शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

भटक्या कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 02:50 IST

भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्रच अनुभवास येते. अकोला शहरात गत आठवड्यात उजेडात आलेल्या दोन घटनांनी तर नागरिक हादरलेच आहेत.

भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्रच अनुभवास येते. अकोला शहरात गत आठवड्यात उजेडात आलेल्या दोन घटनांनी तर नागरिक हादरलेच आहेत. एका घटनेत कुत्र्यांनी घरानजीक खेळत असलेल्या एका सहा वर्षांच्या बालकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले, तर अन्य एका घटनेत आपल्या घरात आराम करीत असलेल्या एका वृद्ध महिलेवर हल्ला चढवून तिच्या चेहºयाचे अक्षरश: लचके तोडले! भयभीत बालकाचा आकांत ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतल्यामुळेच त्याचा जीव वाचला, असे प्रत्यक्षदर्र्शींचे म्हणणे आहे. हे अत्यंत भयंकर आहे. दक्षिण आशियातील काही जंगलांमध्ये आढळणाºया जंगली कुत्र्यांची टोळी अत्यंत भयंकर असते. इतर प्राण्यांना घेरून त्यांची शिकार करणाºया जंगली कुत्र्यांच्या टोळीला वाघासारखा प्राणीही वचकून असतो; कारण त्यांनी वेळप्रसंगी वाघाचीही शिकार केल्याचे दाखले आहेत. अकोल्यातील भटक्या कुत्र्यांनीही जंगली कुत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवणे सुरू केले की काय, अशी शंका उपरोल्लेखित दोन घटनांमुळे यावी! या दोन घटना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचल्यामुळे दखलपात्र ठरल्या; अन्यथा अशा अनेक घटना कदाचित उजेडातच येत नसतील. मध्यंतरी अकोला महापालिकेने भटकी कुत्री पकडून शहरालगतच्या गावांच्या परिसरात सोडणे सुरू केले होते. हा सरधोपट मार्ग निश्चितपणे उचित नव्हता. स्वाभाविकपणे त्यास विरोध झाला आणि महापालिकेला तो बंद करावा लागला. आता भटक्या कुत्र्यांपैकी माद्यांचे निर्बीजीकरण करण्याचा मार्ग महापालिकेने स्वीकारला आहे; मात्र त्याचे परिणाम दिसून भटक्या कुत्र्यांची संख्या घटण्यासाठी किमान दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागेल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. हा कालावधी बराच मोठा आहे. तोपर्यंत नागरिकांचा जीव धोक्यात घातल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा शोधणे गरजेचे आहे. नागरिकांनी शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंड्यांमध्येच टाकावे, म्हणजे भटक्या कुत्र्यांना खाद्य मिळणार नाही आणि त्यांची संख्या रोडावण्यास मदत होईल, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांनी त्यास प्रतिसाद द्यायलाच हवा; पण शहरात विविध रस्त्यांच्या कडेला सुरू असलेल्या मांस विक्रीच्या अवैध दुकानांमुळेही भटक्या कुत्र्यांना खाद्य मिळते आणि अशा दुकानांवर कारवाई करणे, हे महापालिकेचे काम आहे, हे मनपा अधिकाºयांनीही विसरू नये! कमीअधिक फरकाने ही परिस्थिती इतर शहरांमध्येही असू शकते. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारने धोरण निश्चित करणे गरजेचे वाटते.

टॅग्स :dogकुत्रा