शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

विस्तार नव्हे, फेरबदलच!

By admin | Updated: July 6, 2016 03:05 IST

केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा पहिला बदल मंगळवारी झाला. ‘हा विस्तार आहे, फेरबदल नाही’, असा खुलासा सरकारी कारभाराबाबत एक शब्दानेही प्रसार माध्यमांशी न बोलणाऱ्या मोदींंनी

केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा पहिला बदल मंगळवारी झाला. ‘हा विस्तार आहे, फेरबदल नाही’, असा खुलासा सरकारी कारभाराबाबत एक शब्दानेही प्रसार माध्यमांशी न बोलणाऱ्या मोदींंनी सोमवारीच वृत्तपत्रांना दिलेल्या लेखी ‘मुलाखती’त केला होता. त्याचबरोबर जातीची व इतर समीकरणे डोळ्यापुढे ठेऊन विस्तार करण्यात आलेला नाही, तर कारभाराची सुलभता व कार्यक्षमता यांच्या दृष्टीने तो करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. अर्थात मोदी यांनी काहीही दावे केले, तरी त्यांच्या मंत्रिमंडळात ‘फेरबदल’च झाला आहे, हा नुसता ‘विस्तार’ नाही. अन्यथा पाच मंत्र्यांना त्यांनी वगळले नसते. पुढील वर्षांत उत्तर प्रदेश, पंजाब व गुजरातेत निवडणुका आहेत. मंत्रिमंडळातील फेरबदलावर या राजकीय परिस्थितीचा प्रभाव आहे. गुजरातेत राखीव जागांच्या मुद्यावरून पटेल समाजाचे आंदोलन पेटले होते. त्याचा भर आता ओसरला असला, तरी पटेल समाजात अस्वस्थता धुमसतच आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलात गुजरातेतील ज्या खासदारांना सामावून घेण्यात आले आहे, त्यामागे या आंदोलनाला तोंड देण्याचा एक भाग आहे. राजस्थानातून आलेल्या एका मंत्र्यावर मोदी सरकार स्थापन झाल्यापासूनच महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. त्याला वगळण्यात आले आहे आणि त्या राज्यातील तिघांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले आहे. असे करण्यामागे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि प्रदेश भाजपाच्या नेतृत्वात जो वाद आहे, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातून रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या रामदास आठवले यांना राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. गेली काही वर्षे राष्ट्रवादी तसेच काँगे्रस आणि नंतर भाजपा-सेना यांच्या दरवाजापाशी सत्तापद झोळीत पडावे, म्हणून याचना करीत बसलेल्या आठवले यांना अखेर दान देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर प्रथमच केंद्रात रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व मिळाल्याचा दावा काही अतिउत्साही आठवले समर्थकांनी केला आहे. डॉ. आंबेडकर मंत्रिमंडळात होते, तेव्हा रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात नव्हता, एवढा साधा तपशीलही आठवले समर्थकांना ठाऊक नसावा, हे आज दलित चळवळीत जी एकूण बौद्धिक दिवाळखोरी आहे, तिला साजेसेच आहे. आठवले यांना राज्यमंत्रिपद देण्यामागे दलित समाजाचे पाठबळ फडणवीस सरकारच्या मागे उभे करण्याचा उद्देश नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. तसेच उत्तर प्रदेशातील निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन आठवले यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलेले नाही; कारण आठवले यांचा जो गट आहे, त्याचा जेथे महाराष्ट्रातही प्रभाव नाही, तेथे उत्तर प्रदेशात त्यांना कोण विचारतो? आठवले यांना राज्यमंत्रिपद देण्यामागे एकमेव उद्देश आहे, शिवसेनेचे नाक कापणे. आठवले यांना आम्ही केवळ ‘नाम के वास्ते’ मंत्रिंमडळात घेत आहोत, तशीच तुमची अवस्था आहे, तुम्हाला एक मंत्रिपद आधीच दिले आहे, आता दुसरे मिळणार नाही, हे मोदी-शाह शिवसेनेला सांगत आहेत. आता जेव्हा राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होईल, तेव्हाही एक दोन राज्यमंत्रिपदापलीकडे सेनेच्या हाती काही लागण्याची शक्यता नाही. ही ‘मोदीनीती’ लक्षात घेऊन आपली रणनीती आखण्याची धमक जर सेना नेतृत्वात असेल, तरच तिला राज्याच्या राजकारणात आपला जो काही प्रभाव उरला आहे, तो शाबूत ठेवून पुढे वाटचाल करता येणार आहे. पुण्याचे प्रकाश जावडेकर यांना स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली आहे, तर धुळ्याचे भाजपाचे खासदार डॉ. भामरे यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. जावडेकर यांची बढती म्हणजे मोदी यांची ‘व्हिजन’ अंमलात आणण्यासाठी त्यांनी जी कंबर कसली होती, त्याची पावती आहे. महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात समाविष्ट केले गेलेले दुसरे राज्यमंत्री डॉ. भामरे यांची निवड राज्यात घडलेल्या ‘खडसे प्रकरणा’च्या पार्श्वभूमीवर बघायला हवी. ‘स्वच्छ प्रतिमे’ला आमच्या लेखी महत्व आहे, असा संदेश भाजपा राज्यातील जनतेला देऊ पाहात आहे, तसेच खान्देशात एक नवे नेतृत्व पुढे आणण्याचा हा प्रयत्नही असू शकतो. मात्र खडसे यांनी कितीही थयथयाट केला, तरी आम्ही त्याला किंमत देत नाही, असेही डॉ. भामरे यांची निवड दर्शवते. त्यापासून आता खडसे धडा घेऊन शांत होतात काय, ते बघायचे. मोदी यांची देशाबाबत जी ‘व्हिजन’ आहे, ती अंमलात आणण्याच्या दृष्टीने मदतकारक ठरावे, याच उद्देशाने या साऱ्या नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे, असे भाजपातर्फे सांगण्यात येत आहे. एका अर्थाने गेल्या दोन वर्षांत संसदीय राज्यपद्धतीतील ‘कॅबिनेट’ कार्यपद्धतीत मोदी जे काही मूलभूत बदल घडवून आणत आहेत, त्याच्याशी सुसंगत असेच हे प्रतिपादन आहे. त्यामुळे आता येत्या तीन वर्षांत ज्या काही निवडणुका होणार आहेत, त्यात मोदी यांच्या या ‘व्हिजन’चा प्रभाव पडून भाजपाच्या हाती किती यश येते, ते बघायचे.