शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

एकपक्षीय राजवट?

By admin | Updated: April 17, 2017 01:05 IST

भारतीय जनता पार्टीला उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हटले जाते. भाजपाने राजकीय वाटचालीस प्रारंभ करताना गांधीवादी समाजवाद या गोंडस नावाने समाजवादी विचारसरणीचा अंगीकार केल्याची

भारतीय जनता पार्टीला उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हटले जाते. भाजपाने राजकीय वाटचालीस प्रारंभ करताना गांधीवादी समाजवाद या गोंडस नावाने समाजवादी विचारसरणीचा अंगीकार केल्याची धूळफेक केली असली तरी, त्या पक्षाची एकूणच वाटचाल उजव्या विचारसरणीचीच राहिली आहे. स्वाभाविकरीत्या त्या पक्षाला डाव्या विचारसरणीचे वावडे आहे. विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या सरकारला डाव्या पक्षांच्या सोबतीने समर्थन देण्याचा प्रयोग भाजपाने कधीकाळी कॉँग्रेसच्या द्वेषापोटी केला असला तरी, साम्यवादी पक्षांशी भाजपाचे कधीच जमले नाही. ज्या देशांनी साम्यवादी विचारसरणीचा अधिकृतरीत्या अंगीकार केला, त्या सर्वच देशांमध्ये एकपक्षीय प्रणाली आहे. उजवा पक्ष म्हणून भाजपा मात्र स्वत:ला लोकशाही व्यवस्थेचा समर्थक म्हणवितो. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी भुवनेश्वरमध्ये पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीस संबोधित करताना बोलून दाखवलेली महत्त्वाकांक्षा मात्र लोकशाही व्यवस्थेचे समर्थन करण्याच्या भूमिकेस अप्रत्यक्षरीत्या छेद देणारी होती. पंचायतींपासून केंद्र सरकारपर्यंत प्रत्येक स्तरावर केवळ भाजपाच्या हातीच सत्ता असली पाहिजे, अशी मनीषा त्यांनी बोलून दाखवली. सर्वंकष सत्ता भाजपाच्याच हाती एकवटली पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगण्याचा शाह यांनाही अधिकार आहे. लोकशाही मार्गाने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा पक्ष करणार असेल, तर त्यामध्येही काही वावगे नाही; पण सत्ता भ्रष्ट बनवते आणि सर्वंकष सत्ता संपूर्णत: भ्रष्ट बनवते, हे एकोणविसाव्या शतकातील ब्रिटिश राजनेता लॉर्ड अ‍ॅक्टन यांचे वचन विसरून चालणार नाही. शाह उजव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करीत असले तरी, लोकशाही मार्गांचा अवलंब करून का होईना, पण साम्यवादी देशांप्रमाणे एकपक्षीय राजवट स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न दिसते. या देशातील जनता गरीब व बरीचशी निरक्षर असली तरी सुज्ञ आहे. त्यामुळे शाह यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही; पण समजा खरेच त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, तर या देशातील बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था तग धरू शकेल का? भारताचा अपवाद वगळता, दक्षिण आशियातील प्रत्येक देशात कधी ना कधी लोकशाही व्यवस्थेच्या नरडीला नख लागले आहे, ही वस्तुस्थिती या देशाच्या नागरिकांच्या राजकीय सुज्ञतेची ग्वाही देते. त्यामुळे शाह यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार नाही; मात्र यानिमित्ताने त्यांच्या पक्षाच्या मनात काय आहे, याची कल्पना आली आहे. पूर्वानुभव लक्षात घेता, इतर सर्व राजकीय पक्षांनी शाह यांचे वक्तव्य गांभीर्याने घेणे गरजेचे आहे; अन्यथा या देशाच्या बहुसांस्कृतिक ढाच्यालाच धक्का पोहचण्याची भीती आहे.