शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

तेल गेले, तूपही गेले

By admin | Updated: January 25, 2015 00:46 IST

सुरेशच्या दुसऱ्या विवाहानंतर रजनीला तिची चूक समजली. सुरेशची कदरही वाटू लागली. हे लग्न अशा प्रकारे अवैध ठरल्यानंतर तिचे दुसरे लग्न होईना.

सुरेशच्या दुसऱ्या विवाहानंतर रजनीला तिची चूक समजली. सुरेशची कदरही वाटू लागली. हे लग्न अशा प्रकारे अवैध ठरल्यानंतर तिचे दुसरे लग्न होईना. माहेरचेही तिच्याशी दुराव्याने वागू लागले. न्यायालयीन आदेशानंतर ६ महिने ती आमच्या कार्यालयात येऊन तिला सुरेशकडे परत कसे जाता येईल याचा प्रयत्न करा, अशी गयावया करीत होती. रजनीच्या माहेरच्यांनी तिच्या भौतिक सुखाचा, आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून हे लग्न ठरवले. त्यांची एकच चूक झाली, म्हणजे जिला संसार करायचा तिचे मत विचारात घेतले नाही. स्वकेंद्रित वृत्ती व जोडीदाराशी, कुटुंबातील सदस्यांशी असंवेदनशीलपणे वागल्याने जवळची नाती कायमची तुटू शकतात. याचेच हे एक उदाहरण आहे, असे म्हणता येईल. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन रंजनाने संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती. रजनीने नव्या नात्याची कदर ठेवली असती तर सुरेशचा व सर्वांचाच मनस्ताप, न्यायालयीन खर्च, वेळ हे सर्व टाळता येणे शक्य होते. अशा वेळी विवाहपूर्व मार्गदर्शन घेणे, हा एक मार्ग असू शकतो...‘‘मला हे लग्न करायचेच नव्हते. तुम्ही काळे आहात. मला हात लावू नका. मला काळी मुले नकोत.’’ लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवपरिणीत वधू रजनीने पती सुरेशला सांगितले. त्याला तर याचा धक्काच बसला. माझ्यासमोर तो हताश होऊन बसला होता. रजनीची मर्जी नसताना हे लग्न झाले; तेव्हा हे लग्न मोडून तिला मोकळी करावी, या विचाराने तो आमच्याकडे आला. झाल्या प्रकाराने तो अस्वस्थ होता, पण तोल सांभाळून होता. तो सर्व घटना सांगत गेला. रजनी सुस्वरूप होती. सुरेश रूपाने थोडा डावा होता. निर्व्यसनी सुरेशला नोकरी चांगली होती. रजनीच्या घरच्यांनी सुरेशला रजनीचा वर म्हणून पसंत केले. तिला हे स्थळ पसंत आहे का, ते विचारले गेले नाही. तिनेही तिच्या घरच्यांना नापसंती वेळेवर सांगितली नाही.सुरेशचे आई-वडील त्याच्या लहानपणी अपघातात वारले होते. मामाने त्याचा सांभाळ केला; पण मिळवता झाल्यावर सुरेशने स्वत:च्या जिवावर घर थाटून स्वतंत्र राहायचे ठरवले. मामाने रजनीचे स्थळ पाहिल्यावर त्याला नाकारावेसे वाटले नाही. त्यालाही रजनी जोडीदार म्हणून पसंत पडली. त्यानेही सुखी संसाराची काही स्वप्ने रंगवली. त्यातच अनपेक्षितपणे त्याच्यावर हा आघात झाला. त्यानंतर लगेच तो नोकरीवर हजर झाला. शांतपणे विचार करण्यासाठी त्याने थोडा वेळ घेतला. त्यांच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. सुरेशला रजनीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नव्हती. दोघांतील संवाद संपलाच होता. लग्नानंतर महिनाभरातच हे लग्नबंधन विस्कटले. सुरेश सल्ल्यासाठी आला होता. पण यासाठी काही कायदेशीर अडचणी होत्या. स्वतंत्र कौटुंबिक न्यायालये असली तरी विवाह टिकवण्याकडे या यंत्रणेचा कल होता. त्यामुळे घटस्फोटास वेळ लागला असता. एका जोडीदाराने एका घरात राहूनही दुसऱ्याचा त्याग केला आहे तेव्हा घटफोट दिला जावा, असा अर्ज करण्यास त्याला दोन वर्षे थांबावे लागले असते. पण लग्नानंतर लगेच रंजनाने शरीरसंबंध नाकारल्यामुळे विवाहाचे स्वरूपच बदलत होते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत हा विवाह करण्यात सुरेशची फसवणूक झाली होती, असा मुद्दा घेऊन हे लग्न अवैध ठरावे व तसे आदेश न्यायालयाने द्यावेत, असा अर्ज करणे सुरेशला शक्य होते. त्याने रजनीला लगेच तिच्या माहेरी पाठवावे, असा आम्ही सल्ला दिला व त्वरित त्याने वरील पद्धतीने लग्न अवैध ठरण्यासाठी अर्ज करावा, असा सुरेशला आम्ही सल्ला दिला. त्यानंतर सुरेशची या लग्नातून सुटका झाली. त्यानंतर लगेचच त्याने दुसरा विवाहही केला.अ‍ॅड. नीलिमा कानेटकर