शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

प्लास्टिकबंदीचे केवळ ‘कवित्व’ नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:15 IST

प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते.

- सविता देव हरकरेप्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते. जमिनीवर प्लास्टिक कुजण्यास १००० वर्षे तर पाण्यात ४०० वर्षे लागतात. पण तोपर्यंत या प्लास्टिकने अनेकांचे जीवन कुजते.भारतवंशातील राजकारणात घोषणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही घोषणा तर सदासर्वकाळ चालणाऱ्या असतात. अलीकडील नरेंद्र मोदी यांचा ‘अच्छे दिन’चा जयघोष असो वा ३० वर्षांपूर्वी स्व. इंदिरा गांधी यांनी दिलेला ‘गरिबी हटाव’चा नारा. दारुबंदीचा फार्सही त्यातलाच. हजारो महिला आणि सामाजिक संघटनांची वर्षानुवर्षे आंदोलने झाली. पण खºया अर्थाने दारुमुक्ती काही होऊ शकली नाही. उलट राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी घालण्यात आली तेथेच दारूचा महापूर वाहात असल्याचे चित्र बघण्यात आले. गुटखाबंदीचे तरी काय झाले? गुटखा मिळत नाही असे एकही ठिकाण कदाचित अख्ख्या राज्यात सापडणार नाही. विशेषत: निवडणुकांच्या काळात तर घोषणांचा अक्षरश: पाऊस पडत असतो. गंमत अशी की, यापैकी बहुतांश घोषणाही मग पाण्याच्या पावसाप्रमाणेच कुठे वाहून जातात कळत नाही. अशीच एक घोषणा नुकतीच महाराष्टÑ शासनानेही केली आहे. प्लास्टिकबंदीची. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिची अंमलबजावणी सुरू होणार होती. तशी ती झाली असेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. प्लास्टिकची विक्री आणि वापर यापुढे गुन्हा ठरणार आहे. प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकतर जेलची हवा खावी लागेल किंवा २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. थर्माकोलचाही या बंदीत समावेश करण्यात आला आहे. अर्थात दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, औषधांची वेष्टने आदी वस्तू या बंदीतून तूर्तास वगळण्यात आल्या आहेत. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरले असून दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जाणार आहे. या शासन निर्णयाचे स्वागतच करावयास हवे.आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जगभरात दरवर्षी सुमारे ५०० अब्ज प्लास्टिक बॅग्सचा वापर होतो. मोठमोठ्या कंपन्यांची ८५ टक्के उत्पादने ही प्लास्टिकच्या आवरणातच असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आज मानवाचे जीवन प्लास्टिकमय झाले आहे आणि त्याला या प्लास्टिकपासून विघटित करणे, वाटते तेवढे सोपे नाही. याची सर्वांनाच कल्पना आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरूआहेत. परंतु आजवर त्याचा सकारात्मक परिणाम कधी समोर आला नाही. महाराष्टÑ शासनाने पुन्हा एकदा या कामी पुढाकार घेतला आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करीत असतानाच केवळ बंदीने लोक प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवतील, असा समज कुणी करून घेऊ नये. काही दिवस कारवाईचा बडगा उगारला जाईल पण कालांतराने सर्व काही ‘आॅल इज वेल’ होऊन प्लास्टिक पिशव्यांचे चक्र पूर्ववत सुरू होईल. त्यामुळे या बंदीतून खरोखरच काही ठोस साध्य करायचे असल्यास कायद्याच्या दंडुक्यासोबतच लोकजागरणही करणे गरजेचे ठरणार आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम लोकांना पटवून द्यावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या वर्षांपासून प्लास्टिकने व्यसनाधीन लोकांना त्यातून मुक्त करण्याकरिता दुसरा पर्यायही उपलब्ध करून द्यावा लागेल. लोकजागर आणि राजकीय इच्छाशक्तीतून हे घडू शकते, अन्यथा प्लास्टिकबंदीचे केवळ कवित्व तेवढे शिल्लक राहील.