शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

एकपक्षीय राजवट?

By admin | Updated: April 17, 2017 01:05 IST

भारतीय जनता पार्टीला उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हटले जाते. भाजपाने राजकीय वाटचालीस प्रारंभ करताना गांधीवादी समाजवाद या गोंडस नावाने समाजवादी विचारसरणीचा अंगीकार केल्याची

भारतीय जनता पार्टीला उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हटले जाते. भाजपाने राजकीय वाटचालीस प्रारंभ करताना गांधीवादी समाजवाद या गोंडस नावाने समाजवादी विचारसरणीचा अंगीकार केल्याची धूळफेक केली असली तरी, त्या पक्षाची एकूणच वाटचाल उजव्या विचारसरणीचीच राहिली आहे. स्वाभाविकरीत्या त्या पक्षाला डाव्या विचारसरणीचे वावडे आहे. विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या सरकारला डाव्या पक्षांच्या सोबतीने समर्थन देण्याचा प्रयोग भाजपाने कधीकाळी कॉँग्रेसच्या द्वेषापोटी केला असला तरी, साम्यवादी पक्षांशी भाजपाचे कधीच जमले नाही. ज्या देशांनी साम्यवादी विचारसरणीचा अधिकृतरीत्या अंगीकार केला, त्या सर्वच देशांमध्ये एकपक्षीय प्रणाली आहे. उजवा पक्ष म्हणून भाजपा मात्र स्वत:ला लोकशाही व्यवस्थेचा समर्थक म्हणवितो. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी भुवनेश्वरमध्ये पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीस संबोधित करताना बोलून दाखवलेली महत्त्वाकांक्षा मात्र लोकशाही व्यवस्थेचे समर्थन करण्याच्या भूमिकेस अप्रत्यक्षरीत्या छेद देणारी होती. पंचायतींपासून केंद्र सरकारपर्यंत प्रत्येक स्तरावर केवळ भाजपाच्या हातीच सत्ता असली पाहिजे, अशी मनीषा त्यांनी बोलून दाखवली. सर्वंकष सत्ता भाजपाच्याच हाती एकवटली पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगण्याचा शाह यांनाही अधिकार आहे. लोकशाही मार्गाने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा पक्ष करणार असेल, तर त्यामध्येही काही वावगे नाही; पण सत्ता भ्रष्ट बनवते आणि सर्वंकष सत्ता संपूर्णत: भ्रष्ट बनवते, हे एकोणविसाव्या शतकातील ब्रिटिश राजनेता लॉर्ड अ‍ॅक्टन यांचे वचन विसरून चालणार नाही. शाह उजव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करीत असले तरी, लोकशाही मार्गांचा अवलंब करून का होईना, पण साम्यवादी देशांप्रमाणे एकपक्षीय राजवट स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न दिसते. या देशातील जनता गरीब व बरीचशी निरक्षर असली तरी सुज्ञ आहे. त्यामुळे शाह यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही; पण समजा खरेच त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, तर या देशातील बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था तग धरू शकेल का? भारताचा अपवाद वगळता, दक्षिण आशियातील प्रत्येक देशात कधी ना कधी लोकशाही व्यवस्थेच्या नरडीला नख लागले आहे, ही वस्तुस्थिती या देशाच्या नागरिकांच्या राजकीय सुज्ञतेची ग्वाही देते. त्यामुळे शाह यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार नाही; मात्र यानिमित्ताने त्यांच्या पक्षाच्या मनात काय आहे, याची कल्पना आली आहे. पूर्वानुभव लक्षात घेता, इतर सर्व राजकीय पक्षांनी शाह यांचे वक्तव्य गांभीर्याने घेणे गरजेचे आहे; अन्यथा या देशाच्या बहुसांस्कृतिक ढाच्यालाच धक्का पोहचण्याची भीती आहे.