शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आता एकच हुंकार मी का बेरोजगार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:22 IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक तरुण मराठवाड्यातील आहेत़ लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात़ जागा निघत नाहीत़ निवड होणे तर दूरच़ या अस्वस्थतेतूनच मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांचे

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक तरुण मराठवाड्यातील आहेत़ लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात़ जागा निघत नाहीत़ निवड होणे तर दूरच़ या अस्वस्थतेतूनच मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले़ सरकार त्याची दखल घेईल, अशी अपेक्षा आहे़ परंतु, बेरोजगारांना दिलासा मिळणारे चित्र दिसत नसल्याने मोर्चानंतर आता तरुणांनी विशेषत: मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी बेरोजगार पदयात्रेचा एल्गार पुकारला आहे़ पुण्यातील भिडेवाडा ते मुंबईमध्ये विधान भवनापर्यंत ही पदयात्रा ११ ते १९ मार्च दरम्यान जाईल, असा प्रचार विद्यार्थीच सोशल मीडियातून करीत आहेत़ ‘ना धर्मासाठी ना जातीसाठी, ना पक्षासाठी ना नेत्यासाठी, चल येऊ या रस्त्यावर बेरोजगारी संपविण्यासाठी, असा नारा दिला आहे़आता एकच हुंकार मी का बेरोजगार? असा सवाल करीत विद्यार्थ्यांनी पदयात्रेतील सहभागासाठी आॅनलाईन अर्ज भरणे सुरू केले आहे़ कुठलाही पक्ष नाही वा कुठलीही संघटना नाही़ उत्स्फूर्तपणे विद्यार्थी एकत्र येऊन विरोधाची मूठ आवळत आहेत़ केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे़ कष्ट केले तर १०० टक्के यश मिळते़ परंतु, गेल्या काही वर्षांपासून भरतीच्या जाहिराती नाहीत़ वर्षानुवर्षे विद्यार्थी गाव सोडून जिल्ह्यांच्या ठिकाणी, ज्यांना परवडत नाही असे काहीजण अर्धवेळ नोकरी करीत पुण्यात ठाण मांडून आहेत़ यश अपयश दूर संधीही मिळत नाही, अशा विचित्र अवस्थेतून तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना जावे लागत आहे़मराठवाड्यात रोजगाराच्या अन्य संधी दुर्मीळ असल्याने पदवीधर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत़ शिवाय, शिक्षक, प्राध्यापक पदांच्या रिक्त जागाही भरल्या जात नाहीत़ जवळ-जवळ भरती प्रक्रिया बंद आहे़ एकीकडे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे, असा आग्रह धरला जातो़ मात्र विद्यार्थी निवृत्तीचे वय वाढू नये, अशी भूमिका मांडत आहेत़ शिक्षित बेरोजगारांना अद्यापि बेरोजगार भत्ता मिळण्याची तरतूद नाही़ नोकर कपातीचे धोरण, रिक्त जागा न भरण्याचे धोरण़ यामुळे खासगी शिक्षण संस्थांमध्येही संधी नाहीत़ धर्मादाय शिक्षण संस्था आता कुटुंब संस्था बनल्या आहेत़ उरले-सुरले सरकारने कंपनीकरण करण्याचा घाट घातला आहे़ त्यामुळे जवळपासही रोजगाराची संधी नाही़ मराठवाड्यात एखादा प्रकल्प येईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा आशावादही निर्माण केला जात नाही़ दरम्यान, लातूरला रेल्वे डबे निर्मितीचा मोठा प्रकल्प आणि हजारो रोजगार उपलब्ध होतील, अशी दिलासा देणारी बातमी बेरोजगारांचे मोर्चे निघत असतानाच उमटली आहे़ मुळात अशा प्रकल्पातील रोजगार हा कौशल्याधारित असतो़ ते कौशल्यच मराठवाड्यातील तरुणांकडे नसेल तर पुन्हा मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणांनाही रेल्वेतील नोकºया कशा मिळतील़ कपूरथला, रायबरेली, चेन्नई या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांमध्ये अपवादानेही महाराष्ट्रीयन नाव कर्मचाºयांच्या यादीत दिसत नाही़ एकंदर, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना तरुणांकडे संबंधित रोजगाराचे कौशल्य शिक्षण असले पाहिजे, याची काळजी धुरीणांनी घेतली पाहिजे़ त्यामुळे बेरोजगार पदयात्रा मंच स्थापन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी पुणे-मुंबई पायी प्रवास करणार आहे़ त्यांना आश्वासक उत्तरे न मिळाल्यास सत्ताधाºयांचा उलटा प्रवास सुरू व्हायला वेळ लागणार नाही़- धर्मराज हल्लाळे