शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

बळीराजाच्या नाडवणुकीची नवी त-हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 17:16 IST

मिलिंद कुलकर्णी आपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. लोकसंख्येच्या ६० ते ७० लोक शेतीवर अवलंबून आहेत. ...

मिलिंद कुलकर्णीआपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. लोकसंख्येच्या ६० ते ७० लोक शेतीवर अवलंबून आहेत. बळीराजाच्या अपार कष्ट आणि अमर्याद मेहनतीतून अन्नधान्याविषयी आपण स्वयंपूर्ण होऊ शकलो. हरितक्रांती, धवलक्रांती ही बळीराजाने तंत्रज्ञानाची अनोखी जोड दिल्याने शक्य झाली आहे, असे आपण कृषीक्षेत्र आणि बळीराजाच्या सन्मानासाठी नेहमी म्हणत असतो. हे शंभर टक्के सत्य असले तरी बळीराजाच्या मदतीसाठी सरकार, शास्त्रज्ञ, समाज या पातळीवर अजूनही उदासीनता आहे. नाव शेतकऱ्याचे आणि भले भलत्याचे असा सगळा प्रकार आहे. डझनभर शेतकरी संघटना अस्तित्वात असल्या तरी त्यांचे विषय हे मूठभर शेतकऱ्यांच्या हिताचे राहिलेले आहेत. राजकीय पक्षांची तर सत्ताधारी आणि विरोधक या भूमिकेत विभागणी झाल्याने त्यांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. विरोधी पक्ष म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष शेतकरी हिताची बाजू हिरीरीने मांडत असतो, मात्र तोच पक्ष जेव्हा सत्तेत सहभागी होतो, तेव्हा त्याची भाषा बदलली असते. शेतकरी संघटित नसल्याने त्यांच्या प्रश्नांना, व्यथांना वाचा फोडली जात नाही. अस्मानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे तो झेलत असतो. स्वत: उत्पादन केलेल्या मालाचा भाव ठरवू शकत नसलेला एकमेव व्यवसाय हा शेती आहे.शेतकºयाची लुबाडणूक आणि नाडवणूक किती प्रकारे आणि किती पातळींवर होत असते याची जंत्री मांडायची ठरवली तर ती हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाईल. अगदी बी-बियाणे, किटकनाशके आणि खतांपासून तर वीज, पाणी, धान्य विक्रीपर्यंत लुबाडणूक होत असते. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तर पंचनाम्यापासून तर बँकेत नुकसानभरपाईची रक्कम जमा होईपर्यंत किती संघर्ष करावा लागतो, हा एखाद्या कथा, कादंबरीचा विषय होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यातील बिडगाव परिसरात वादळामुळे वीजेचे खांब कोसळले. ८० तास वीजपुरवठा खंडित होता. बागायती कापसाचे अंकूर शेतकºयासमोर जळत होते, पण तो काहीही करु शकला नाही. ही हतबलता जिवघेणी असते, हे समजून घ्यायला संवेदनशीलता हवी.लुबाडणुकीची नवी तºहा आता समोर आली आहे. नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील काही शेतकºयांनी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी उस तोडणी करणाºया ठेकेदाराला बैलजोड्या आणि गाड्या भाड्याने दिल्या होत्या. रब्बी पिकाची शाश्वती नसल्याने आॅक्टोबर महिन्यात अनेक शेतकरी बैलजोड्यांसह गाड्या भाड्याने देत असतात. कोरडवाहू शेतकºयांनी उत्पन्नाचा हा नवा मार्ग अवलंबला आहे. करार करुन जूनपर्यंत या गाड्या दिल्या जातात. खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी त्या परत घेऊन नियमित शेतीकाम सुरु करतात. नगर आणि खान्देश हे अंतर लक्षात घेता हा सगळा विश्वासावर चालणारा व्यवहार असतो. शेतक-यांच्या भोळेपणाचा फायदा उठवत ठेकेदाराने एकीकडे बैलजोड्या परस्पर विकून टाकल्या आणि पुन्हा शेतक-यांना नोटीस पाठवून पैसे घेणे असल्याचे कळविले. शेतक-यांनी अमळनेर, नगर पोलिस स्टेशन गाठून कैफीयत मांडली, पण उपयोग झाला नाही. नंदुरबारचे शेतकरी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असताना अमळनेरच्या १४ शेतक-यांनी दुष्काळ पाहणी दौ-यावर आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ही व्यथा मांडली. त्यांनी दखल घेतल्याने पोलीस दल सक्रीय झाले आणि ठेकेदाराला अटक झाली. प्रत्येक शेतकºयाला बैलजोडी ४० हजार रुपये त्याने परत केले. पाटील यांच्या सक्रीयतेचे कौतुक आहेच, पण पोलीस स्टेशनने सुरुवातीलाच दखल घेतली असती तर शेतकºयांना हेलपाटे आणि मानसिक त्रास झाला नसता. शेतकºयाच्या असहायतेचा फायदा असा सर्वत्र घेतला जात असतो, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा दिसून आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव