शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलचे भीषण घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 07:31 IST

आता या सिग्नल हाताळणाऱ्या माणसाने असे का केले याची पुढील चौकशीत स्पष्टता होईल.

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी तीन रेल्वे गाड्यांच्या झालेल्या अपघाताचे कारण स्पष्ट होत आहे. अति वेगाने धावणाऱ्या या लांब पल्ल्याच्या गाड्यांना चुकीचा सिग्नल देणे आणि चालकाची दिशाभूल होईल असा तो तातडीने बंद करणे, हे कारण समोर आले आहे. आता या सिग्नल हाताळणाऱ्या माणसाने असे का केले याची पुढील चौकशीत स्पष्टता होईल. पण, मानवी चुकांच्या कारणांनी मुख्य मार्गावरील कोरोमंडल एक्स्प्रेस गाडी अपलूपवर गेली आणि सिग्नल बंद होताच चालकाचा गोंधळ उडून तातडीचे ब्रेक लावल्याने डबे रुळावरून घसरले आणि लूप मार्गावर थांबलेल्या मालगाडीवर ते धडकले. विस्कळीत झालेल्या कोरोमंडल गाडीने मुख्य मार्गही अडविला गेला. त्याचवेळी बंगळुरू ते हावडा धावणारी सुपरफास्ट गाडी ताशी ११६ किलोमीटर वेगाने आली ती या डब्यांवर आदळली. एका चुकीच्या सिग्नलमुळे हा सर्व प्रकार घडला. यात २८८ लोक मृत्युमुखी पडले. दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी होते. त्यापैकी बहुसंख्य जखमी झाले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व येऊ शकते. 

पूर्वोत्तर आणि दक्षिण-पूर्व हा रेल्वेचा एक महत्त्वाचा आणि नेहमी वाहतुकीने गजबजलेला मार्ग असतो. आसाम, पश्चिम बंगाल, तेलंगणा ते पुढे तामिळनाडू आणि कर्नाटकास जोडणारा हा मार्ग आहे. गेल्या काही दशकांपासून आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिशामधून दक्षिण भारतात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण वाढले आहे. या गाड्यांनी हे मजूर प्रवास करतात, रेल्वेने सुरक्षेचे अनेक उत्तम उपाय योजले आहेत. मात्र काही महत्त्वाचे मार्ग असूनही सुरक्षेचे 'कवच' ही प्रणाली या मार्गावर अवलंबिण्यात आलेली नाही. 

कवच प्रणालीनुसार सुमारे ३८० मीटर अंतरावरील समोरासमोर आलेल्या गाड्यांची माहिती होते. शिवाय हवामानातील बदलामुळे सिग्नल न दिसणे किंवा मार्गावरील काही अपघातसदृश गोष्टी नजरेस न पडणे याची पूर्वकल्पना मिळते. त्यानुसार गाडीचा वेग कमी करीत तातडीची मदत किंवा मार्गदर्शन मिळविता येते. ती व्यवस्था या उत्तर-पूर्व रेल्वे मार्गावर उपलब्ध नाही. तेदेखील एक महत्त्वाचे कारण या अपघातामागे आहे. केवळ सिग्नल देण्याचा घोळ झाल्याने इतका भीषण अपघात व्हावा आणि काही क्षणांत २८८ जणांचे आयुष्य संपून जावे हे फार क्लेशदायक आहे. अशा परिस्थितीत शासन यंत्रणा जागी होते. सुरक्षा दलांचे प्रचंड मदतकार्य सुरू होते. ही फार महत्त्वाची बाब आहेच. 

या सर्व यंत्रणा कामाला लागण्यापूर्वी आजूबाजूचे सामान्य लोक मदतीला धावतात ही मानवी नात्यातील रेशीमगाठ आहे. जखमी झालेले, अपघातात सापडलेले अनेक जण आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत असताना शेकडो लोक हातातील काम सोडून अपघातस्थळी धाव घेतात, याचे उत्कृष्ट दर्शन बालासोर जिल्ह्यातील जनतेने घडविले, अपघात सहा वाजून पन्नास मिनिटांनी झाला होता. सात वाजून पाच मिनिटांनी शेकडो पाय धावत गेले होते. अपघात झाला आहे एवढीच जाणीव त्यांना होती. ही भावना खूप काही सांगून जाते. रेल्वे प्रशासनात काम करणारे आणि त्यांच्या कामासाठी वापरली जाणारी यंत्रणा अपुरी आहे का, यासंदर्भात या गंभीर अपघाताने शिकता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रत्येक गाडी कोठे धावते आहे, तिचा पुढील मार्ग सुलभ आहे ना, याची खात्री करणे शक्य आहे. 

जगभरातील बहुतांश सर्वच देशांतून चोवीस तास विमानांची उड्डाणे होत असतात. ज्या देशातून उड्डाणे घेतली जातात तेथे बऱ्याचदा रात्र असते आणि पोहोचतात तेथे दुपार झालेली असते. कोठून कोणते विमान कोठे जात आहे, याची माहिती त्या त्या विमानचालकांना असते. आकाशात धडक होत नाही. आपली भारतीय रेल्वे एकाच देशात जमिनीवरून धावत असते. तिचे उत्तम पद्धतीने नियोजन करणे अशक्य नाही. या तिहेरी अपघातांतून नवे काही शिकता येईल, सिग्नल देण्यातल्या चुका झाल्या त्या टाळता येतील याची खात्री करून घ्यायला हवी. सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करणारी 'कवच' सारखी यंत्रणा प्रत्येक मार्गावर अद्ययावत करायला हवी. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तम समन्वय करीत अपघातग्रस्तांना मदत दिली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ओडिशा प्रशासनाने उत्तम सोय केली. अशा सुविधा रेल्वे विभागानेदेखील निर्माण कराव्यात. केवळ अपघातप्रसंगीच नव्हे, तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही या सुविधा कायमच्या वापरता येतील. सिग्नल घोळाने बरेच काही शिकविले आहे. आता तरी सुधारणा करायला हव्यात.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात