शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाद नामकरणाचा

By admin | Updated: June 21, 2017 01:15 IST

‘नावात काय आहे, अशी विचारणा सद्यस्थितीत करता येईल काय? नावातच सर्व काही आहे, अशी जगरहाटी बनली आहे. देश वा राज्यातील सरकार बदलले की

‘नावात काय आहे, अशी विचारणा सद्यस्थितीत करता येईल काय? नावातच सर्व काही आहे, अशी जगरहाटी बनली आहे. देश वा राज्यातील सरकार बदलले की, सगळ्यात आधी काय काम केले जाते तर शासकीय योजनांची नावे बदलली जातात. त्या योजना लाभार्र्थींपर्यंत पोहोचतात काय? काही अडचणी आहेत काय? हा शोध घेणे सत्ताधाऱ्यांना आवश्यक वाटत नाही. कारण त्यासाठी अभ्यास करावा लागेल, नामकरण कसे झटपट होते. प्रसिध्दीदेखील मिळते आणि भक्त खूश होतात. योजनांपाठोपाठ मोगलकालीन वा ब्रिटिशकालीन एखाद्या गाव वा शहराचे नाव बदलण्याची मागणी वा प्रस्ताव चर्चेत येतो. गुलामीची निशाणी पुसण्याचे कारण दिले जाते, त्याला विरोध होण्याचे काही एक कारण नसते. प्रादेशिक, भाषिक अस्मितांसाठी राज्यांच्या राजधानी, महानगरांची नावे बदलली गेली आहेत. देशपातळीवर जे घडते, ते हळूहळू शहर, गावपातळीवर झिरपू लागले आहे. महामार्ग व राज्य मार्गावरील अनेक गावांच्या सीमेवर अलीकडे कमानी उभारून गावातील मोठ्या व्यक्तीचे नाव देण्याचा प्रघात सुरु झाला आहे. जळगाव शहरात असाच नामकरणाचा वाद सध्या गाजतोय. महापालिका कर्जबाजारी असल्याचे कारण देत विकास कामे करताना हात आखडता घेत असते. लोकसहभागातून चौक, उद्याने, शाळा, तलाव विकसित केले जात आहे. हा चांगला प्रयत्न असला तरी कायदेशीर चौकट, जनमताच्या भावनेचा आदर या बाबींकडे कानाडोळा केला जात आहे. याचा परिणाम असा झाला की, जनतेला विश्वासात न घेता झालेल्या नामकरणाच्या विरोधात जनता आता रस्त्यावर उतरली आहे. एखाद्या चौकाला नाव देण्यापूर्वी त्या चौकाला पूर्वी कुणाचे नाव दिले आहे काय? ही खबरदारी घेणे अपेक्षित असताना ती न घेतल्याने गहजब उडाला आहे. लोकप्रतिनिधीदेखील मतपेढीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून भूमिकांवरून कोलांटउडी मारत आहेत. एका नगरसेवकाने महापालिकेच्या ग्रंथालयाची शाखा वॉर्डात स्थापन केली आणि त्याला नातलगाचे नाव देऊन मोकळा झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करताना पुतळा अनावरण करतानाची कोनशिला फुटल्याचे कारण देत विद्यमान लोकप्रतिनिधींच्या नावाची कोनशिला लावल्याचा प्रकार नुकताच घडूनसुध्दा महापालिकेचे कर्तेधर्ते पुन्हा त्याच त्याच चुका करीत आहेत, असेच म्हणावे लागेल. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, नागरी सुविधा या प्राथमिक बाबींवर सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करणे अपेक्षित असताना नामकरणासारख्या भावनिक मुद्यांभोवती या संस्था व्यग्र होणे एकूणच लोकशाही, समाजव्यवस्थेला घातक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.