शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

हे बाळसं नव्हे, सूजच!

By admin | Updated: June 2, 2016 01:58 IST

देशाचे ठोस राष्ट्रीय उत्पन्न ७.६ टक्क्यांपर्यंत कसे पोचले आहे आणि चीनपेक्षा जास्त वेगाने आपली प्रगती कशी चालू आहे, याचे जे रंगीबेरंगी चित्र उभे केले गेले आहे,

देशाचे ठोस राष्ट्रीय उत्पन्न ७.६ टक्क्यांपर्यंत कसे पोचले आहे आणि चीनपेक्षा जास्त वेगाने आपली प्रगती कशी चालू आहे, याचे जे रंगीबेरंगी चित्र उभे केले गेले आहे, ते म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या आर्थिक परिस्थितीबाबतच्या अज्ञानाचा फायदा उठवून त्याची राजकारणी कशी दिशाभूल करतात, याचे उत्तम उदाहरण आहे. शेती, उद्योगधंदे व सेवाक्षेत्र ही देशाच्या अर्थव्यवस्थेची तीन प्रमुख अंगे असतात. शेती व उद्योगधंदे यांनी अर्थव्यवस्थेचा भरभक्कम पाया घातला की, त्यावरचे शिखर म्हणजे हे सेवाक्षेत्र असते. आर्थिक विकासाचा हा क्र म आहे. प्रत्येक देशाची स्थिती, अग्रक्र म, क्षमता यांवर या तीन टप्प्यांपैकी कशावर जास्त भर द्यायचा, कोणत्या क्षेत्राला उठाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे, या गोष्टी ठरत असतात. हेच ते ‘आर्थिक धोरण’ असते. भारताचे ठोस राष्ट्रीय उत्पन्न हे ७.६ टक्के झाले आहे आणि ते चीनच्या तुलनेत अधिक आहे, असा दावा केला जात आहे, म्हणून आपण चीनकडे बघितल्यास काय आढळते? चीन हा कृषिप्रधान देश होता. कम्युनिस्ट क्रांती फक्त उद्योगधंदे प्रगत असलेल्या देशातच होऊ शकते, हा मार्क्सचा जो सिद्धांत होता, त्याला चिनी क्रांतीने छेद दिला. हा एकेकाळचा कृषिप्रधान देश आज क्र ांती झाल्यावर सहा दशकांनी एक महाकाय आर्थिक ताकद बनला आहे. मात्र या वाटचालीत सुरूवातीस शेतीवर आधारित अर्थव्यवस्था प्रबळ करण्याचे प्रयत्न चीनने साम्यवादी विचासरणीला धरून केले. त्याने फारशी प्रगती झाली नाही. उलट राजकीय उलथापालथच जास्त झाली आणि लाखो लोकांचे बळीही गेले. मग नंतर सत्तरच्या दशकाच्या अखेरीस चीनने वेगळा मार्गा चोखाळायचा निर्णय घेतला आणि राजकीय चौकट साम्यवादाचीच ठेवताना अर्थव्यवस्था ‘खुली’ करण्यासाठी पावले टाकली. त्यामुळे दोन दशकांच्या अवधीत चीन हा सर्व प्रकारच्या वस्तू व मालाचे जगातील सर्वात मोठे ‘उत्पादन केंद्र’ बनला. अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित महागड्या उपकरणांपासून ते साध्या दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत सर्व ‘मेड इन चायना’ म्हणून जगातील बाजारपेठांत विकले जाऊ लागले. असे जगासाठीचे उत्पादन केंद्र बनल्यामुळे चीनमध्ये प्रचंड रोजगार निर्माण झाले. शेतीवर अवलंबून असलेले अतिरिक्त मनुष्यबळ योग्य त्या कौशल्याधारित प्रशिक्षणानंतर उद्योगधंद्यात सामावले गेले. मग सेवाक्षेत्राचीही वाढ होत गेली. उलट आपल्या देशात हा ‘उत्पादना’चा टप्पा १९९१ च्या आर्थिक सुधारणानंतर आक्र सत गेला. सर्व भर सेवाक्षेत्रावर दिला जाऊ लागला. शेतीवर अवलंबून असलेल्या मनुष्यबळाचे ओझे कमी झालेच नाही. सेवाक्षेत्रातील प्रचंड गुंतवणुकीच्या तुलनेत रोजगार निर्मिती मर्यादितच झाली आणि तीही उच्चप्रशिक्षितांचीच. खरी गरज होती ती अकुशल व अर्धकुशल लोकांना रोजगार मिळण्याची. ती काही पुरी झाली नाही आणि म्हणूनच ‘मेक इन इंडिया’ जाहीर करावे लागले. ‘स्कील इंडिया’ कार्यक्र म अंमलात आणण्याची गरज भासत आहे. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे ७.६ टक्के हे जे ठोस राष्ट्रीय उत्पन्न असल्याचे सांगितले जात आहे, त्यातील मोठा वाटा हा सेवाक्षेत्राचा आहे. उलट शेती व उद्योगधंदे या क्षेत्रांत उणे प्रगती आहे. निर्यात गेल्या वर्षभरात घसरत गेली आहे. तेव्हा ७.६ टक्के ठोस राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थव्यवस्था बाळसेदार बनत असल्याचे लक्षण नसून, ती निव्वळ सूज आहे. नेमके येथेच सरकार जनतेच्या अज्ञानाचा फायदा उठवत असते. दररोजच्या जीवनात लागणाऱ्या भाजीपाला, कांदे-बटाटे, धान्यपदार्थ यांच्या किंमतीशी लोकांचा संबंध असतो. नोकऱ्या किती जणांना मिळतात, हे लोकांना कळायला हवे असते. पण सरकार ती आकडेवारी जाहीर करीत नाही. भारतात किती रोजगार निर्माण होण्याची गरज आहे, गेल्या वर्षभरात किती रोजगार निर्माण झाले आणि त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात किती टक्के वाढ आहे, अशी आकडेवारी सरकार क्वचितच जाहीर करते. मग अशा आकडेवारीमागील गणित जनतेला समजावून सांगणे ही तर दूरचीच गोष्ट आहे. अर्थव्यवस्थेत असा असमतोल असल्यानेच व कोणालाच कधीही पैशाचे सोंग आणता येत नसल्याने सरकारला विविध योजना व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीकरिता-त्यात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणीही आली-निधी उभा करण्यासाठी वाढत्या सेवाक्षेत्रावरच अवलंबून राहावे लागते. विविध सेवांवर नव्याने बुधवारपासून सेवाकर लागू करण्याचा निर्णय घेतला गेला; कारण शेतीक्षेत्र व उद्योगधंदे या क्षेत्रांत वाढ होत नसल्याने तेथून कर जमा होणे कठीण बनले आहे आणि जादा पैसा जमा करण्याची तर गरज आहे. म्हणूनच मग ठोस राष्ट्रीय उत्पन्न ७.६ टक्के झाल्याचे सांगून, ते वाढतच जाणार आहे, असे चित्र रंगविले जात आहे. अर्थव्यवस्था बाळसेदार बनत नसून तिला सूज आलेली आहे, हे वास्तव लपवून ठेवण्यासाठी हे करणे भाग पडत आहे.