शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

गांधीवध नव्हे; हत्त्याच

By admin | Updated: March 13, 2016 22:01 IST

शब्द ही जपून वापरण्याची बाब आहे. खरेतर प्रत्येकानेच आपण काय बोलत आहोत आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्ती अथवा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे असते

शब्द ही जपून वापरण्याची बाब आहे. खरेतर प्रत्येकानेच आपण काय बोलत आहोत आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्ती अथवा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे असते. काहीजण आधी बोलतात मग विचार करतात तर काहीजण आधी विचार करूनच शब्दोच्चार करीत असतात. जर बोलणारा एखादा सामान्य जीव असेल आणि त्याच्या बोलण्याला फारशी किंमतही नसेल तर एकवेळ त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. पण उच्चपदस्थ मनुष्य कोणताही आगापिछा न बघता आणि आपल्या पदाचे भान न ठेवता एखाद्या ऋषितुल्य व्यक्तीसंबंधी अवमानकारक शब्दप्रयोग करीत असेल तर ती बाब निश्चितच लांच्छनास्पदच म्हणावी लागेल. असाच प्रकार शनिवारी नाशकात घडला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित एका राष्ट्रीय चर्चासत्रात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्या भाषणात ‘गांधीवध’ असा उल्लेख केला. वास्तविक वध हा असुरी प्रवृत्तीचा होत असतो, चांगल्या विचारांची आणि महात्म्यांची केली जाते ती हत्त्याच असते हे कुलगुरूंसारख्या जबाबदार आणि उच्चशिक्षित माणसाला दुसऱ्या कोणी सांगण्याची वेळ यावी हे आश्चर्याचे आहे. देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल आपल्या उपस्थितीत चुकीचा उल्लेख होत असताना गप्प बसतील तर ते शरद पवारच कसले? कुलगुरूंना त्याचक्षणी अडवून त्यांनी ‘गांधीवध नव्हे; गांधीहत्त्या म्हणा’ असे तर बजावलेच शिवाय आपल्या भाषणात वध या शब्दावरही आक्षेप नोंदवताना हा शब्द प्रचलित करणाऱ्या मानसिकतेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे केले. प्रसंगावधान राखत शरद पवार यांनी जे जाणतेपण दाखविले ते खरोखरच स्तुत्य आहे. पवारांनी कुलगुरूंना वेळीच रोखले नसते आणि त्यावर आपले मतदेखील नोंदवले नसते तर एक चुकीचा संदेश समाजापुढे गेला असता.