शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नको ते नामकरण!

By admin | Updated: June 22, 2016 23:39 IST

जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. तसा शरद पवार यांच्या उपस्थितीतील विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्याचा उल्लेख झाला

जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. तसा शरद पवार यांच्या उपस्थितीतील विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्याचा उल्लेख झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांनी विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा अनुभव पवार यांच्या गाठीशी असल्याने स्वकीय आमदाराने आणखी एका विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय त्यांच्यासमोर मांडला असावा. नागपूर, पुणे, नांदेड आदी विद्यापीठांना महापुरुषांची नावे दिली, तसे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठालाही द्यावे, असे त्यांचे समर्थन होते. परंतु ही मागणी अस्थानी होती, अशी जनभावना कार्यक्रमस्थळी उमटली. कारण पवार हे सत्तेत नाहीत हे एक कारण आहे. दुसरे म्हणजे पंधरवड्यापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विद्यापीठाला संत मुक्ताईचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. अमळनेर कर्मभूमी असलेले साने गुरुजी यांचे नाव द्यावे, अशीदेखील मागणी मध्यंतरी झाली होती. एकापेक्षा अधिक नावांची चर्चा असल्याने त्याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांच्या मागणीकडे खडसे यांना विरोध या स्वरूपात पाहिले जात आहे. पवार हे मुरब्बी नेते असल्याने त्यांनी स्वकीय आमदाराच्या मागणीकडे पूर्णत: काणाडोळा केला. परंतु विद्यापीठ स्थापनेच्यावेळी २५ वर्षांपूर्वी झालेल्या संघर्षाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. विद्यापीठ कोठे व्हावे, याविषयी आंदोलने झाली होती. नाशिक-नगरने पुणे विद्यापीठात राहण्याचे ठरविल्याने विद्यापीठ जळगावला दिल्याचे पवार म्हणाले. अर्थात त्या बदल्यात नाशिकला मुक्त विद्यापीठ देण्यात आले. धुळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. नाव उत्तर महाराष्ट्र असले तरी केवळ दोन (नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर तीन) जिल्ह्यांचे विद्यापीठ म्हणून ‘खान्देश’ हे नाव सार्थ ठरले असते, असाही एक मतप्रवाह आहे. अर्थात नामकरणाच्या वादात न अडकता रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या या विद्यापीठाने प्रगतीच्या दृष्टीने चांगली वाटचाल केली आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत विद्यापीठाने ५९ वे स्थान पटकावले. संशोधन आणि पेटंटच्या क्षेत्रात विद्यापीठाचा २४ वा क्रमांक आहे आणि नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. जपानसह काही देशांमधील विद्यापीठांशी करार करण्यातदेखील विद्यापीठाला यश आले आहे. खान्देशातील शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देण्याचे काम विद्यापीठ करीत असताना राजकीय मंडळी मात्र नामकरणाच्या सीमित गोष्टींमध्ये अडकली आहे.