शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

म्हातारा तरुण

By admin | Updated: September 23, 2014 01:01 IST

हल्ली सर्वच क्षेत्रांत नवनव्या संकल्पनांचा आविष्कार व्हावा, त्यांची जोमाने अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकार, कंपन्या, संस्था यांचा कारभार तरुणांकडे सोपवावा

हल्ली सर्वच क्षेत्रांत नवनव्या संकल्पनांचा आविष्कार व्हावा, त्यांची जोमाने अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकार, कंपन्या, संस्था यांचा कारभार तरुणांकडे सोपवावा, अशी मागणी होत असते. वृद्ध लोक जुनाट विचारसरणीचे, काहीसे आग्रही किवा हेकट असल्यामुळे त्यांना सरकार, कंपन्यांतून सक्तीने बाजूला करावे, अशीही मागणी होत असते. पण, नवनव्या कल्पनांचा व कार्यक्षमतेचा तारुण्याशी संबंध असतो, हा अभावानेच सिद्ध होणारा नियम आहे, हे गेल्या काही काळात राजकारणातील तरुण मंडळी जो काही गोंधळ घालीत आहेत, त्यावरून सिद्ध होत आहे. ताजा गोंधळ घातला आहे, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचे तरणेबांड अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी. त्यांनी अलीकडेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना काश्मीरचा इंच न इंच भारताकडून मिळवून दाखवेन, अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. बिलावल यांनी अचानकपणे आणि तेही काश्मीरबाबत असे काही विधान करावे हे धक्कादायक होतेच; पण ते त्यांच्यासारख्या २0-२२ वर्षांच्या तरुण राजकारण्याने करावे, हे अधिक धक्कादायक होते. पाकिस्तानातील राजकारण्यांचे आणि लष्कराचे अस्तित्व काश्मीर प्रश्नावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणी असे बोलले असते, तर त्याची कदाचित कुणी दखलही घेतली नसती; पण बिलावल भुट्टो असे बोलल्यामुळे काश्मीर प्रश्नाची नाही, पण त्यांच्या तरुण व तथाकथित जोम असलेल्या राजकारणाची दखल घेणे भाग आहे. काश्मीर भारताकडून हिसकावून घेण्याची भाषा करून बिलावल यांनी एक दाखवून दिले, की त्यांचे शारीरिक वय विशीतले असले, तरी मानसिक वय ६७ वर्षांचे आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्याचा नवा मार्ग शोधला पाहिजे असे ते म्हणाले असते, तर एक वेळ ते असे समजून घेता आले असते. पण, त्यांनी चक्क ते हिसकावून घेण्याची भाषा केली. आता काश्मीर हिसकावून घ्यायचे, तर लष्करी बळाचा वापर अपरिहार्य आहे. याचा अर्थ बिलावल हे इतिहासापासूनही काहीच शिकणारे नाहीत, असा होतो. एवढेच नाही, तर पाकिस्तानातील तरुण पिढी किती वैचारिक वेठबिगारीत अडकली आहे, हेही त्यावरून स्पष्ट होते. पाकिस्तानची भारतविरोधातली एकही लष्करी मोहीम यशस्वी झालेली तर नाहीच, पण त्यातून पाकिस्तानने काही मिळविण्याऐवजी बरेच काही गमावलेच आहे. अशा अवस्थेत बिलावल लष्करी मोहीम आखून आणखी काय गमवायची तयारी करीत आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. खरे तर बिलावल यांच्यापुढे पाकिस्तानचा गेल्या ६७ वर्षांचा इतिहास आहे. त्यांचे आजोबा व आईची हत्या कशी व कोणत्या परिस्थितीत झाली व ती कुणी केली, याची त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे या परिस्थितीतून पाकिस्तानला कसे वाचवायचे, याचा विचार करण्याऐवजी ते काश्मीर हिसकावून घेण्याची भाषा करीत आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे राज्यकारभाराच्या नव्या कल्पनांची आणि दूरदृष्टीची वानवा आहे. पाकमध्ये गेल्या काही वर्षांपासून लोकशाही सरकारे असली, तरी त्यांची तारेवरील कसरत चालू आहे. लष्कराचे राजकारणातील महत्त्व अजून शाबूत आहे. शिवाय, देशातील जनतेचे आर्थिक प्रश्न आ वासून उभे आहेत. या सर्व प्रश्नांचा ऊहापोह करून ते सोडविण्याची भाषा करण्याऐवजी थेट काश्मीर प्रश्नाला हात घालून बिलावल यांनी आपण राजकारणात रुळलेल्या वाटेनेच वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. थोडक्यात पाकिस्तानकडून भविष्यकाळात काही नवी धोरणे आखली जाण्याच्या आशेवर बिलावल यांनी पाणी टाकले आहे. सत्तेवर येण्याचा सोपा मार्ग म्हणजे भारतविरोधी भावना भडकवणे आणि आम जनतेच्या धार्मिक भावनांना आवाहन करणे हा आहे. पाकिस्तानी राजकारण्यांचा सत्ता हस्तगत करण्याचा जो धोपट मार्ग आहे, तोच बिलावलसारखे तरुण अवलंबणार असतील, तर पाकिस्तानचे १९४७मध्ये सटवाईने जे विधिलिखित लिहिले आहे, ते खरे ठरणार, यात काही शंका नाही. पाकिस्तानात सध्या जी गोंधळाची परिस्थिती आहे, त्यातून बिलावलसारख्या तरुण राजकारण्याने काही नवा मार्ग दाखवावा, अशी तेथील जनतेची अपेक्षा असताना बिलावल यांनी त्यावर काही तोडगा सुचविण्याऐवजी तो विषय टाळून काश्मीरचे गुऱ्हाळ लावल्याने पाकिस्तानी जनतेवर मात्र कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे. अशा तरुणांमुळे पाकिस्तानचे भविष्य आणखीनच खडतर होणार आहे, यात काही शंका नाही.