शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाच्या नाडवणुकीची नवी त-हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 17:16 IST

मिलिंद कुलकर्णी आपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. लोकसंख्येच्या ६० ते ७० लोक शेतीवर अवलंबून आहेत. ...

मिलिंद कुलकर्णीआपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. लोकसंख्येच्या ६० ते ७० लोक शेतीवर अवलंबून आहेत. बळीराजाच्या अपार कष्ट आणि अमर्याद मेहनतीतून अन्नधान्याविषयी आपण स्वयंपूर्ण होऊ शकलो. हरितक्रांती, धवलक्रांती ही बळीराजाने तंत्रज्ञानाची अनोखी जोड दिल्याने शक्य झाली आहे, असे आपण कृषीक्षेत्र आणि बळीराजाच्या सन्मानासाठी नेहमी म्हणत असतो. हे शंभर टक्के सत्य असले तरी बळीराजाच्या मदतीसाठी सरकार, शास्त्रज्ञ, समाज या पातळीवर अजूनही उदासीनता आहे. नाव शेतकऱ्याचे आणि भले भलत्याचे असा सगळा प्रकार आहे. डझनभर शेतकरी संघटना अस्तित्वात असल्या तरी त्यांचे विषय हे मूठभर शेतकऱ्यांच्या हिताचे राहिलेले आहेत. राजकीय पक्षांची तर सत्ताधारी आणि विरोधक या भूमिकेत विभागणी झाल्याने त्यांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. विरोधी पक्ष म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष शेतकरी हिताची बाजू हिरीरीने मांडत असतो, मात्र तोच पक्ष जेव्हा सत्तेत सहभागी होतो, तेव्हा त्याची भाषा बदलली असते. शेतकरी संघटित नसल्याने त्यांच्या प्रश्नांना, व्यथांना वाचा फोडली जात नाही. अस्मानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे तो झेलत असतो. स्वत: उत्पादन केलेल्या मालाचा भाव ठरवू शकत नसलेला एकमेव व्यवसाय हा शेती आहे.शेतकºयाची लुबाडणूक आणि नाडवणूक किती प्रकारे आणि किती पातळींवर होत असते याची जंत्री मांडायची ठरवली तर ती हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाईल. अगदी बी-बियाणे, किटकनाशके आणि खतांपासून तर वीज, पाणी, धान्य विक्रीपर्यंत लुबाडणूक होत असते. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तर पंचनाम्यापासून तर बँकेत नुकसानभरपाईची रक्कम जमा होईपर्यंत किती संघर्ष करावा लागतो, हा एखाद्या कथा, कादंबरीचा विषय होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यातील बिडगाव परिसरात वादळामुळे वीजेचे खांब कोसळले. ८० तास वीजपुरवठा खंडित होता. बागायती कापसाचे अंकूर शेतकºयासमोर जळत होते, पण तो काहीही करु शकला नाही. ही हतबलता जिवघेणी असते, हे समजून घ्यायला संवेदनशीलता हवी.लुबाडणुकीची नवी तºहा आता समोर आली आहे. नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील काही शेतकºयांनी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी उस तोडणी करणाºया ठेकेदाराला बैलजोड्या आणि गाड्या भाड्याने दिल्या होत्या. रब्बी पिकाची शाश्वती नसल्याने आॅक्टोबर महिन्यात अनेक शेतकरी बैलजोड्यांसह गाड्या भाड्याने देत असतात. कोरडवाहू शेतकºयांनी उत्पन्नाचा हा नवा मार्ग अवलंबला आहे. करार करुन जूनपर्यंत या गाड्या दिल्या जातात. खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी त्या परत घेऊन नियमित शेतीकाम सुरु करतात. नगर आणि खान्देश हे अंतर लक्षात घेता हा सगळा विश्वासावर चालणारा व्यवहार असतो. शेतक-यांच्या भोळेपणाचा फायदा उठवत ठेकेदाराने एकीकडे बैलजोड्या परस्पर विकून टाकल्या आणि पुन्हा शेतक-यांना नोटीस पाठवून पैसे घेणे असल्याचे कळविले. शेतक-यांनी अमळनेर, नगर पोलिस स्टेशन गाठून कैफीयत मांडली, पण उपयोग झाला नाही. नंदुरबारचे शेतकरी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असताना अमळनेरच्या १४ शेतक-यांनी दुष्काळ पाहणी दौ-यावर आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ही व्यथा मांडली. त्यांनी दखल घेतल्याने पोलीस दल सक्रीय झाले आणि ठेकेदाराला अटक झाली. प्रत्येक शेतकºयाला बैलजोडी ४० हजार रुपये त्याने परत केले. पाटील यांच्या सक्रीयतेचे कौतुक आहेच, पण पोलीस स्टेशनने सुरुवातीलाच दखल घेतली असती तर शेतकºयांना हेलपाटे आणि मानसिक त्रास झाला नसता. शेतकºयाच्या असहायतेचा फायदा असा सर्वत्र घेतला जात असतो, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा दिसून आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव