शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सरकार नव्हे फड?

By admin | Updated: January 26, 2016 02:35 IST

‘तुझं नी माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना’ ही आणि अशीच अवस्था शिवसेना आणि भाजपा यांच्यात पूर्वी होती, आज आहे आणि उद्याही राहील यात शंका नाही.

‘तुझं नी माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना’ ही आणि अशीच अवस्था शिवसेना आणि भाजपा यांच्यात पूर्वी होती, आज आहे आणि उद्याही राहील यात शंका नाही. पण तरीदेखील सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. एका परीने त्यांची सत्तासंगत हा नाईलाजाचा मामला आहे. पण तसे असले तरी महाराष्ट्रातील जनतेने आपले किमान पाच वर्षांसाठीचे का होईना स्वत:चे भवितव्य आपल्या हाती सुपूर्द केले आहे याचे भान दोहोंनी बाळगणे आवश्यक असल्याची जाणीव त्यांच्या मनात कुठेतरी असणे गरजेचे असताना तसे दिसत मात्र नाही. शिवसेनेचा आणि तिच्या सैनिकांचा एकूणच खोडकर स्वभाव एव्हाना भाजपाच्याही पूर्ण लक्षात यायला हरकत नाही. असे असताना ‘अरे ला कारे’ करणे यात शोभा होतच असेल तर या दोन्ही पक्षांची नव्हे तर सरकारची आणि सरकार ज्यांच्यासाठी काम करते त्या जनतेची. अलीकडच्या काळात असे प्रकार वारंवार होत चालले आहेत आणि माध्यमांमधून ‘फडणवीस यांचा सेनेला टोला, सेनेला कानपिचक्या’ यासारखी वर्णने प्रसिद्ध होऊ लागली आहेत. जणू सरकार म्हणजे सवाल-जबाबाचा फडच आहे! परवाच एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सरकारचा रिमोट कन्ट््रोल त्यांच्या हाती असल्याची कानपिचकी म्हणे सेना नेत्यांच्या पुढ्यात दिली. तितकेच नव्हे तर सेनाप्रमुखांनी हा कन्ट्रोल म्हणे त्यांच्या हाती दिला आहे. मुळात मुख्यमंत्री राज्याचा एका परीने सर्वेसर्वा असतो पण त्याला वारंवार हे सांगत बसावे लागत नाही. दुसरे आणि अधिक महत्वाचे म्हणजे फडणवीसांच्या हाती असलेला तथाकथित कन्ट््रोल सेनाप्रमुखांनी नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे आणि त्याचा वापर आपल्या भल्यासाठी केला जावा, सेनेला येताजाता ढुशा देण्यासाठी नव्हे, ही आणि केवळ हीच या राज्यातील जनतेची अपेक्षा आहे.