शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी नाही, तरीही...

By admin | Updated: November 8, 2016 03:56 IST

‘देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक पिढीने १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीबाबत सदैव विचार केला पाहिजे व त्याविषयी जागरुकही राहिले पाहिजे.

‘देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक पिढीने १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीबाबत सदैव विचार केला पाहिजे व त्याविषयी जागरुकही राहिले पाहिजे. त्या आणीबाणीने देशाच्या लोकशाही संस्थांवर आघात तर केलाच पण तिने देशाच्या विकासातही मोठा अडसर उभा केला’, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद््गार त्यांच्या पक्षासह साऱ्या देशाने लक्षात घ्यावे आणि त्या संदर्भात आजच्या राजकीय स्थितीचा विचार करावा असे आहेत. खरे तर १९७५ च्या आणीबाणीनंतर देशात झालेल्या बहुतेक निवडणुकांत केंद्रात सत्ताबदल घडून आले आणि एकेकाळचे नित्याचे विरोधक सत्ताधारी झालेले देशाने पाहिले. त्या आणीबाणीने दिलेल्या पराभवाच्या धक्क्याने काँग्रेस पक्षालाही बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. तरीही ती आणीबाणी चुकीच्या कारणाने देशावर लादली गेली असली तरी घटना आणि कायदा यांचा वापर करूनच आणली गेली होती. आज देशात जे घडत आहे तो घटना व कायदा यांना गुंडाळून ठेवून आणीबाणीसारखेच वातावरण निर्माण करण्याचा प्रकार आहे. देशातली माध्यमे आणि भाजपाचे प्रचारक ज्या उच्चरवाने मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचे स्तोम माजवीत आहेत तो सारा म्हणजे ‘ते चूक करू शकत नाहीत’, ‘त्यांच्यावरील टीका ही देशावरील टीका आहे’ आणि ‘मोदींचे टीकाकार हे देशाचे शत्रू आहेत’ असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हिटलरच्या काळात जर्मनीमध्ये ‘एक नेता, एक पक्ष, एक राष्ट्र’ असे जे फॅसिस्ट सूत्र त्याच्या नाझी पक्षाने राबविले त्याचीच भारतीय आवृत्ती आज देशाच्या अनुभवाला येत आहे. ज्या तऱ्हेने जनतेची आंदोलने दडपली जातात, भिन्न विचारी माणसांचे मुडदे पाडून त्यावर नुसत्याच चौकशी समित्या नेमल्या जातात, विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री व अन्य राष्ट्रीय नेत्यांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करून त्यांना ज्या तऱ्हेने हैराण केले जाते, दिल्ली व अन्य ठिकाणच्या विरोधी पक्षांच्या सरकारांची कामे थांबवून जशी रोखली जातात किंवा विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यापासून जसे अडविले जाते तो सारा एका अघोषित आणीबाणीचा प्रत्यय आणून देणाराच प्रकार आहे. गुजरातेतील पटेल समाजाच्या लोकांना आरक्षण मिळावे ही मागणी देशद्रोहाची कशी ठरते? त्या मागणीसाठी हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा गुन्हा लादून त्याला तुरुंगात कसे डांबले जाते? कन्हैयाकुमार हा महाविद्यालयीन विद्यार्थी ‘जातीयवाद आणि धर्मांधतेपासून आझादी’ असे म्हणतो तेव्हा तो देशद्रोही कसा होतो? रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा विचार करण्याहून त्याच्या दलित असण्याबद्दलच्याच शंकांना प्रसिद्धी का दिली जाते? एन्काऊंटरचे प्रकार लोकशाही म्हणविणाऱ्या आपल्या देशात वाढलेले का दिसतात? आणि समाजात काही चांगले बौद्धिक वातावरण निर्माण करू पाहाणाऱ्या विचारवंतांचे भरदिवसा मुडदे पाडणारे सर्वज्ञात लोक सरकारच्या पोलिसांना पुराव्यानिशी न्यायालयासमोर का उभे करता येत नाहीत? ‘व्यापंम’सारखे शेकडो कोटींचे घोटाळे होतात पण ते चर्चेला येत नाहीत. दादरीकांड विस्मरणात जाईल अशी व्यवस्था केली जाते. माणूस मारला गेला यावर न बोलता त्याच्याजवळचे मांस कशाचे होते यावर साऱ्या चर्चेचा भर असतो. प्रकाशमाध्यमांवरील एकतर्फी चर्चा आणि त्यातली सरकार पक्षाच्या प्रवक्त्यांची आरडाओरड पाहिली की या माध्यमांचा वापर विरोधकांची व टीकाकारांची तोंडे बंद करण्यासाठी व सरकारचा डिंडिम वाजविण्यासाठीच होतो की काय असे वाटू लागते. त्यातून आता या माध्यमांची मालकीच एका सरकारधार्जिण्या उद्योगपतीच्या हाती एकटवल्यामुळे त्यांची विश्वसनीयताही कमीच झाली आहे. त्यातून एखादे माध्यम वा वृत्तपत्र काही धाडस करू गेले तर त्यांच्यावर बंदीही घालता येते. सरकारला अनुकूल असेल ते ऐकवायचे आणि प्रतिकूल असेल ते एक तर रोखायचे किंवा विकृत स्वरुपात लोकांपुढे न्यायचे हाही प्रकार त्याच धर्तीचा आहे. काही माध्यमांनी तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व अन्य विरोधकांची अतिशय खालच्या पातळीवर चालविलेली टवाळी पाहिली की विरोधी पक्षांविषयीची या माध्यमांची व त्यांच्या बोलवित्या धन्यांची लोकशाहीनिष्ठा कोणत्या पायरीवरची आहे तेही कळून चुकते. तात्पर्य, आणीबाणी आणण्यासाठी तिची अधिकृत घोषणा करणे, ३५६ व्या कलमाचा अंमल राष्ट्रपतींच्या सहीने जारी करणे किंवा तशी फर्माने सरकारने काढणे याची गरज आता उरली नाही. सरकारातले मंत्री त्याच्या पक्षाचे पुढारी, त्यांच्या मागे उभ्या असलेल्या संघटना आणि ताब्यात असलेली माध्यमे यांचा उपयोग करूनही १९७५ च्या आणीबाणीत होती तशी दहशत देशात उभी करता येते आणि विरोधक व टीकाकार यांची तोंडे बंद करता येतात. खरी भीती घटनेच्या आधारे लागू झालेल्या आणीबाणीची नसते. कारण तिच्याविरुद्ध न्यायालयांचे व इतर मार्ग उपायांसाठी उपलब्ध असतात. खरी भीती अघोषित आणीबाणीचीच असते. ती असूनही दिसत नाही आणि न दिसणाऱ्या आपत्तीचे भयच अधिक दहशतकारी ठरणारे असते. सबब, पंतप्रधानांचा संदेश सरकार, प्रशासन, न्यायासन, भाजपा आणि माध्यमे यांनी आजच्या संदर्भातच घेणे गरजेचे आहे.