शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

म्हातारा तरुण

By admin | Updated: September 23, 2014 01:01 IST

हल्ली सर्वच क्षेत्रांत नवनव्या संकल्पनांचा आविष्कार व्हावा, त्यांची जोमाने अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकार, कंपन्या, संस्था यांचा कारभार तरुणांकडे सोपवावा

हल्ली सर्वच क्षेत्रांत नवनव्या संकल्पनांचा आविष्कार व्हावा, त्यांची जोमाने अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकार, कंपन्या, संस्था यांचा कारभार तरुणांकडे सोपवावा, अशी मागणी होत असते. वृद्ध लोक जुनाट विचारसरणीचे, काहीसे आग्रही किवा हेकट असल्यामुळे त्यांना सरकार, कंपन्यांतून सक्तीने बाजूला करावे, अशीही मागणी होत असते. पण, नवनव्या कल्पनांचा व कार्यक्षमतेचा तारुण्याशी संबंध असतो, हा अभावानेच सिद्ध होणारा नियम आहे, हे गेल्या काही काळात राजकारणातील तरुण मंडळी जो काही गोंधळ घालीत आहेत, त्यावरून सिद्ध होत आहे. ताजा गोंधळ घातला आहे, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचे तरणेबांड अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी. त्यांनी अलीकडेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना काश्मीरचा इंच न इंच भारताकडून मिळवून दाखवेन, अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. बिलावल यांनी अचानकपणे आणि तेही काश्मीरबाबत असे काही विधान करावे हे धक्कादायक होतेच; पण ते त्यांच्यासारख्या २0-२२ वर्षांच्या तरुण राजकारण्याने करावे, हे अधिक धक्कादायक होते. पाकिस्तानातील राजकारण्यांचे आणि लष्कराचे अस्तित्व काश्मीर प्रश्नावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणी असे बोलले असते, तर त्याची कदाचित कुणी दखलही घेतली नसती; पण बिलावल भुट्टो असे बोलल्यामुळे काश्मीर प्रश्नाची नाही, पण त्यांच्या तरुण व तथाकथित जोम असलेल्या राजकारणाची दखल घेणे भाग आहे. काश्मीर भारताकडून हिसकावून घेण्याची भाषा करून बिलावल यांनी एक दाखवून दिले, की त्यांचे शारीरिक वय विशीतले असले, तरी मानसिक वय ६७ वर्षांचे आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्याचा नवा मार्ग शोधला पाहिजे असे ते म्हणाले असते, तर एक वेळ ते असे समजून घेता आले असते. पण, त्यांनी चक्क ते हिसकावून घेण्याची भाषा केली. आता काश्मीर हिसकावून घ्यायचे, तर लष्करी बळाचा वापर अपरिहार्य आहे. याचा अर्थ बिलावल हे इतिहासापासूनही काहीच शिकणारे नाहीत, असा होतो. एवढेच नाही, तर पाकिस्तानातील तरुण पिढी किती वैचारिक वेठबिगारीत अडकली आहे, हेही त्यावरून स्पष्ट होते. पाकिस्तानची भारतविरोधातली एकही लष्करी मोहीम यशस्वी झालेली तर नाहीच, पण त्यातून पाकिस्तानने काही मिळविण्याऐवजी बरेच काही गमावलेच आहे. अशा अवस्थेत बिलावल लष्करी मोहीम आखून आणखी काय गमवायची तयारी करीत आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. खरे तर बिलावल यांच्यापुढे पाकिस्तानचा गेल्या ६७ वर्षांचा इतिहास आहे. त्यांचे आजोबा व आईची हत्या कशी व कोणत्या परिस्थितीत झाली व ती कुणी केली, याची त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे या परिस्थितीतून पाकिस्तानला कसे वाचवायचे, याचा विचार करण्याऐवजी ते काश्मीर हिसकावून घेण्याची भाषा करीत आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे राज्यकारभाराच्या नव्या कल्पनांची आणि दूरदृष्टीची वानवा आहे. पाकमध्ये गेल्या काही वर्षांपासून लोकशाही सरकारे असली, तरी त्यांची तारेवरील कसरत चालू आहे. लष्कराचे राजकारणातील महत्त्व अजून शाबूत आहे. शिवाय, देशातील जनतेचे आर्थिक प्रश्न आ वासून उभे आहेत. या सर्व प्रश्नांचा ऊहापोह करून ते सोडविण्याची भाषा करण्याऐवजी थेट काश्मीर प्रश्नाला हात घालून बिलावल यांनी आपण राजकारणात रुळलेल्या वाटेनेच वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. थोडक्यात पाकिस्तानकडून भविष्यकाळात काही नवी धोरणे आखली जाण्याच्या आशेवर बिलावल यांनी पाणी टाकले आहे. सत्तेवर येण्याचा सोपा मार्ग म्हणजे भारतविरोधी भावना भडकवणे आणि आम जनतेच्या धार्मिक भावनांना आवाहन करणे हा आहे. पाकिस्तानी राजकारण्यांचा सत्ता हस्तगत करण्याचा जो धोपट मार्ग आहे, तोच बिलावलसारखे तरुण अवलंबणार असतील, तर पाकिस्तानचे १९४७मध्ये सटवाईने जे विधिलिखित लिहिले आहे, ते खरे ठरणार, यात काही शंका नाही. पाकिस्तानात सध्या जी गोंधळाची परिस्थिती आहे, त्यातून बिलावलसारख्या तरुण राजकारण्याने काही नवा मार्ग दाखवावा, अशी तेथील जनतेची अपेक्षा असताना बिलावल यांनी त्यावर काही तोडगा सुचविण्याऐवजी तो विषय टाळून काश्मीरचे गुऱ्हाळ लावल्याने पाकिस्तानी जनतेवर मात्र कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे. अशा तरुणांमुळे पाकिस्तानचे भविष्य आणखीनच खडतर होणार आहे, यात काही शंका नाही.