शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

नको ते नामकरण!

By admin | Updated: June 22, 2016 23:39 IST

जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. तसा शरद पवार यांच्या उपस्थितीतील विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्याचा उल्लेख झाला

जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. तसा शरद पवार यांच्या उपस्थितीतील विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्याचा उल्लेख झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांनी विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा अनुभव पवार यांच्या गाठीशी असल्याने स्वकीय आमदाराने आणखी एका विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय त्यांच्यासमोर मांडला असावा. नागपूर, पुणे, नांदेड आदी विद्यापीठांना महापुरुषांची नावे दिली, तसे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठालाही द्यावे, असे त्यांचे समर्थन होते. परंतु ही मागणी अस्थानी होती, अशी जनभावना कार्यक्रमस्थळी उमटली. कारण पवार हे सत्तेत नाहीत हे एक कारण आहे. दुसरे म्हणजे पंधरवड्यापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विद्यापीठाला संत मुक्ताईचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. अमळनेर कर्मभूमी असलेले साने गुरुजी यांचे नाव द्यावे, अशीदेखील मागणी मध्यंतरी झाली होती. एकापेक्षा अधिक नावांची चर्चा असल्याने त्याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांच्या मागणीकडे खडसे यांना विरोध या स्वरूपात पाहिले जात आहे. पवार हे मुरब्बी नेते असल्याने त्यांनी स्वकीय आमदाराच्या मागणीकडे पूर्णत: काणाडोळा केला. परंतु विद्यापीठ स्थापनेच्यावेळी २५ वर्षांपूर्वी झालेल्या संघर्षाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. विद्यापीठ कोठे व्हावे, याविषयी आंदोलने झाली होती. नाशिक-नगरने पुणे विद्यापीठात राहण्याचे ठरविल्याने विद्यापीठ जळगावला दिल्याचे पवार म्हणाले. अर्थात त्या बदल्यात नाशिकला मुक्त विद्यापीठ देण्यात आले. धुळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. नाव उत्तर महाराष्ट्र असले तरी केवळ दोन (नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर तीन) जिल्ह्यांचे विद्यापीठ म्हणून ‘खान्देश’ हे नाव सार्थ ठरले असते, असाही एक मतप्रवाह आहे. अर्थात नामकरणाच्या वादात न अडकता रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या या विद्यापीठाने प्रगतीच्या दृष्टीने चांगली वाटचाल केली आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत विद्यापीठाने ५९ वे स्थान पटकावले. संशोधन आणि पेटंटच्या क्षेत्रात विद्यापीठाचा २४ वा क्रमांक आहे आणि नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. जपानसह काही देशांमधील विद्यापीठांशी करार करण्यातदेखील विद्यापीठाला यश आले आहे. खान्देशातील शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देण्याचे काम विद्यापीठ करीत असताना राजकीय मंडळी मात्र नामकरणाच्या सीमित गोष्टींमध्ये अडकली आहे.