शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

तेल गेले, तूपही गेले

By admin | Updated: January 25, 2015 00:46 IST

सुरेशच्या दुसऱ्या विवाहानंतर रजनीला तिची चूक समजली. सुरेशची कदरही वाटू लागली. हे लग्न अशा प्रकारे अवैध ठरल्यानंतर तिचे दुसरे लग्न होईना.

सुरेशच्या दुसऱ्या विवाहानंतर रजनीला तिची चूक समजली. सुरेशची कदरही वाटू लागली. हे लग्न अशा प्रकारे अवैध ठरल्यानंतर तिचे दुसरे लग्न होईना. माहेरचेही तिच्याशी दुराव्याने वागू लागले. न्यायालयीन आदेशानंतर ६ महिने ती आमच्या कार्यालयात येऊन तिला सुरेशकडे परत कसे जाता येईल याचा प्रयत्न करा, अशी गयावया करीत होती. रजनीच्या माहेरच्यांनी तिच्या भौतिक सुखाचा, आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून हे लग्न ठरवले. त्यांची एकच चूक झाली, म्हणजे जिला संसार करायचा तिचे मत विचारात घेतले नाही. स्वकेंद्रित वृत्ती व जोडीदाराशी, कुटुंबातील सदस्यांशी असंवेदनशीलपणे वागल्याने जवळची नाती कायमची तुटू शकतात. याचेच हे एक उदाहरण आहे, असे म्हणता येईल. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन रंजनाने संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती. रजनीने नव्या नात्याची कदर ठेवली असती तर सुरेशचा व सर्वांचाच मनस्ताप, न्यायालयीन खर्च, वेळ हे सर्व टाळता येणे शक्य होते. अशा वेळी विवाहपूर्व मार्गदर्शन घेणे, हा एक मार्ग असू शकतो...‘‘मला हे लग्न करायचेच नव्हते. तुम्ही काळे आहात. मला हात लावू नका. मला काळी मुले नकोत.’’ लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवपरिणीत वधू रजनीने पती सुरेशला सांगितले. त्याला तर याचा धक्काच बसला. माझ्यासमोर तो हताश होऊन बसला होता. रजनीची मर्जी नसताना हे लग्न झाले; तेव्हा हे लग्न मोडून तिला मोकळी करावी, या विचाराने तो आमच्याकडे आला. झाल्या प्रकाराने तो अस्वस्थ होता, पण तोल सांभाळून होता. तो सर्व घटना सांगत गेला. रजनी सुस्वरूप होती. सुरेश रूपाने थोडा डावा होता. निर्व्यसनी सुरेशला नोकरी चांगली होती. रजनीच्या घरच्यांनी सुरेशला रजनीचा वर म्हणून पसंत केले. तिला हे स्थळ पसंत आहे का, ते विचारले गेले नाही. तिनेही तिच्या घरच्यांना नापसंती वेळेवर सांगितली नाही.सुरेशचे आई-वडील त्याच्या लहानपणी अपघातात वारले होते. मामाने त्याचा सांभाळ केला; पण मिळवता झाल्यावर सुरेशने स्वत:च्या जिवावर घर थाटून स्वतंत्र राहायचे ठरवले. मामाने रजनीचे स्थळ पाहिल्यावर त्याला नाकारावेसे वाटले नाही. त्यालाही रजनी जोडीदार म्हणून पसंत पडली. त्यानेही सुखी संसाराची काही स्वप्ने रंगवली. त्यातच अनपेक्षितपणे त्याच्यावर हा आघात झाला. त्यानंतर लगेच तो नोकरीवर हजर झाला. शांतपणे विचार करण्यासाठी त्याने थोडा वेळ घेतला. त्यांच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. सुरेशला रजनीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नव्हती. दोघांतील संवाद संपलाच होता. लग्नानंतर महिनाभरातच हे लग्नबंधन विस्कटले. सुरेश सल्ल्यासाठी आला होता. पण यासाठी काही कायदेशीर अडचणी होत्या. स्वतंत्र कौटुंबिक न्यायालये असली तरी विवाह टिकवण्याकडे या यंत्रणेचा कल होता. त्यामुळे घटस्फोटास वेळ लागला असता. एका जोडीदाराने एका घरात राहूनही दुसऱ्याचा त्याग केला आहे तेव्हा घटफोट दिला जावा, असा अर्ज करण्यास त्याला दोन वर्षे थांबावे लागले असते. पण लग्नानंतर लगेच रंजनाने शरीरसंबंध नाकारल्यामुळे विवाहाचे स्वरूपच बदलत होते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत हा विवाह करण्यात सुरेशची फसवणूक झाली होती, असा मुद्दा घेऊन हे लग्न अवैध ठरावे व तसे आदेश न्यायालयाने द्यावेत, असा अर्ज करणे सुरेशला शक्य होते. त्याने रजनीला लगेच तिच्या माहेरी पाठवावे, असा आम्ही सल्ला दिला व त्वरित त्याने वरील पद्धतीने लग्न अवैध ठरण्यासाठी अर्ज करावा, असा सुरेशला आम्ही सल्ला दिला. त्यानंतर सुरेशची या लग्नातून सुटका झाली. त्यानंतर लगेचच त्याने दुसरा विवाहही केला.अ‍ॅड. नीलिमा कानेटकर