शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

एकपक्षीय राजवट?

By admin | Updated: April 17, 2017 01:05 IST

भारतीय जनता पार्टीला उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हटले जाते. भाजपाने राजकीय वाटचालीस प्रारंभ करताना गांधीवादी समाजवाद या गोंडस नावाने समाजवादी विचारसरणीचा अंगीकार केल्याची

भारतीय जनता पार्टीला उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हटले जाते. भाजपाने राजकीय वाटचालीस प्रारंभ करताना गांधीवादी समाजवाद या गोंडस नावाने समाजवादी विचारसरणीचा अंगीकार केल्याची धूळफेक केली असली तरी, त्या पक्षाची एकूणच वाटचाल उजव्या विचारसरणीचीच राहिली आहे. स्वाभाविकरीत्या त्या पक्षाला डाव्या विचारसरणीचे वावडे आहे. विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या सरकारला डाव्या पक्षांच्या सोबतीने समर्थन देण्याचा प्रयोग भाजपाने कधीकाळी कॉँग्रेसच्या द्वेषापोटी केला असला तरी, साम्यवादी पक्षांशी भाजपाचे कधीच जमले नाही. ज्या देशांनी साम्यवादी विचारसरणीचा अधिकृतरीत्या अंगीकार केला, त्या सर्वच देशांमध्ये एकपक्षीय प्रणाली आहे. उजवा पक्ष म्हणून भाजपा मात्र स्वत:ला लोकशाही व्यवस्थेचा समर्थक म्हणवितो. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी भुवनेश्वरमध्ये पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीस संबोधित करताना बोलून दाखवलेली महत्त्वाकांक्षा मात्र लोकशाही व्यवस्थेचे समर्थन करण्याच्या भूमिकेस अप्रत्यक्षरीत्या छेद देणारी होती. पंचायतींपासून केंद्र सरकारपर्यंत प्रत्येक स्तरावर केवळ भाजपाच्या हातीच सत्ता असली पाहिजे, अशी मनीषा त्यांनी बोलून दाखवली. सर्वंकष सत्ता भाजपाच्याच हाती एकवटली पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगण्याचा शाह यांनाही अधिकार आहे. लोकशाही मार्गाने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा पक्ष करणार असेल, तर त्यामध्येही काही वावगे नाही; पण सत्ता भ्रष्ट बनवते आणि सर्वंकष सत्ता संपूर्णत: भ्रष्ट बनवते, हे एकोणविसाव्या शतकातील ब्रिटिश राजनेता लॉर्ड अ‍ॅक्टन यांचे वचन विसरून चालणार नाही. शाह उजव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करीत असले तरी, लोकशाही मार्गांचा अवलंब करून का होईना, पण साम्यवादी देशांप्रमाणे एकपक्षीय राजवट स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न दिसते. या देशातील जनता गरीब व बरीचशी निरक्षर असली तरी सुज्ञ आहे. त्यामुळे शाह यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही; पण समजा खरेच त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, तर या देशातील बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था तग धरू शकेल का? भारताचा अपवाद वगळता, दक्षिण आशियातील प्रत्येक देशात कधी ना कधी लोकशाही व्यवस्थेच्या नरडीला नख लागले आहे, ही वस्तुस्थिती या देशाच्या नागरिकांच्या राजकीय सुज्ञतेची ग्वाही देते. त्यामुळे शाह यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार नाही; मात्र यानिमित्ताने त्यांच्या पक्षाच्या मनात काय आहे, याची कल्पना आली आहे. पूर्वानुभव लक्षात घेता, इतर सर्व राजकीय पक्षांनी शाह यांचे वक्तव्य गांभीर्याने घेणे गरजेचे आहे; अन्यथा या देशाच्या बहुसांस्कृतिक ढाच्यालाच धक्का पोहचण्याची भीती आहे.