्यासारखं होतं. परत हे सिद्ध करण्यासाठी कुठला मार्ग अवलंबतो हेही महत्त्वाचं आहे. उत्तम मार्ग म्हणजे आपल्या क्षेत्रात इतक्या उंचीला पोचायचं की पर्यायच ठेवायचा नाही. ज्या स्त्रिया मोठ्या झाल्या त्यांनी ‘आधी केलं मग सांगितलं!’ नुसती बडबड केली नाही, तर स्वबळावर मोठ्या झाल्या, त्या सगळ्यांनी खरा पुरुषार्थ जाणला. फक्त विरोधाला विरोध करून समाज परिवर्तन होत नसतं. २०१५ची गोष्ट, परदेशी महिलेसमोर एका भारतीय पुरुषाने अश्लील चाळे केले. तिने अत्यंत हुशारीने स्वत:च्या मोबाइलवर त्याचं शूटिंग केलं आणि ट्विटरवर टाकलं. त्या पुरुषाला लगेच पकडण्यात आलं आणि शिक्षाही झाली. खूप आनंद झाला. ‘अतिथी देवो भव:’ अशी आपली भारतीय संस्कृती. ती मातीत मिळवणारी आपलीच काही असंस्कृत माणसं. या परदेशी माणसांना लुटतात तरी किंवा त्या बायकांकडे अशा पद्धतीने पाहतात. बरं ही माणसं दुसऱ्या देशात गेली तरी देशाला बदनाम करायला मागेपुढे पाहत नाहीत, मग बाहेरच्या देशात सगळ्या भारतीयांना एकाच मोजपट्टीने मोजतात. त्यांना तरी काय बोलणार? असो. मनात आलं की जितकी झटपट त्याला शिक्षा झाली तशी, ज्या महिलांवर, चिमुकल्यांवर बलात्कार झाले त्यांचे निर्णय मात्र का रखडतात? परदेशी पाहुण्यांबरोबर असं वागल्यावर इतक्या पटकन निर्णय होत असतील तर आपल्या भारतीय महिलांबाबतीत तर क्षणात कृती व्हायला हवी. अश्लील चाळे केल्यावर जर तुरुंगवास तर बलात्काराला मृत्युदंडच हवा. कायद्याला भावना कळत नाहीत म्हणे! अरे, पण ज्या लोकांसाठी कायदा बनवला त्यांना त्याचा उपयोग नसेल आणि मग संतप्त होऊन एखाद्याने भलतंसलतं केलं तर, कायद्याने न्यायही मिळणार नाही आणि कायदा हातातही घ्यायचा नाही. फक्त मुस्कटदाबी सहन करायची.भारतात ३ मिनिटांना १ बलात्कार अशी आकडेवारी समोर येते. पण, दुबई-सिंगापूरला असे गैरवर्तन खपवूनच घेतलं जात नाही. कारण तिथे कायद्याची भीती आहे, बलात्काराला देहदंड होतो. सिंगापूरला मला एका पुरुषाचा चुकून धक्का लागला, तो मला किमान ४ वेळातरी सॉरी म्हणाला, त्याच्या डोळ्यांत दिलगिरी होती, आदर होता, आणि भीतीही! आपल्याकडे चुकून धक्का लागला तर माफी मागणं तर लांबचीच गोष्ट, उलट काही झालंच नाही असा आव आणतात. मला मुंबईतील घटना आठवते. मुंबईहून पुण्याला निघाले होते. ३ पुरुषांनी एक टॅक्सी शेअर केली. मी एकटीच होते. त्या ड्रायव्हरने तिघांना विनंती केली की, ही बाई आहे. तिला पुढे बसू दे. एक म्हणाला, मी आधी आलोय, पैसे दिलेत. मी मागे बसणार नाही. मागचा म्हणाला, मी विंडो सिट सोडणार नाही. त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, तुमचे पैसे परत घ्या, मला जायचंच नाही, तुमच्या घरी आई-बहीण नाही का? त्यावर ती माणसं म्हणाली, पैसे परत घेणार नाही, याच गाडीतून, याच सिटवर बसून जाणार! आम्हाला शिकवू नकोस, आमच्याही घरी बायका आहेत, आम्हाला कळतो स्त्रिचा सन्मान कसा करायचा ते. हे सगळं पाहून मला हसायला आलं. म्हटलं, यांना फक्त घरातल्या स्त्रियांचा आदर करायला शिकवलं वाटतं? तेही खरं का खोटं कुणास ठाऊक? शिक्षण फक्त पुस्तकातच राहिलं, आचारांत-विचारांत संस्कार उतरलेच नाहीत. पुरोगामित्व विचारात असायला हवं. माणसाचे विचार बदलले तरच समाज कृतिशील होईल. आता माणसांच्या मनाची कवाडं, डोळ्यांवरची बुरसटलेली झापडं कशी उघडतील यावर काम करायला हवं. आपण सगळ्यांनी आता सुरुवात केली तर कदाचित ४० वर्षांनंतर जन्माला येणाऱ्या आपल्या मुली खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी, सुरक्षित सबला नारी असतील.