शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

वाद नामकरणाचा

By admin | Updated: June 21, 2017 01:15 IST

‘नावात काय आहे, अशी विचारणा सद्यस्थितीत करता येईल काय? नावातच सर्व काही आहे, अशी जगरहाटी बनली आहे. देश वा राज्यातील सरकार बदलले की

‘नावात काय आहे, अशी विचारणा सद्यस्थितीत करता येईल काय? नावातच सर्व काही आहे, अशी जगरहाटी बनली आहे. देश वा राज्यातील सरकार बदलले की, सगळ्यात आधी काय काम केले जाते तर शासकीय योजनांची नावे बदलली जातात. त्या योजना लाभार्र्थींपर्यंत पोहोचतात काय? काही अडचणी आहेत काय? हा शोध घेणे सत्ताधाऱ्यांना आवश्यक वाटत नाही. कारण त्यासाठी अभ्यास करावा लागेल, नामकरण कसे झटपट होते. प्रसिध्दीदेखील मिळते आणि भक्त खूश होतात. योजनांपाठोपाठ मोगलकालीन वा ब्रिटिशकालीन एखाद्या गाव वा शहराचे नाव बदलण्याची मागणी वा प्रस्ताव चर्चेत येतो. गुलामीची निशाणी पुसण्याचे कारण दिले जाते, त्याला विरोध होण्याचे काही एक कारण नसते. प्रादेशिक, भाषिक अस्मितांसाठी राज्यांच्या राजधानी, महानगरांची नावे बदलली गेली आहेत. देशपातळीवर जे घडते, ते हळूहळू शहर, गावपातळीवर झिरपू लागले आहे. महामार्ग व राज्य मार्गावरील अनेक गावांच्या सीमेवर अलीकडे कमानी उभारून गावातील मोठ्या व्यक्तीचे नाव देण्याचा प्रघात सुरु झाला आहे. जळगाव शहरात असाच नामकरणाचा वाद सध्या गाजतोय. महापालिका कर्जबाजारी असल्याचे कारण देत विकास कामे करताना हात आखडता घेत असते. लोकसहभागातून चौक, उद्याने, शाळा, तलाव विकसित केले जात आहे. हा चांगला प्रयत्न असला तरी कायदेशीर चौकट, जनमताच्या भावनेचा आदर या बाबींकडे कानाडोळा केला जात आहे. याचा परिणाम असा झाला की, जनतेला विश्वासात न घेता झालेल्या नामकरणाच्या विरोधात जनता आता रस्त्यावर उतरली आहे. एखाद्या चौकाला नाव देण्यापूर्वी त्या चौकाला पूर्वी कुणाचे नाव दिले आहे काय? ही खबरदारी घेणे अपेक्षित असताना ती न घेतल्याने गहजब उडाला आहे. लोकप्रतिनिधीदेखील मतपेढीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून भूमिकांवरून कोलांटउडी मारत आहेत. एका नगरसेवकाने महापालिकेच्या ग्रंथालयाची शाखा वॉर्डात स्थापन केली आणि त्याला नातलगाचे नाव देऊन मोकळा झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करताना पुतळा अनावरण करतानाची कोनशिला फुटल्याचे कारण देत विद्यमान लोकप्रतिनिधींच्या नावाची कोनशिला लावल्याचा प्रकार नुकताच घडूनसुध्दा महापालिकेचे कर्तेधर्ते पुन्हा त्याच त्याच चुका करीत आहेत, असेच म्हणावे लागेल. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, नागरी सुविधा या प्राथमिक बाबींवर सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करणे अपेक्षित असताना नामकरणासारख्या भावनिक मुद्यांभोवती या संस्था व्यग्र होणे एकूणच लोकशाही, समाजव्यवस्थेला घातक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.