शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदीचे केवळ ‘कवित्व’ नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:15 IST

प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते.

- सविता देव हरकरेप्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरूशकेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते. जमिनीवर प्लास्टिक कुजण्यास १००० वर्षे तर पाण्यात ४०० वर्षे लागतात. पण तोपर्यंत या प्लास्टिकने अनेकांचे जीवन कुजते.भारतवंशातील राजकारणात घोषणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही घोषणा तर सदासर्वकाळ चालणाऱ्या असतात. अलीकडील नरेंद्र मोदी यांचा ‘अच्छे दिन’चा जयघोष असो वा ३० वर्षांपूर्वी स्व. इंदिरा गांधी यांनी दिलेला ‘गरिबी हटाव’चा नारा. दारुबंदीचा फार्सही त्यातलाच. हजारो महिला आणि सामाजिक संघटनांची वर्षानुवर्षे आंदोलने झाली. पण खºया अर्थाने दारुमुक्ती काही होऊ शकली नाही. उलट राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी घालण्यात आली तेथेच दारूचा महापूर वाहात असल्याचे चित्र बघण्यात आले. गुटखाबंदीचे तरी काय झाले? गुटखा मिळत नाही असे एकही ठिकाण कदाचित अख्ख्या राज्यात सापडणार नाही. विशेषत: निवडणुकांच्या काळात तर घोषणांचा अक्षरश: पाऊस पडत असतो. गंमत अशी की, यापैकी बहुतांश घोषणाही मग पाण्याच्या पावसाप्रमाणेच कुठे वाहून जातात कळत नाही. अशीच एक घोषणा नुकतीच महाराष्टÑ शासनानेही केली आहे. प्लास्टिकबंदीची. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिची अंमलबजावणी सुरू होणार होती. तशी ती झाली असेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. प्लास्टिकची विक्री आणि वापर यापुढे गुन्हा ठरणार आहे. प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकतर जेलची हवा खावी लागेल किंवा २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. थर्माकोलचाही या बंदीत समावेश करण्यात आला आहे. अर्थात दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, औषधांची वेष्टने आदी वस्तू या बंदीतून तूर्तास वगळण्यात आल्या आहेत. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरले असून दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जाणार आहे. या शासन निर्णयाचे स्वागतच करावयास हवे.आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. प्लास्टिक युगाचा प्रारंभ भविष्यात एवढा घातक ठरेल याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी. जगभरात दरवर्षी सुमारे ५०० अब्ज प्लास्टिक बॅग्सचा वापर होतो. मोठमोठ्या कंपन्यांची ८५ टक्के उत्पादने ही प्लास्टिकच्या आवरणातच असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आज मानवाचे जीवन प्लास्टिकमय झाले आहे आणि त्याला या प्लास्टिकपासून विघटित करणे, वाटते तेवढे सोपे नाही. याची सर्वांनाच कल्पना आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरूआहेत. परंतु आजवर त्याचा सकारात्मक परिणाम कधी समोर आला नाही. महाराष्टÑ शासनाने पुन्हा एकदा या कामी पुढाकार घेतला आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करीत असतानाच केवळ बंदीने लोक प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवतील, असा समज कुणी करून घेऊ नये. काही दिवस कारवाईचा बडगा उगारला जाईल पण कालांतराने सर्व काही ‘आॅल इज वेल’ होऊन प्लास्टिक पिशव्यांचे चक्र पूर्ववत सुरू होईल. त्यामुळे या बंदीतून खरोखरच काही ठोस साध्य करायचे असल्यास कायद्याच्या दंडुक्यासोबतच लोकजागरणही करणे गरजेचे ठरणार आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम लोकांना पटवून द्यावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या वर्षांपासून प्लास्टिकने व्यसनाधीन लोकांना त्यातून मुक्त करण्याकरिता दुसरा पर्यायही उपलब्ध करून द्यावा लागेल. लोकजागर आणि राजकीय इच्छाशक्तीतून हे घडू शकते, अन्यथा प्लास्टिकबंदीचे केवळ कवित्व तेवढे शिल्लक राहील.