शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशचे नवे शिलेदार

By admin | Updated: July 30, 2016 05:40 IST

नाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर गिरीशभाऊंच्या मदतीला डॉ.भामरे (बाबा), जयकुमार रावल व गुलाबराव पाटील (दोन्ही भाऊ) यांना लाल दिवा मिळाला. त्यांच्या हाती आता खान्देशचे भविष्य आहे.

- मिलिंद कुलकर्णीनाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर गिरीशभाऊंच्या मदतीला डॉ.भामरे (बाबा), जयकुमार रावल व गुलाबराव पाटील (दोन्ही भाऊ) यांना लाल दिवा मिळाला. त्यांच्या हाती आता खान्देशचे भविष्य आहे.एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यानंतर खान्देशात राजकीय पातळीवर अस्वस्थता होती. खान्देशचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘सर्वपक्षीय पॅनल’चा फॉर्म्युला वापरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रभावशाली नेत्यांना त्यांनी सत्तेत वाटा दिला. महत्त्वपूर्ण शासकीय खाती असल्याने सर्वपक्षीय मंडळी कामासाठी त्यांच्याकडे येत असत. १६०० कोटी रुपयांच्या रस्ता कामांचे भूमिपूजन, शासकीय कृषी महाविद्यालय, धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील बंद उपसा सिंचन योजनांचे पुनरुज्जीवन हे आणि इतर महत्त्वपूर्ण निर्णय झाले. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर खान्देश विकासाचे हे गाडे अडेल काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने एकाच्या बदल्यात तीन मंत्रिपदे देऊन ‘आपत्ती व्यवस्थापन’ साधलं आहे.उत्तर महाराष्ट्राला केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व नव्हतं. धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांना संरक्षण राज्यमंत्रिपद देऊन शत-प्रतिशत खासदार निवडून देणाऱ्या या भागाला न्याय दिला आहे. यासोबतच दहा वर्षांपासून ‘लाल दिव्या’पासून दूर असलेल्या धुळे जिल्ह्याला जयकुमार रावल यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद दिले. खडसे यांचे कट्टर विरोधक असलेल्या गुलाबराव पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुखांनी राज्यमंत्रिपद दिले आहे. गिरीश महाजन यांच्यासोबत आता राज्य मंत्रिमंडळात दोन सहकारी सहभागी झाले आहेत.रावल यांच्याकडे रोजगार हमी योजना व पर्यटन, गुलाबरावांकडे सहकार खाते देण्यात आले तर महाजनांकडे जलसंपदासोबत वैद्यकीय शिक्षण खाते सोपविण्यात आले. खडसे यांच्या अनुपस्थितीत या तिघा ‘भाऊं’नी आता एकत्रितपणे विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. रोहयो, पर्यटन, जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि सहकार या महत्त्वपूर्ण खात्यांमार्फत खान्देशात ठोस कामे होतील, अशी अपेक्षा आहे. डॉ.भामरे यांच्यामुळे भुसावळच्या आयुध निर्माणी कारखान्याच्या विस्तारीकरण व क्षमता वाढीच्या दृष्टीने प्रयत्न अपेक्षित आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातून खान्देशावरील अन्याय आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात भाजपा श्रेष्ठींना यश आले आहे.खडसे यांना दाऊद फोन कॉल आणि गजानन पाटील प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याने खडसे समर्थकांमध्ये आनंदाची लाट पसरली. मात्र भोसरी प्रकरणी उद्योगमंत्र्यांनी विधिमंडळात केलेल्या विधानाने खडसेंची अडचण वाढू शकते. निवृत्त न्या.झोटिंग समितीच्या अहवालानंतर खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खडसे यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणातून त्यांचा मुख्यमंत्री व श्रेष्ठींवरील राग स्पष्ट दिसून आला. भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या इतर मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले मुख्यमंत्री व इतर सहकारी मंत्री हे खडसे यांच्या पाठीशी उभे राहिले नसल्याबद्दल खडसे समर्थक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. याचाच परिणाम म्हणून अंजली दमानिया, प्रीती मेनन आणि हॅकर मनीष भंगाळे यांच्याविरुद्ध खडसे समर्थकांनी १२-१५ तालुका न्यायालयांमध्ये बदनामीचे खटले दाखल केले आहेत.भाजपापुढे खरे आव्हान पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे आहे. खडसे आणि समर्थकांची नाराजी जिल्हा मेळाव्यात उघडपणे व्यक्त झाली असताना या निवडणुकांची तयारी करायची केव्हा आणि कुणाच्या बळावर हा श्रेष्ठींपुढे प्रश्न आहे. महाजन यांना जिल्ह्यात संपूर्ण ताकद लावावी लागणार आहे. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर गुलाबराव आणि शिवसेनेचा भाजपावरील राग कमी झाल्याचे दिसून येत आहे.