शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 02:50 IST

भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्रच अनुभवास येते. अकोला शहरात गत आठवड्यात उजेडात आलेल्या दोन घटनांनी तर नागरिक हादरलेच आहेत.

भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्रच अनुभवास येते. अकोला शहरात गत आठवड्यात उजेडात आलेल्या दोन घटनांनी तर नागरिक हादरलेच आहेत. एका घटनेत कुत्र्यांनी घरानजीक खेळत असलेल्या एका सहा वर्षांच्या बालकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले, तर अन्य एका घटनेत आपल्या घरात आराम करीत असलेल्या एका वृद्ध महिलेवर हल्ला चढवून तिच्या चेहºयाचे अक्षरश: लचके तोडले! भयभीत बालकाचा आकांत ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतल्यामुळेच त्याचा जीव वाचला, असे प्रत्यक्षदर्र्शींचे म्हणणे आहे. हे अत्यंत भयंकर आहे. दक्षिण आशियातील काही जंगलांमध्ये आढळणाºया जंगली कुत्र्यांची टोळी अत्यंत भयंकर असते. इतर प्राण्यांना घेरून त्यांची शिकार करणाºया जंगली कुत्र्यांच्या टोळीला वाघासारखा प्राणीही वचकून असतो; कारण त्यांनी वेळप्रसंगी वाघाचीही शिकार केल्याचे दाखले आहेत. अकोल्यातील भटक्या कुत्र्यांनीही जंगली कुत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवणे सुरू केले की काय, अशी शंका उपरोल्लेखित दोन घटनांमुळे यावी! या दोन घटना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचल्यामुळे दखलपात्र ठरल्या; अन्यथा अशा अनेक घटना कदाचित उजेडातच येत नसतील. मध्यंतरी अकोला महापालिकेने भटकी कुत्री पकडून शहरालगतच्या गावांच्या परिसरात सोडणे सुरू केले होते. हा सरधोपट मार्ग निश्चितपणे उचित नव्हता. स्वाभाविकपणे त्यास विरोध झाला आणि महापालिकेला तो बंद करावा लागला. आता भटक्या कुत्र्यांपैकी माद्यांचे निर्बीजीकरण करण्याचा मार्ग महापालिकेने स्वीकारला आहे; मात्र त्याचे परिणाम दिसून भटक्या कुत्र्यांची संख्या घटण्यासाठी किमान दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागेल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. हा कालावधी बराच मोठा आहे. तोपर्यंत नागरिकांचा जीव धोक्यात घातल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा शोधणे गरजेचे आहे. नागरिकांनी शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंड्यांमध्येच टाकावे, म्हणजे भटक्या कुत्र्यांना खाद्य मिळणार नाही आणि त्यांची संख्या रोडावण्यास मदत होईल, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांनी त्यास प्रतिसाद द्यायलाच हवा; पण शहरात विविध रस्त्यांच्या कडेला सुरू असलेल्या मांस विक्रीच्या अवैध दुकानांमुळेही भटक्या कुत्र्यांना खाद्य मिळते आणि अशा दुकानांवर कारवाई करणे, हे महापालिकेचे काम आहे, हे मनपा अधिकाºयांनीही विसरू नये! कमीअधिक फरकाने ही परिस्थिती इतर शहरांमध्येही असू शकते. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारने धोरण निश्चित करणे गरजेचे वाटते.

टॅग्स :dogकुत्रा