शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

हे सहज सुचणे नव्हे

By admin | Updated: January 23, 2017 01:25 IST

जातीच्या आधारावर दिले जाणारे आरक्षण बंद केले पाहिजे, अशी ठोस जाहीर मागणी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय

जातीच्या आधारावर दिले जाणारे आरक्षण बंद केले पाहिजे, अशी ठोस जाहीर मागणी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याही पुढे एक पाऊल टाकले असले, तरी त्यांचे सदरचे विधान सहज सुचण्यामधून आले आहे, असे समजता येत नाही. त्यांनी एकूण पाच आणि विशेषत: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मागणी केली आहे, तर मोहन भागवत यांनी बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना, जातीधारित आरक्षणावर पुनर्विचार झाला पाहिजे असेच केवळ म्हटले होते. त्यांच्या त्या विधानाचा निवडणुकीच्या मतदानावर परिणाम झाला आणि भाजपाला पराभूत करून महागठबंधन सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले असे अनुमान अनेकांनी काढले होते. प्रत्यक्षात भाजपाचा पराभव ही भागवतांच्या विधानाची परिणती होती की समस्त विरोधकांच्या एकीकरणाची, याबाबत ठामपणे कोणीही आजदेखील काही सांगू शकत नाही. तरीही मनमोहन वैद्य यांचे विधान उत्तर प्रदेशातील भाजपाच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फिरवू शकते असा अंदाज काही माध्यमांनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. येथे बिहार आणि उत्तर प्रदेशची तुलना करायची तर जो प्रयोग बिहारात होऊ शकला तो उत्तर प्रदेशात फसला आहे. तेथील विद्यमान सत्ताधारी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातच केवळ समझोता होऊ शकला आहे. तुलनेने प्रबळ असलेली मायावतींची बसपा स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहे, तर राष्ट्रीय लोकदलास महागठबंधनमध्ये जागा मिळू शकलेली नाही. समाजवादी पार्टीतही बाप-मुलातील वा त्यांच्या समर्थकांमधली दुही तशीच कायम राहण्याची चिन्हे आहेत. ढोबळमानाने जे बोलले जाते, त्यानुसार सुमारे वीस टक्क्यांच्या घरात असलेली मुस्लिमांची मते समाजवादी व काँग्रेस यांची मते असल्याने त्यांचे विभाजन रोखले जाईल. दलितांची मते मायावतींकडे जातील. ब्राह्मणांची मते भाजपाकडून आपल्याकडे वळविण्यासाठी काँग्रेसने शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून मुक्रर केले होते पण आता काँग्रेस-सपा यांचा त्या पदाचा चेहरा अखिलेश यादव हाच राहील. माध्यमांनी विभिन्न वर्ग आणि जातिसमूहाची विविध पक्षांमध्ये ही जी विभागणी करून टाकली आहे, त्याशिवाय मतदारांचा जो मोठा वर्ग शिल्लक राहतो, तो बोलून दाखवीत नसला तरी जातिधारित आरक्षणाच्या विरोधात आहे. सामाजिक माध्यमांमध्ये त्याचे पडसाददेखील उमटतच असतात. मोदींनी रातोरात मोठे चलन रद्द केले तसे जातिधारित आरक्षणही रद्द करतील, अशी अपेक्षा या माध्यमांमधून व्यक्त केली जात असते. या पार्श्वभूमीवर मतदारांचे वेगळ्या रीतीने ध्रुवीकरण करण्याचा वैद्य यांचा हेतू नसेलच असे नाही. अर्थात, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी राज्यघटनेला गीतेचा दर्जा अगोदरच बहाल केला असल्याने राज्यघटनेने समाजातील मागास वर्गांना दिलेले आरक्षण ते काय पण कोणीच असे सहजासहजी काढून घेऊ शकत नाही. पण जेव्हा लाटा निर्माण केल्या जातात तेव्हा अशा लाटांमध्ये सारासार वाहून जात असतो. तेव्हा वैद्य उगाचच काही बोलून गेले असे कोणीही गृहीत धरू नये. त्यात फसगत होण्याचा धोका संभवतो.