शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
3
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
4
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
5
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
6
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
7
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
8
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
9
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
10
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
12
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
13
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
14
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
15
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
16
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
17
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
18
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
19
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
20
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

नितीन गडकरी : अभिनंदन व शुभेच्छा

By admin | Updated: May 27, 2017 00:02 IST

भूपृष्ठ आणि जलवाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री, नागपूरचे खासदार आणि विदर्भाचे सुपुत्र नितीन गडकरी हे आज वयाची ६0 वर्षे पूर्ण करीत आहेत.

भूपृष्ठ आणि जलवाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री, नागपूरचे खासदार आणि विदर्भाचे सुपुत्र नितीन गडकरी हे आज वयाची ६0 वर्षे पूर्ण करीत आहेत. धडाडी, जिद्द, निर्णयक्षमता, संघटनेवरील घट्ट पकड, दांडगा लोकसंग्रह आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती या गुणांनी त्यांचे नाव आजच देशाच्या पातळीवर घेतले जाऊ लागले आहे. महाराष्ट्र सरकारात बांधकाममंत्री असताना त्यांनी पुणे-मुंबई हा द्रुतगती महामार्ग ज्या वेगाने पूर्ण केला आणि साऱ्या राज्यात उड्डाणपूल उभे करून तेथील वाहतुकीची कोंडी ज्या तडफेने निकालात काढली त्याची प्रशंसा देशात तर झालीच; पण रतन टाटा आणि मुकेश अंबानींसारखी उद्योगक्षेत्रातील आघाडीची माणसे त्यासाठी त्यांचे जाहीर कौतुक करताना त्या काळात दिसली. हा देश रस्त्यांनी बांधून काढायचा तर ते काम गडकरीच करू शकतील, असे रतन टाटा अनेकदा म्हणाले. विकासासोबतच राजकारणावरची त्यांची पकड विलक्षण आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा विदर्भाचा प्रदेश त्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिकांसह त्यांनी ज्या तऱ्हेने भाजपाचा गड बनविला त्यातून त्यांचे संघटनचातुर्यही साऱ्यांच्या लक्षात आले. दिल्लीतील कारभार चोख राखून नागपूर ताब्यात ठेवणे, मोदींपासून भागवतांपर्यंतचे सारे पारिवारिक पुढारी प्रसन्न ठेवणे आणि शरद पवार ते उद्धव ठाकरे यांच्यासह स्थानिक पातळीवरील सर्व कार्यकर्ते, माध्यमे आणि स्नेहीजन स्वत:शी जोडून ठेवणे ही त्यांना साध्य झालेली बाब इतरांना क्वचितच जमणारी आहे. वास्तव हे की नितीन गडकरी एव्हाना देशाचे पंतप्रधानच व्हायचे. लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वात भाजपाने २००६ व २०११ ची निवडणूक गमावल्यानंतर संघाने पुढाकार घेऊन त्यांना त्यांची पदे सोडायला लावली आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना