शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

नितीश-मोदी गुळपीठ!

By admin | Updated: January 26, 2017 02:43 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा निश्चलनीकरणाचे समर्थन केले. निश्चलनीकरणामागचा उद्देश निश्चितपणे स्तुत्य होता

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा निश्चलनीकरणाचे समर्थन केले. निश्चलनीकरणामागचा उद्देश निश्चितपणे स्तुत्य होता, बॅँकांमध्ये ठेवी जमा होऊन बेहिशेबी पैसा पुन्हा अर्थव्यवस्थेत परत येत असेल तर त्यामध्ये वाईट काय, या शब्दात नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाची पाठराखण केली. गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार नकोत, या एकमेव मुद्द्यावरून नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाने भारतीय जनता पक्षासोबतची अनेक वर्षांची युती मोडीत काढली होती. त्या पार्श्वभूमीवर अलीकडे नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींदरम्यान वाढू लागलेला स्नेह बघून अनेकांच्या भुवया उंचावू लागल्या आहेत. केवळ निश्चलनीकरणाच्या मुद्द्यावर मोदींना पाठिंबा देऊनच नितीश कुमार थांबले असे नव्हे, तर मोदींची जाहीररीत्या प्रशंसा करण्यातही त्यांना काही वावगे वाटेनासे झाले आहे. ते बघून, मोदींच्या पंगतीला बसायची पाळी येऊ नये म्हणून भाजपा नेत्यांना दिलेले भोजनाचे आमंत्रण रद्द करणारे, गुजरात सरकारने बिहारमधील पूरग्रस्तांना दिलेली मदत नाकारणारे नितीश कुमार ते हेच का, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. अनेकांना तर उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक न लढविण्याच्या नितीश कुमार यांच्या निर्णयामागेही धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट रोखण्याऐवजी भाजपाला मदत करण्याच्या हेतूचाच वास यायला लागला आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू बनलेल्या नितीश कुमार व मोदी यांच्या दरम्यान अचानक उफाळू लागलेल्या या प्रेमामागचे एकमेव कारण म्हणजे अल्पकालीन व दीर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन दोघांनाही भासू लागलेली एकमेकांची गरज! भाजपाला या वर्षाच्या मध्यावर राष्ट्रपती निवडणुकीची चाचणी उत्तीर्ण करायची आहे. स्वबळावर राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडून आणण्याएवढे संख्याबळ भाजपाजवळ नाही आणि विरोधी पक्षांच्या उमेदवाराकडून सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पराभूत होण्याची नामुष्कीही परवडण्यासारखी नाही. या बाबतीत संयुक्त जनता दलाचा पाठिंबा भाजपासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांना चाप बसविण्यासाठी नितीश कुमार यांना भाजपा अत्यंत उपयुक्त ठरतो. नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांना वेगळे केल्याशिवाय भाजपाला बिहारमध्ये भवितव्य नाही. दुसरीकडे नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजकारणाचा पिंड पूर्णपणे वेगवेगळा असल्यामुळे दोघांचे फार काळ जमणे जवळपास अशक्य मानले जाते. त्या स्थितीत एकट्या नितीश कुमार यांचा पाड लागणे अशक्यप्राय आहे. त्यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे दीर्घकालीन राजकारण लक्षात घेता नितीश कुमार व नरेंद्र मोदी यांचे गुळपीठ जमणे अगदी स्वाभाविक म्हणावे लागेल. गत काही दिवसातील घडामोडी तीच दिशा दाखवत आहेत.