शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

ती विटंबना नसते?

By admin | Updated: December 29, 2016 03:37 IST

आम्ही तेवढे सहिष्णु, सहनशील, परभावनांची कदर करणारे आणि कलेची बूज राखणारे, पण बाकी सारे याच्या नेमके उलट, हा हिन्दू धर्मातील लोकांचा नेहमीचा आणि आवडता दावा

आम्ही तेवढे सहिष्णु, सहनशील, परभावनांची कदर करणारे आणि कलेची बूज राखणारे, पण बाकी सारे याच्या नेमके उलट, हा हिन्दू धर्मातील लोकांचा नेहमीचा आणि आवडता दावा असला तरी वास्तव त्याच्या किती विपरीत असते याची चर्चा नेहमीच होत असते. विशेषत: अलीकडच्या काळात तर असहिष्णुतेच्या चर्चेने संपूर्ण देशच ढवळून निघाला होता. मुंबईतील भारतीय तंत्रशास्त्र संस्थेच्या (आयआयटी) सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जे भित्तीचित्र रंगविले गेले आणि त्यावरुन काही ‘सैनिकांनी’ जो गोंधळ घातला तो केवळ असहिष्णुतेचाच नव्हे तर बावळटपणातून निर्माण झालेल्या दंडेलीचाही द्योतक होता. संजीवनी बुटी शोधता आली नाही म्हणून हनुमानाने आख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता, अशी एक आख्यायिका रामायणात वर्णिली गेली आहे. याच आख्यायिकेमधील एका हाताने द्रोणागिरी तोलून धरलेल्या हनुमानाचे चित्र सदर भित्तीचित्रात चितारले गेले होते. फक्त तो हनुमान आधुनिक पेहरावात दाखविला गेला होता. म्हणजे हातात लेखणी, घड्याळ, विजार, चष्मा, टाय वगैरे वगैरे आणि शेपटीच्या जागी भगवा ध्वज. यात असेलच तर थोडी गंमत होती आणि तीदेखील चार भिंतींच्या आत. विटंबना तर अजिबातच नव्हती. पण कुणीतरी खोडसाळपणाने एका मावळ्याला याची खबर दिली व तो पाच-पंचवीस सैनिक घेऊन तिथे धावला. त्याने त्याला जी शिकवण मिळाली होती त्याप्रमाणे तिथे धिंगाणा घातला, ते भित्तीचित्र काढून टाकायला लावले आणि आयोजकांना लेखी माफीदेखील मागायला लावली. त्यांनीदेखील उगा कटकट नको म्हणून दोन्ही मागण्या मान्य करुन टाकल्या. एका अर्थाने तो विषय तिथेच संपला. पण जो बावळटपणा उरला त्याचे काय? पुराणांमध्ये वा धार्मिक पुस्तकांमध्ये देवादिकांचे जे वर्णन येते त्या वर्णनाप्रमाणेच मूर्ती किंवा चित्र रेखाटले जावे असा या नवसहिष्णुतावाद्यांचा आग्रह असेल तर ज्या गणेशोत्सवात याच मंडळींचा पुढाकार असतो, त्या गजाननाच्या पार्थिव मूर्ती तरी कुठे शास्त्रशुद्ध असतात. जी आदिदेवता तिला का कुठे थंडी वाजू शकते? पण तिला स्वेटर घातला जातो, पुढाऱ्याप्रमाणे टोपी चढविली जाते, डोळ्यावर चष्मा चढविला जातो, मोटार चालविताना दाखविले जाते आणि असंख्य गणेश मंडळे तर त्या अधिनायकाला संपूर्ण दहा दिवस तिष्ठत उभे करतात, तेव्हां होत नाही का विटंबना! सारा अचरटपणा, अन्य काय?