शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

गांधीवध नव्हे; हत्त्याच

By admin | Updated: March 13, 2016 22:01 IST

शब्द ही जपून वापरण्याची बाब आहे. खरेतर प्रत्येकानेच आपण काय बोलत आहोत आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्ती अथवा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे असते

शब्द ही जपून वापरण्याची बाब आहे. खरेतर प्रत्येकानेच आपण काय बोलत आहोत आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्ती अथवा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे असते. काहीजण आधी बोलतात मग विचार करतात तर काहीजण आधी विचार करूनच शब्दोच्चार करीत असतात. जर बोलणारा एखादा सामान्य जीव असेल आणि त्याच्या बोलण्याला फारशी किंमतही नसेल तर एकवेळ त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. पण उच्चपदस्थ मनुष्य कोणताही आगापिछा न बघता आणि आपल्या पदाचे भान न ठेवता एखाद्या ऋषितुल्य व्यक्तीसंबंधी अवमानकारक शब्दप्रयोग करीत असेल तर ती बाब निश्चितच लांच्छनास्पदच म्हणावी लागेल. असाच प्रकार शनिवारी नाशकात घडला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित एका राष्ट्रीय चर्चासत्रात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्या भाषणात ‘गांधीवध’ असा उल्लेख केला. वास्तविक वध हा असुरी प्रवृत्तीचा होत असतो, चांगल्या विचारांची आणि महात्म्यांची केली जाते ती हत्त्याच असते हे कुलगुरूंसारख्या जबाबदार आणि उच्चशिक्षित माणसाला दुसऱ्या कोणी सांगण्याची वेळ यावी हे आश्चर्याचे आहे. देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल आपल्या उपस्थितीत चुकीचा उल्लेख होत असताना गप्प बसतील तर ते शरद पवारच कसले? कुलगुरूंना त्याचक्षणी अडवून त्यांनी ‘गांधीवध नव्हे; गांधीहत्त्या म्हणा’ असे तर बजावलेच शिवाय आपल्या भाषणात वध या शब्दावरही आक्षेप नोंदवताना हा शब्द प्रचलित करणाऱ्या मानसिकतेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे केले. प्रसंगावधान राखत शरद पवार यांनी जे जाणतेपण दाखविले ते खरोखरच स्तुत्य आहे. पवारांनी कुलगुरूंना वेळीच रोखले नसते आणि त्यावर आपले मतदेखील नोंदवले नसते तर एक चुकीचा संदेश समाजापुढे गेला असता.