शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

नथुरामविरुद्ध नवा लढा

By admin | Updated: January 31, 2017 04:57 IST

महात्मा गांधींच्या हत्त्येचे समर्थन करीत माथेफिरू नथुराम गोडसेच्या पापावर पांघरुण घालणाऱ्या ‘हे राम... नथुराम’ या नाटकावर नागपूरकरांनी घातलेला बहिष्कार हा नथुरामभक्तांनी समजावा

- गजानन जानभोरपरवा नागपूरकरांनी ‘हे राम... नथुराम’कडे फिरवलेली पाठ गांधींनीच सांगितलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने नेणारी आहे. महात्मा गांधींच्या हत्त्येचे समर्थन करीत माथेफिरू नथुराम गोडसेच्या पापावर पांघरुण घालणाऱ्या ‘हे राम... नथुराम’ या नाटकावर नागपूरकरांनी घातलेला बहिष्कार हा नथुरामभक्तांनी समजावा असा अहिंसक धडा आहे. शरद पोंक्षे नावाचा हा कलावंत (?) नथुरामच्या नावावर नाटके करून त्या माथेफिरूच्या क्रूरपणाचे उदात्तीकरण करीत असतो आणि त्याचे सगे-सोयरे महात्म्याच्या हत्त्येचा असुरी आनंद उपभोगत असतात. गांधीजींची हत्त्या हा जसा एका पूर्वनियोजित आणि प्रदीर्घ कटाचा भाग होता तसेच या नाटकाच्या निर्मितीमागे एक भयानक षड्यंत्र दडलेले आहे. गांधींच्या हत्त्येची असत्य आणि देशभक्तिपर कारणे समाजमनावर घट्टपणे बिंबवणे, त्यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्यलढ्याची आठवण पुसून काढणे, ही विखारी मानसिकता त्यामागे आहे. या नाटकाला होणारी गर्दी आणि तेवढाच होत असलेला प्रखर विरोध नथुरामी उन्माद वाढविण्यास कारणीभूत ठरीत आहे. पण परवा नागपूरकरांनी ‘हे राम... नथुराम’कडे फिरवलेली पाठ गांधींनीच सांगितलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने नेणारी आहे.नथुराम गोडसे हा या देशाचा व हिंदूंचाही प्रतिनिधी नाही. त्याच्याएवढी हिंदूंची व भारताची बदनामी आजवर कुणीही केलेली नाही. पोंक्षेसारखी माणसे ही गोडसेच्या कलेच्या क्षेत्रातील अस्तित्वाचे व उपजीविकेचे प्रतीक आहेत. सामान्य माणसाला ‘नथुराम’ या शब्दाचीही घृणा वाटते. कुठलेही आई-वडील आपल्या मुलाचे नाव नथुराम ठेवत नाहीत. नथुराम भक्तांच्या कुटुंबातही त्याचे नाव ऐकायला मिळत नाही. कारण, महात्मा गांधी हा भारतीयांच्या लोकजीवनाचा भाग आहे. पोंक्षेंच्या नाटकातील नथुरामच्या तोंडी घातलेले संवाद विखारी आहेत. गोळ्या घालूनही हा महात्मा मेला नाही, याचे वैफल्य म्हणजेच हे नाटक होय. सामान्य माणूस रोजच गांधींचा जयघोष करीत नाही, आपण त्याचे कट्टर अनुयायी असल्याचेही तो सांगत नाही. पण, त्याने गांधींना कधीचेच स्वीकारले असते, म्हणूनच कुठल्यातरी कारणाने गांधी सावलीसारखा त्याच्यासोबत असतो. गांधींची हत्त्या करण्यामागे नथुरामची एक उदात्त भूमिका होती, असे पोंक्षे सांगतात. त्या भूमिकेतूनच त्याने गांधींना मारले, असाही त्यांचा दावा आहे. पोंक्षे सांगत असलेली गोडसेची ही भूमिका योग्य असती तर तिला समाजमान्यता कधीचीच मिळाली असती. परंतु गांधी हत्त्येच्या ७० वर्षांनंतरही कलाकृतीच्या कुबड्या घेऊन खुनी द्वेषाचे वारंवार समर्थन का करावे लागत आहे, या प्रश्नाचे उत्तर पोंक्षेंकडे नाही. गांधींना मारल्यानंतरही गोडसेभक्तांना विखारी हिंदुत्व जनमानसात रुजवता आले नाही, हा देश बहुसंख्य हिंदूंचा असूनही हे हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? गांधी अजूनही मरत का नाही? गोडसेच्या वंशजांना हे वैफल्य सतत डाचत असते. या नैराश्यातूनच मग ते गोडसेला ‘महात्मा’ संबोधतात, त्याची जयंती-पुण्यतिथी साजरी करतात. एखाद्या हस्तकाला हाताशी धरून सुरुवातीला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ आणि त्यातून काही साध्य झाले नाही तर ‘हे राम... नथुराम’सारखे विकृत खेळही सुरू करतात. हा हाडकुळा म्हातारा देहरूपाने अस्तित्वात नसूनही नथुराम भक्तांना त्याची अशी सतत भीती वाटत असते. या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत असल्याने पोंक्षे आणि प्रवृत्ती चेकाळली आहे. एरवी पत्रकारांशी बोलत असतानाही पोंक्षेंमध्ये नथुराम संचारलेला असतो आणि त्यांची नजर गर्दीतल्या गांधीला शोधत असल्याचे सारखे जाणवत असते. प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने पोंक्षेंना नागपुरातील दुसऱ्या दिवशीचा प्रयोग रद्द करावा लागला, हे वास्तव आहे. हा देश गांधींचा आहे, गोडसेचा नाही, हा धडा पोंक्षेंनी आतातरी घ्यायला हवा. कलेच्या क्षेत्रातील या विकृतीविरुद्ध अंहिसक लढ्याचे नवे शस्त्र नागपूरकरांनी साऱ्यांना दिले आहे. गांधींनीच एकदा सांगितले होते, ‘एखादा राक्षस तुमच्या समोर उभा असेल तर हातात दगड किंवा बंदूक घेऊ नका, त्याच्याकडे पाठ फिरवा आणि दुर्लक्ष करा, तो आपोआप पराभूत होईल.’ नागपूरकरांनी नथुरामच्या प्रयोगाला पाठ दाखवून महात्म्याचाच मार्ग निवडला. यापुढे ‘नथुराम’चे विकृत प्रयोग जिथे होतील तिथे हा सत्याग्रह करून बघा. मग माथेफिरू नथुराम कायमचा फासावर लटकलेला दिसेल.