शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

प्लास्टिकबंदीचे केवळ ‘कवित्व’ नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:15 IST

प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते.

- सविता देव हरकरेप्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते. जमिनीवर प्लास्टिक कुजण्यास १००० वर्षे तर पाण्यात ४०० वर्षे लागतात. पण तोपर्यंत या प्लास्टिकने अनेकांचे जीवन कुजते.भारतवंशातील राजकारणात घोषणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही घोषणा तर सदासर्वकाळ चालणाऱ्या असतात. अलीकडील नरेंद्र मोदी यांचा ‘अच्छे दिन’चा जयघोष असो वा ३० वर्षांपूर्वी स्व. इंदिरा गांधी यांनी दिलेला ‘गरिबी हटाव’चा नारा. दारुबंदीचा फार्सही त्यातलाच. हजारो महिला आणि सामाजिक संघटनांची वर्षानुवर्षे आंदोलने झाली. पण खºया अर्थाने दारुमुक्ती काही होऊ शकली नाही. उलट राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी घालण्यात आली तेथेच दारूचा महापूर वाहात असल्याचे चित्र बघण्यात आले. गुटखाबंदीचे तरी काय झाले? गुटखा मिळत नाही असे एकही ठिकाण कदाचित अख्ख्या राज्यात सापडणार नाही. विशेषत: निवडणुकांच्या काळात तर घोषणांचा अक्षरश: पाऊस पडत असतो. गंमत अशी की, यापैकी बहुतांश घोषणाही मग पाण्याच्या पावसाप्रमाणेच कुठे वाहून जातात कळत नाही. अशीच एक घोषणा नुकतीच महाराष्टÑ शासनानेही केली आहे. प्लास्टिकबंदीची. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिची अंमलबजावणी सुरू होणार होती. तशी ती झाली असेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. प्लास्टिकची विक्री आणि वापर यापुढे गुन्हा ठरणार आहे. प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकतर जेलची हवा खावी लागेल किंवा २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. थर्माकोलचाही या बंदीत समावेश करण्यात आला आहे. अर्थात दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, औषधांची वेष्टने आदी वस्तू या बंदीतून तूर्तास वगळण्यात आल्या आहेत. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरले असून दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जाणार आहे. या शासन निर्णयाचे स्वागतच करावयास हवे.आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जगभरात दरवर्षी सुमारे ५०० अब्ज प्लास्टिक बॅग्सचा वापर होतो. मोठमोठ्या कंपन्यांची ८५ टक्के उत्पादने ही प्लास्टिकच्या आवरणातच असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आज मानवाचे जीवन प्लास्टिकमय झाले आहे आणि त्याला या प्लास्टिकपासून विघटित करणे, वाटते तेवढे सोपे नाही. याची सर्वांनाच कल्पना आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरूआहेत. परंतु आजवर त्याचा सकारात्मक परिणाम कधी समोर आला नाही. महाराष्टÑ शासनाने पुन्हा एकदा या कामी पुढाकार घेतला आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करीत असतानाच केवळ बंदीने लोक प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवतील, असा समज कुणी करून घेऊ नये. काही दिवस कारवाईचा बडगा उगारला जाईल पण कालांतराने सर्व काही ‘आॅल इज वेल’ होऊन प्लास्टिक पिशव्यांचे चक्र पूर्ववत सुरू होईल. त्यामुळे या बंदीतून खरोखरच काही ठोस साध्य करायचे असल्यास कायद्याच्या दंडुक्यासोबतच लोकजागरणही करणे गरजेचे ठरणार आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम लोकांना पटवून द्यावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या वर्षांपासून प्लास्टिकने व्यसनाधीन लोकांना त्यातून मुक्त करण्याकरिता दुसरा पर्यायही उपलब्ध करून द्यावा लागेल. लोकजागर आणि राजकीय इच्छाशक्तीतून हे घडू शकते, अन्यथा प्लास्टिकबंदीचे केवळ कवित्व तेवढे शिल्लक राहील.