नितीन गडकरी या तरुण नेत्याला त्याने पक्षाचे अध्यक्षपद त्याच्या सर्वाधिकारांसह दिले. मात्र पक्षातील दिल्लीस्थित दुढ्ढाचार्यांना त्यांचे अपुरे वय आणि त्यांच्यामुळे आपल्या वाट्याला येऊ शकणाऱ्या संधी कायमच्या गमावण्याची भीती वाटल्याने त्यांनी गडकरींविरुद्ध अगदी फुटकळ प्रकरणे उकरून काढून त्यांचाच गहजब केला. माध्यमांमध्ये अशा गहजबांची कंत्राटे घेतलेले लोक बरेच आहेत. शिवाय राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखी कोणत्याही यशस्वी माणसाविरुद्ध ऊर बडविणारी माणसेही देशात बरीच आहेत. या प्रकाराने संकोचलेल्या भाजपाच्या व संघाच्या नेत्यांनी गडकरी यांचे नाव पुढल्या कार्यकाळासाठी घेतले नाही. (वास्तव हे की गडकरी आणि पर्रीकर ही दोन तरुण नावेच तेव्हा संघाच्या विचारात होती.) गडकरींना मिळालेली संधी अशी हाताबाहेर गेल्याने भाजपाचे आताचे मोदी-शहा यांचे राजकारण पुढे आले. अडवाणी-जोशी मागे पडले, सुषमाबार्इंना त्यांचा पराभव दिसला आणि राज्यांची मुख्यमंत्रिपदे ओळीने तीनदा भूषविलेल्यांनाही गडकरींसाठी मागे ठेवण्याचे परिवाराचे राजकारण त्याचा इरादा स्पष्ट करणारेही होते. नंतरच्या काळात लोकसभेची निवडणूक लढवून केंद्रात महत्त्वाचे मंत्रिपद भूषविणाऱ्या गडकरींनी आपल्या वेगवान कार्यशैलीने आणि तिच्या परिणामकारक अंमलबजावणीने साऱ्यांनाच दिपविले. साऱ्या देशात आज महामार्गांचे बांधकाम ज्या गतीने सुरू आहे ते पाहता हा देश रस्त्यांनी एकत्र करता येतो ही म्हण ते खरी करतील याविषयी कुणाच्या मनात संशय उरत नाही. मोदींच्या मंत्रिमंडळात तीन वर्षे काम केल्यावर आणि शहांच्या अगोदर पक्षाचे अध्यक्षपद सांभाळल्यावर गडकरी यांना त्यांच्या आताच्या पदाहून मोठे पद मिळणे व त्यांचा समावेश मंत्रिमंडळाच्या कोअर कमिटीत होणे अपेक्षित होते. पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री हे पाचजण त्या समितीचे सभासद असतात. मोदींनी देशाचे संरक्षणमंत्रिपद आरंभी स्वत:कडे ठेवले. पुढे ते जेटलींना चालवायला दिले. नंतर त्यावर पर्रीकर आले आणि आता ते पुन्हा मोदी-जेटलींकडेच गेले आहे. एव्हाना ते महत्त्वाचे पद गडकरींकडे येणे उचित होते. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीत प्रवेश मिळून देशाच्या एकूणच विकासकार्यात सहभागी होण्याचे व त्याला मार्गदर्शन करण्याचे अधिकार मिळाले असते. जाहीररीत्या त्यांची तारीफ करणे वेगळे आणि त्यांच्या कर्तबगारीचे फळ त्यांना योग्यवेळी देणे वेगळे. चांगल्या व स्वच्छ राजकारणाची व तशाच मानसिकतेची ती साक्ष ठरते. गडकरी यांनीही तेव्हाच्या टीकाकारांची टीका मनावर घेतल्याचे कधी दिसले नाही. एक प्रसन्नचित्त दिसणारा व जनतेशी सहज संवाद साधणारा कार्यकर्ता आणि नेता असेच त्यांचे चित्र साऱ्यांच्या मनात आज ठसले आहे. अशा प्रतिमांच्या नेत्यांची वाटचाल त्यांना नेहमीच यशाकडे व अधिक मोठ्या जबाबदाऱ्यांकडे नेणारी असते असेच आजवर आढळलेही आहे. गडकरी हे भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री आणि मुरब्बी राजकारणी असले तरी ‘लोकमत’ परिवाराशी ते कमालीच्या आत्मीयतेने जुळले आहेत. हा स्नेह आणखी वाढावा आणि तसे होताना त्यांच्या वाट्याला आणखी मोठ्या सन्मानाची पदे यावी ही लोकमत परिवाराची इच्छा आहे. केवळ राजकीयच नव्हे, तर औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक व सेवेच्या सर्व क्षेत्रांत त्यांचा वावर व सद््भाव वाढावा, ही शुभेच्छा !