शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

ज्येष्ठांच्या सांभाळासाठी नवे पाऊल; कायदेशीर आधार लाभण्याचा मार्ग मोकळा? 

By किरण अग्रवाल | Updated: February 25, 2021 08:41 IST

senior citizens : बालपण देगा देवा असे नेहमी म्हटले जाते; परंतु म्हातारपण कोणालाही नको असते; कारण त्यात यातना कठीण असतात. शारीरिकदृष्ट्या गात्रे थकलेली असतातच, शिवाय मानसिकदृष्ट्याही व्यक्ती खचलेली असते.

- किरण अग्रवाल

कुटुंब पद्धतीत दिवसेंदिवस वाढत असलेली विभक्तता व घरातील तरुणांचा शहराकडे जाण्याचा ओढा, यासारख्या अनेक कारणांतून ज्येष्ठांच्या वाट्याला एकाकीपण येऊ पाहत असून, अनेकांच्या तर उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. यातून ज्येष्ठांचा सांभाळ, हा जटिल प्रश्न बनला असून, त्यासाठी वारसाहक्काने संपत्तीत अधिकार सांगणाऱ्या मुला-मुलींप्रमाणेच सून व जावयालादेखील पाल्याच्या व्याख्येत आणून त्यांच्याकडून ज्येष्ठांना निर्वाह भक्ता मिळवण्याची तरतूद असलेला नवा कायदा संसदेपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. यासंबंधीच्या समस्येला सामोरे जावे लागत असलेल्या ज्येष्ठांना याद्वारे हक्काचा आणखी एक कायदेशीर आधार लाभण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आहे.

बालपण देगा देवा असे नेहमी म्हटले जाते; परंतु म्हातारपण कोणालाही नको असते; कारण त्यात यातना कठीण असतात. शारीरिकदृष्ट्या गात्रे थकलेली असतातच, शिवाय मानसिकदृष्ट्याही व्यक्ती खचलेली असते. अशावेळी आधाराचा हात हवा असतो, परंतु हल्लीची सामाजिक व कौटुंबिक स्थिती अशी काही होऊन बसली आहे की प्रत्येक घरातल्या ज्येष्ठांना असा हात मिळतोच असे नाही. आयुष्यभर स्वतःच्या मर्जीने वागलेली व जगलेली व्यक्ती जेव्हा परावलंबी बनते तेव्हा त्यातून होणारी घुसमट असह्य असते. ती सहनही होत नाही व कोणाला सांगताही येत नाही. ज्येष्ठांचे कल्याण व त्यांच्या आधारासाठी सामाजिक न्याय विभागाने अनेक योजना आणलेल्या आहेत. पाल्यांकडून ज्येष्ठांना निर्वाह खर्च मिळवण्याची कायद्यात तरतूद असली किंवा त्यांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना दंड व तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही असली तरी त्यावाटेने कुणालाही जावेसे वाटत नाही, कारण कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठेचे दडपण यात असते. म्हातारपण नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ येते ती त्याचमुळे. वेगळ्या संदर्भाने एकीकडे जुने ते सोने म्हणायचे आणि दुसरीकडे घरातील वडीलधाऱ्या मार्गदर्शक मंडळींच्या बाबत मात्र उपेक्षेची स्थिती आढळावी, हे आश्चर्यकारक असले तरी बहुतांशी प्रमाणात खरे वा वास्तव आहे. का ओढवते घरातील ज्येष्ठावर अशी वेळ, हा चिंतनाचा विषय असून, समाज धुरिणांनीही याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे बनले आहे.

कुटुंब पद्धतीत वाढत असलेली विभक्तता, हा या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसतो. पूर्वी कॉमन फॅमिलीत घरातील सदस्यांची संख्या अधिक असे. त्यात ज्येष्ठांचा वेळही निघून जाई व त्यांची काळजीही घेतली जाण्याची सोय आपसूक होई; परंतु आता मुळातच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील सदस्यांची संख्या कमी होत चालली आहे. शिवाय घरातील शिकल्या-सवरलेल्या तरुणांचा नोकरी उद्योगासाठी शहरात जाण्याचा ओढा असल्यामुळे घरातील ज्येष्ठांच्या वाट्याला एकाकीपण येते. कधीतरी हवापालटासाठी ज्येष्ठ मंडळी शहरात आली तरी त्यांचे मन तेथे रमत नाही व ते पुन्हा ‘चलो गाव की ओर’ म्हणत गावाकडे परततांना दिसून येतात. पूर्वी नातवंडांना आईबाबांपेक्षा आजी-आजोबा अधिक मैत्रीचे ठरत. ते त्यांना राजा-राणीच्या परिकथा सांगत; खेळायला नेत. आता ही स्थितीही बदलली आहे. हल्लीच्या नातवंडांना पोकेमॉन व डोरेमॉन हवा असतो. आजोबांबरोबर फिरायला जाण्यापेक्षा टीव्हीचा रिमोट घेऊन किंवा मोबाइलमध्ये डोके घालून बसणे त्यांना अधिक आवडते, तेव्हा त्याहीदृष्टीने घरातील ज्येष्ठ मंडळी एकाकी पडलेली दिसते. ना कोणी त्यांच्याशी बोलणारे, ना कोणी खेळणारे. हे एकाकीपणच ज्येष्ठांना अधिक सलणारे व बोचणारे ठरते व त्यातून त्यांची घुसमट अधिक वाढते.

महत्त्वाचे म्हणजे, अनेक कुटुंबात ज्येष्ठांचा मानसन्मान व आब राखून त्यांची सेवा केली जात असताना, भरले घर असूनही ज्यांच्या नशिबी वृद्धाश्रम येते त्यांची मानसिक अवस्था मात्र चिंतनीय ठरते. पण परिस्थिती व नशिबाला दोष देत संबंधितांकडून दिवस काढले जातात. खरे तर ही अवस्था संस्कार व संवेदनेशी निगडित आहे, परंतु धावपळीच्या झालेल्या जगरहाटीत संवेदनांना आता मोल उरले कुठे? जिथे रक्ताच्या मुलांकडूनच काहींच्या वाट्याला उपेक्षा येते तिथे इतरांकडून काय अपेक्षा करणार? पण शासनाने आता पाल्याची किंवा अपत्त्याची व्याख्या विस्तारत त्यात मुला-मुलींसोबतच सून व जावयाचा समावेश करण्याचेही ठरवले असून, त्यांना घरातील ज्येष्ठांना निर्वाह खर्च देणे जबाबदारीचे केले जाणार आहे. संसदेच्या स्थायी समितीने यासंबंधीच्या नवीन विधेयकाला मंजुरी दिली असून, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर विधेयक मांडले जाणार आहे. अर्थात ज्येष्ठांची काळजी वाहण्यासाठी कायदे अनेक असले व त्यात आणखी भर पडणार असली तरी शेवटी त्या वाटेला जातो कोण? तेव्हा या नवीन कायद्याने ज्येष्ठांना आधाराचा आणखी एक हात लाभेल अशी आशा असली तरी, तशी वेळच कोणावर येऊ नये म्हणजे झाले.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकCourtन्यायालय