शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदीचे केवळ ‘कवित्व’ नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:15 IST

प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते.

- सविता देव हरकरेप्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते. जमिनीवर प्लास्टिक कुजण्यास १००० वर्षे तर पाण्यात ४०० वर्षे लागतात. पण तोपर्यंत या प्लास्टिकने अनेकांचे जीवन कुजते.भारतवंशातील राजकारणात घोषणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही घोषणा तर सदासर्वकाळ चालणाऱ्या असतात. अलीकडील नरेंद्र मोदी यांचा ‘अच्छे दिन’चा जयघोष असो वा ३० वर्षांपूर्वी स्व. इंदिरा गांधी यांनी दिलेला ‘गरिबी हटाव’चा नारा. दारुबंदीचा फार्सही त्यातलाच. हजारो महिला आणि सामाजिक संघटनांची वर्षानुवर्षे आंदोलने झाली. पण खºया अर्थाने दारुमुक्ती काही होऊ शकली नाही. उलट राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी घालण्यात आली तेथेच दारूचा महापूर वाहात असल्याचे चित्र बघण्यात आले. गुटखाबंदीचे तरी काय झाले? गुटखा मिळत नाही असे एकही ठिकाण कदाचित अख्ख्या राज्यात सापडणार नाही. विशेषत: निवडणुकांच्या काळात तर घोषणांचा अक्षरश: पाऊस पडत असतो. गंमत अशी की, यापैकी बहुतांश घोषणाही मग पाण्याच्या पावसाप्रमाणेच कुठे वाहून जातात कळत नाही. अशीच एक घोषणा नुकतीच महाराष्टÑ शासनानेही केली आहे. प्लास्टिकबंदीची. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिची अंमलबजावणी सुरू होणार होती. तशी ती झाली असेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. प्लास्टिकची विक्री आणि वापर यापुढे गुन्हा ठरणार आहे. प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकतर जेलची हवा खावी लागेल किंवा २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. थर्माकोलचाही या बंदीत समावेश करण्यात आला आहे. अर्थात दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, औषधांची वेष्टने आदी वस्तू या बंदीतून तूर्तास वगळण्यात आल्या आहेत. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरले असून दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जाणार आहे. या शासन निर्णयाचे स्वागतच करावयास हवे.आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जगभरात दरवर्षी सुमारे ५०० अब्ज प्लास्टिक बॅग्सचा वापर होतो. मोठमोठ्या कंपन्यांची ८५ टक्के उत्पादने ही प्लास्टिकच्या आवरणातच असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आज मानवाचे जीवन प्लास्टिकमय झाले आहे आणि त्याला या प्लास्टिकपासून विघटित करणे, वाटते तेवढे सोपे नाही. याची सर्वांनाच कल्पना आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरूआहेत. परंतु आजवर त्याचा सकारात्मक परिणाम कधी समोर आला नाही. महाराष्टÑ शासनाने पुन्हा एकदा या कामी पुढाकार घेतला आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करीत असतानाच केवळ बंदीने लोक प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवतील, असा समज कुणी करून घेऊ नये. काही दिवस कारवाईचा बडगा उगारला जाईल पण कालांतराने सर्व काही ‘आॅल इज वेल’ होऊन प्लास्टिक पिशव्यांचे चक्र पूर्ववत सुरू होईल. त्यामुळे या बंदीतून खरोखरच काही ठोस साध्य करायचे असल्यास कायद्याच्या दंडुक्यासोबतच लोकजागरणही करणे गरजेचे ठरणार आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम लोकांना पटवून द्यावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या वर्षांपासून प्लास्टिकने व्यसनाधीन लोकांना त्यातून मुक्त करण्याकरिता दुसरा पर्यायही उपलब्ध करून द्यावा लागेल. लोकजागर आणि राजकीय इच्छाशक्तीतून हे घडू शकते, अन्यथा प्लास्टिकबंदीचे केवळ कवित्व तेवढे शिल्लक राहील.