शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भारतीयत्व टिकविणे हाच धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:49 IST

गुजरात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अस्ताचा काळ सुरू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर लोकसभेत ८० जागा कमी होतील असे राजकारण्यांना वाटू लागले, म्हणून भाजपाने नव्या नीतीने राजकारण करायचे ठरविले. शासन चालविण्यास भाजपाचे सरकार कुचकामी ठरले हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

- डॉ. कुमार सप्तर्षीगुजरात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अस्ताचा काळ सुरू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर लोकसभेत ८० जागा कमी होतील असे राजकारण्यांना वाटू लागले, म्हणून भाजपाने नव्या नीतीने राजकारण करायचे ठरविले. शासन चालविण्यास भाजपाचे सरकार कुचकामी ठरले हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. धोरणात्मक राजकारण दूर सारून केवळ ठरावीक जाती, समुदायात भेद निर्माण करून त्या ऐंशी जागा भरून काढण्याचा विचार सुरू झाला. मोंदीनी यापूर्वीही जातीय ध्रुवीकरणातून विजय मिळविला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाज आणि दलित वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही गटांमध्ये द्वेष पसरविण्याचा कटू डाव रचण्यात आला आणि मुख्य म्हणजे द्वेष पसरण्यासाठी हिंसा महत्त्वाची असते. कारण हिंसा पसरली की, माणसांना त्याचा सहजासहजी विसर पडत नाही. या माध्यमातून समाजाचे तुकडे करण्याचे त्यांनी ठरविले, या संपूर्ण घटनेमागे गुजरात निवडणुकीच्या निकालाचा पॅटर्न आहे.गुजरातमध्ये मोंदीनी जेथे ओबीसी मतदार अधिक तेथे पटेलांविरोधात भाषणे केली आणि जेथे पटेल मतदार जास्त आहेत, तेथे याउलट प्रचार केला. त्यामुळे राज्यात सतेत्त असलेल्या अल्प मताच्या सत्ताधा-यांनी मराठ्यांना उचकवण्यासाठी कोरेगाव भीमाची घटना घडवून आणली. या घटनेत एका गटाने इतिहासाला आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. कारण मागच्या पिढीने काही तरी विचार करूनच समाधी बांधण्याचे निर्णय घेतले होते. मात्र त्या घटनेला शौर्य मानून दलित वर्ग ‘विजय दिन’ साजरा करत असेल तर ही भूमिका चुकीची आहे. कारण त्याच दिवशी परकीय शत्रूंनी आपल्या देशात आगमन केले होते आणि त्यानंतर कैक वर्षे आपली मातृभूमी त्यांच्या गुलामगिरीत होती. या घटनेतील सर्वांत मोठी विसंगती अशी होती की जेव्हा स्वकीय अत्याचार करू लागतात, तेव्हा परकीय जवळचे वाटू लागतात.या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन अतिशय गंभीर आहे. या सर्व घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभावी परिणाम दिसून येतो आहे. ज्या वेळी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्या वेळी देशात शांतता, सुरक्षितता ठेवायची अशी ठाम भूमिका पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. एखाद्या राज्यातील राज्यकर्त्यांना हे जमत नाही, तेव्हा केंद्राने जबाबदारी घेऊन पुढाकार घेतला पाहिजे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी जाणीवपूर्वक कोणतीच भूमिका घेतली नाही. राज्यातील सद्य:स्थिती लक्षात घेता हे धार्मिक राजकारण नसून जातीपातीचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्म म्हणजे त्या - त्या काळात तिथले लोक जोडण्यासाठी जे सांगतात तो धर्म असतो आणि माणसाला माणसापासून तोडण्यासाठी जे केले जाते त्याला अधर्म म्हणतात.या घटनेचा सर्वसमावेशक विचार करता निळा, भगवा आणि हिरव्या रंगाचा वैयक्तिक विचार करण्याऐवजी सर्व रंगांना आपल्या तिरग्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. म्हणजेच, कोणत्याही एका रंगापुरते मर्यादित न राहता आपण भारतीय आहोत. भारतीय असणे आणि भारतीयत्व टिकवून ठेवणे हाच खरा धर्म आहे, हा विचार आजच्या समाजावर बिंबविला पाहिजे. या विचारांच्या व्यक्तींनी समाजात सक्रिय होऊन क्रियाशील पद्धतीने नव्या पिढीसाठी काम केले पाहिजे. जेणेकरून जात, धर्म, पंथ या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन समाज केवळ ‘भारतीय’ म्हणून विचार करण्यास सुरुवात करेल, त्या वेळेस ख-या अर्थाने तो ‘विकासा’कडे पाऊल टाकेल.(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

(शब्दांकन - स्नेहा मोरे)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी