शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पाणी नव्हे, पैसा वाहतो

By admin | Updated: June 2, 2015 23:48 IST

पाण्यासाठी रानोमाळ हिंडणे मराठवाड्यासाठी नवीन नाही. दरवर्षीचेच हे चित्र; पण यावर्षी सुमारे ३२ जणांना पाण्यासाठी हकनाक आपला जीव गमवावा लागला.

सुधीर महाजन -पाण्यासाठी रानोमाळ हिंडणे मराठवाड्यासाठी नवीन नाही. दरवर्षीचेच हे चित्र; पण यावर्षी सुमारे ३२ जणांना पाण्यासाठी हकनाक आपला जीव गमवावा लागला. हे सर्वजण पाणी भरताना विहिरीत पडून मृत्यू पावले. याची दखल वर्तमानपत्रांनी बातमीपुरती घेतली. प्रशासनाने नोंद घेण्यापुरती तसदी घेतली. हे मात्र जिवानिशी गेले. मरणाचे कारणही क्षुल्लक म्हणता येणार नाही, कारण मराठवाड्यासाठी पाणी ही गोष्ट क्षुल्लक राहिली नाही. तरीही या ३२ जणांचे मरण दुर्लक्षून चालणार नाही, कारण सरकारने पाण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असेही कागदोपत्री म्हणता येणार नाही. आता पाहा सरकारने गावोगाव पाणीपुरवठा योजना राबविल्या. कधी त्या ‘भारत निर्माण’मार्फत तर कधी ‘पेयजल मिशन’. योजना तीच फक्त नाव बदलले. नव्या बाटलीत जुनी दारू.खेड्यांसाठी पाणीपुरवठा योजना नवीन नाहीत. दरवर्षी त्या राबविण्यात येतात. यावर्षी तब्बल सव्वादोन अब्ज रुपये या योजनेसाठी खर्च होत आहेत. १७१६ गावांमध्ये योजना झाल्या; पण त्यापैकी १०४८ अर्धवट आहेत. एवढा पैसा खर्च होऊनही आज मराठवाड्यात १७१० टँकर पाणीपुरवठा करतात, ही परिस्थिती आहे.खेड्यांच्या पाणीपुरवठा योजना यशस्वी का होत नाहीत हा कळीचा प्रश्न आहे. एक तर त्यांचा निधी लाखात असतो आणि तेथेच सरकारी यंत्रणेचा त्यातील रस संपतो. त्यांच्या गुणवत्तेवरही यंत्रणा लक्ष देत नाही. २०१० पूर्वी स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा समित्या स्थापन करून योजना राबविली जात असे. गावातील प्रतिष्ठित म्हणजे राजकीय बलदंड व्यक्ती अध्यक्ष आणि ग्रामसेवक सचिव अशी या समितीची रचना होती. त्यामुळे हे कुरण मिळून खाण्यासाठी आहे असे समजत योजना राबविल्या गेल्या, मग त्या भारत निर्माणच्या असो, की जल स्वराज्यच्या. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्ता न तपासता गुणवत्तेचे निकष पूर्ण केल्याचा अहवाल या यंत्रणेने सरसकट दिला असल्याने पैसा खर्च झाला; पण गावकऱ्यांना पाणी मिळालेच नाही. अशी अनेक गाव- खेडी आहेत.दुसरे कारण अशा योजनांचे आयुष्यच पंधरा वर्षांचे गृहीत धरलेले असते. त्या पूर्ण करण्यासाठी दोन-तीन वर्षांचा अवधी घेतला जातो. शिवाय या कामातील सर्व पातळ्यांवरील टक्केवारीचे वाटप पाहता वरपासून खालपर्यंत आणि शहरांपासून खेड्यापर्यंत मंजूर पैशांपैकी ४० ते ५० टक्के निधीचे वाटप करावे लागते आणि योजना पूर्ण करतेवेळी गुणवत्तेशी तडजोड होते. पर्यायाने मजबूत आणि दीर्घकाळ चालणारी योजना कशी उभी राहणार?या योजनांसाठी विहीर ५० फुटापर्यंत खोदता येते. मराठवाड्यात ५० फुटावर पाणी लागणार अशी जागा शोधूनही सापडणार नाही. अशावेळी इतर ठिकाणाहून उचलून पाणी या विहिरीत टाकले जाते. विजेचा हा खर्च गावाने पाणीपट्टीतून देणे अपेक्षित आहे; पण वसुलीच होत नाही, त्यामुळे वीज बिल थकते आणि पुरवठा तोडला जातो. मराठवाड्यातील ५० टक्के योजना याच कारणांमुळे बंद आहेत. काही योजना पाण्याचा स्रोत आटला, यंत्रणेत बिघाड झाला म्हणून बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत. या योजनांच्या नळांमध्ये असे अनेक शुक्राचार्य दडून बसले आहेत. गावातील गटातटाचे राजकारण हे सुद्धा महत्त्वाचे कारण ठरते. सत्ताधारी गटाने आणलेली योजना पूर्ण न होऊ देण्याचा चंग विरोधी गटाने बांधलेला असतो आणि या राजकारणात अनेक योजना अपूर्ण राहतात. योजनांच्या कामातील टक्केवारी हा गावातील राजकारणात महत्त्वाचा मुद्दा असतो.दहा-बारा गावांची मिळून एखादी योजना असेल तर त्यांचे दुखणे वेगळेच. यापैकी निम्म्या गावाला पाणी मिळते आणि शेवटची गावे कायम तहानलेली असतात. कागदोपत्री योजना राबविल्यामुळे त्यांना दुसरी योजना मिळत नाही. अशी विदारक अवस्था मराठवाड्यातील पाणीपुरवठ्याची आहे. अब्जावधी रुपये खर्च होऊनही टँकर चालू आहे, तरीही लोकांना जीव गमवावा लागतो. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाहतो; पण नळातून पाणी वाहत नाही हेच दुर्दैव आहे.