शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

आता एकच हुंकार मी का बेरोजगार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:22 IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक तरुण मराठवाड्यातील आहेत़ लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात़ जागा निघत नाहीत़ निवड होणे तर दूरच़ या अस्वस्थतेतूनच मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांचे

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक तरुण मराठवाड्यातील आहेत़ लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात़ जागा निघत नाहीत़ निवड होणे तर दूरच़ या अस्वस्थतेतूनच मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले़ सरकार त्याची दखल घेईल, अशी अपेक्षा आहे़ परंतु, बेरोजगारांना दिलासा मिळणारे चित्र दिसत नसल्याने मोर्चानंतर आता तरुणांनी विशेषत: मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी बेरोजगार पदयात्रेचा एल्गार पुकारला आहे़ पुण्यातील भिडेवाडा ते मुंबईमध्ये विधान भवनापर्यंत ही पदयात्रा ११ ते १९ मार्च दरम्यान जाईल, असा प्रचार विद्यार्थीच सोशल मीडियातून करीत आहेत़ ‘ना धर्मासाठी ना जातीसाठी, ना पक्षासाठी ना नेत्यासाठी, चल येऊ या रस्त्यावर बेरोजगारी संपविण्यासाठी, असा नारा दिला आहे़आता एकच हुंकार मी का बेरोजगार? असा सवाल करीत विद्यार्थ्यांनी पदयात्रेतील सहभागासाठी आॅनलाईन अर्ज भरणे सुरू केले आहे़ कुठलाही पक्ष नाही वा कुठलीही संघटना नाही़ उत्स्फूर्तपणे विद्यार्थी एकत्र येऊन विरोधाची मूठ आवळत आहेत़ केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे़ कष्ट केले तर १०० टक्के यश मिळते़ परंतु, गेल्या काही वर्षांपासून भरतीच्या जाहिराती नाहीत़ वर्षानुवर्षे विद्यार्थी गाव सोडून जिल्ह्यांच्या ठिकाणी, ज्यांना परवडत नाही असे काहीजण अर्धवेळ नोकरी करीत पुण्यात ठाण मांडून आहेत़ यश अपयश दूर संधीही मिळत नाही, अशा विचित्र अवस्थेतून तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना जावे लागत आहे़मराठवाड्यात रोजगाराच्या अन्य संधी दुर्मीळ असल्याने पदवीधर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत़ शिवाय, शिक्षक, प्राध्यापक पदांच्या रिक्त जागाही भरल्या जात नाहीत़ जवळ-जवळ भरती प्रक्रिया बंद आहे़ एकीकडे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे, असा आग्रह धरला जातो़ मात्र विद्यार्थी निवृत्तीचे वय वाढू नये, अशी भूमिका मांडत आहेत़ शिक्षित बेरोजगारांना अद्यापि बेरोजगार भत्ता मिळण्याची तरतूद नाही़ नोकर कपातीचे धोरण, रिक्त जागा न भरण्याचे धोरण़ यामुळे खासगी शिक्षण संस्थांमध्येही संधी नाहीत़ धर्मादाय शिक्षण संस्था आता कुटुंब संस्था बनल्या आहेत़ उरले-सुरले सरकारने कंपनीकरण करण्याचा घाट घातला आहे़ त्यामुळे जवळपासही रोजगाराची संधी नाही़ मराठवाड्यात एखादा प्रकल्प येईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा आशावादही निर्माण केला जात नाही़ दरम्यान, लातूरला रेल्वे डबे निर्मितीचा मोठा प्रकल्प आणि हजारो रोजगार उपलब्ध होतील, अशी दिलासा देणारी बातमी बेरोजगारांचे मोर्चे निघत असतानाच उमटली आहे़ मुळात अशा प्रकल्पातील रोजगार हा कौशल्याधारित असतो़ ते कौशल्यच मराठवाड्यातील तरुणांकडे नसेल तर पुन्हा मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणांनाही रेल्वेतील नोकºया कशा मिळतील़ कपूरथला, रायबरेली, चेन्नई या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांमध्ये अपवादानेही महाराष्ट्रीयन नाव कर्मचाºयांच्या यादीत दिसत नाही़ एकंदर, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना तरुणांकडे संबंधित रोजगाराचे कौशल्य शिक्षण असले पाहिजे, याची काळजी धुरीणांनी घेतली पाहिजे़ त्यामुळे बेरोजगार पदयात्रा मंच स्थापन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी पुणे-मुंबई पायी प्रवास करणार आहे़ त्यांना आश्वासक उत्तरे न मिळाल्यास सत्ताधाºयांचा उलटा प्रवास सुरू व्हायला वेळ लागणार नाही़- धर्मराज हल्लाळे