शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाद नामकरणाचा

By admin | Updated: June 21, 2017 01:15 IST

‘नावात काय आहे, अशी विचारणा सद्यस्थितीत करता येईल काय? नावातच सर्व काही आहे, अशी जगरहाटी बनली आहे. देश वा राज्यातील सरकार बदलले की

‘नावात काय आहे, अशी विचारणा सद्यस्थितीत करता येईल काय? नावातच सर्व काही आहे, अशी जगरहाटी बनली आहे. देश वा राज्यातील सरकार बदलले की, सगळ्यात आधी काय काम केले जाते तर शासकीय योजनांची नावे बदलली जातात. त्या योजना लाभार्र्थींपर्यंत पोहोचतात काय? काही अडचणी आहेत काय? हा शोध घेणे सत्ताधाऱ्यांना आवश्यक वाटत नाही. कारण त्यासाठी अभ्यास करावा लागेल, नामकरण कसे झटपट होते. प्रसिध्दीदेखील मिळते आणि भक्त खूश होतात. योजनांपाठोपाठ मोगलकालीन वा ब्रिटिशकालीन एखाद्या गाव वा शहराचे नाव बदलण्याची मागणी वा प्रस्ताव चर्चेत येतो. गुलामीची निशाणी पुसण्याचे कारण दिले जाते, त्याला विरोध होण्याचे काही एक कारण नसते. प्रादेशिक, भाषिक अस्मितांसाठी राज्यांच्या राजधानी, महानगरांची नावे बदलली गेली आहेत. देशपातळीवर जे घडते, ते हळूहळू शहर, गावपातळीवर झिरपू लागले आहे. महामार्ग व राज्य मार्गावरील अनेक गावांच्या सीमेवर अलीकडे कमानी उभारून गावातील मोठ्या व्यक्तीचे नाव देण्याचा प्रघात सुरु झाला आहे. जळगाव शहरात असाच नामकरणाचा वाद सध्या गाजतोय. महापालिका कर्जबाजारी असल्याचे कारण देत विकास कामे करताना हात आखडता घेत असते. लोकसहभागातून चौक, उद्याने, शाळा, तलाव विकसित केले जात आहे. हा चांगला प्रयत्न असला तरी कायदेशीर चौकट, जनमताच्या भावनेचा आदर या बाबींकडे कानाडोळा केला जात आहे. याचा परिणाम असा झाला की, जनतेला विश्वासात न घेता झालेल्या नामकरणाच्या विरोधात जनता आता रस्त्यावर उतरली आहे. एखाद्या चौकाला नाव देण्यापूर्वी त्या चौकाला पूर्वी कुणाचे नाव दिले आहे काय? ही खबरदारी घेणे अपेक्षित असताना ती न घेतल्याने गहजब उडाला आहे. लोकप्रतिनिधीदेखील मतपेढीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून भूमिकांवरून कोलांटउडी मारत आहेत. एका नगरसेवकाने महापालिकेच्या ग्रंथालयाची शाखा वॉर्डात स्थापन केली आणि त्याला नातलगाचे नाव देऊन मोकळा झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करताना पुतळा अनावरण करतानाची कोनशिला फुटल्याचे कारण देत विद्यमान लोकप्रतिनिधींच्या नावाची कोनशिला लावल्याचा प्रकार नुकताच घडूनसुध्दा महापालिकेचे कर्तेधर्ते पुन्हा त्याच त्याच चुका करीत आहेत, असेच म्हणावे लागेल. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, नागरी सुविधा या प्राथमिक बाबींवर सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करणे अपेक्षित असताना नामकरणासारख्या भावनिक मुद्यांभोवती या संस्था व्यग्र होणे एकूणच लोकशाही, समाजव्यवस्थेला घातक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.