शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नवा साक्षात्कार

By admin | Updated: September 3, 2016 05:55 IST

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेपुरते अस्तित्व राखून असलेले माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेपुरते अस्तित्व राखून असलेले माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा निर्णय घेताना त्यांना झालेला साक्षात्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही चकीत करणारा असाच आहे. देशमुख यांच्या शिंदखेडा मतदारसंघात विद्यमान पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. शितावरुन भाताची परीक्षा करीत देशमुख यांना काँग्रेसच्या विभाजनामुळे भाजपाचा फायदा झाला आणि भाजपा सत्तेत आली असा साक्षात्कार झाला. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या देशमुखांनी आणखी पुढे जाऊन राष्ट्रवादीचे आयुष्य आणखी पाच-सात वर्षे एवढेच आहे, तेव्हां शरद पवारांसह संपूर्ण पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे असा सल्लादेखील दिला आहे. १६ वर्षांपूर्वी काँग्रेस सोडलेल्या देशमुख यांना काँग्रेसमध्ये धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, समान न्याय ही तत्वे अजून कायम असल्याचे पाहून आनंद झाला. रोज होणारे मेळावे, पत्रकार परिषदा यातून देशमुख यांनी त्यांच्या पक्षांतराला तात्विक मुलामा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेस सोडताना वाईट वाटले, तसेच राष्ट्रवादी सोडतानाही दु:ख झाले. शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्याशी बोलूनच पक्ष सोडत आहे. कार्यकर्त्यांनी सोबत यावे अशी सक्ती नाही, असे ते वारंवार सांगत आहेत. देशमुख यांच्या भूमिकेला कार्यकर्ते व जनता कसा प्रतिसाद देते, ते भविष्यात कळेल. परंतु देशमुख यांच्या पक्षांतराशी अलीकडच्या काही घटनांचा संदर्भ आहे. देशमुख यांचे कट्टर प्रतिस्पर्धी जयकुमार रावल यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित होताच त्यांनी रावलांविरुध्दची जुनी प्रकरणे काढून आरोप केले. रावलांना मंत्रिपद मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. तरीही रावल मंत्री झाल्यावर विधिमंडळ अधिवेशनात त्यांना व सरकारला अडचणीत आणण्यासाठी पुराव्याची पोतडी राष्ट्रवादी नेत्यांकडे सोपवली. परंतु स्वकीय आमदारांनी दाद न दिल्याने ते काँग्रेसकडे गेले व काँग्रेस आमदारांनी विधिमंडळात आवाज उठविला. स्वकीयांनी मदत न केल्याची नाराजी त्यांनी उघड बोलून दाखवली. दुसरे कारण म्हणजे, दोंडाईचातील बाजार समिती व नगरपालिका निवडणूक लक्षात घेता धुळे जिल्ह्यात प्रबळ असलेल्या काँग्रेस पक्षाचा हात धरणे देशमुख यांना राजकीय सोयीचे असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला असून हा साधासरळ हिशेब आहे.