शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

नवा कोरोना, नवी आव्हाने; वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 07:02 IST

New corona virus : संचारबंदीपेक्षा आर्थिक व्यवहारांना प्राधान्य देण्याचे धोरण अमेरिकेने राबविले व त्याची मोठी किंमत आता तो देश चुकवीत आहे. युरोपने तसे केले नाही व लोकांच्या आरोग्याला अधिक महत्त्व देऊन आर्थिक व्यवहार मंदावले तरी चालेल, अशी भूमिका घेतली.

मागील वर्षाच्या सुरुवातीला चीनने जगाची झोप उडवली, नवे वर्ष उंबरठ्यावर असताना ब्रिटनने रात्रीची मौज बंद केली. लस टोचण्याची घटिका समीप आली असतानाच ब्रिटनमधील कोरोनाच्या भाऊबंदाने स्वतःचे रूप बदलले आणि दुप्पट वेगाने आपले अस्तित्व विस्तारण्यास सुरुवात केली. ‘बी ११.७’ असे शात्रीय नामकरण झालेला हा कोरोनाबंधू स्वतःला वेगाने पसरवितो इतकेच माहीत झाले आहे. तो किती घातक आहे, हे अद्याप कळलेले नाही. ज्या विषाणूचा प्रसार वेगाने होतो; तो फारसा घातक नसतो, असे मानले जात असले तरी तशी खात्री देता येत नाही. नव्या कोरोनाची संसर्ग क्षमता अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढणार.  रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर आरोग्य सेवेवरील ताण वाढेल. आरोग्य सेवा नीट मिळाली नाही की, जनतेचा रोष होईल. ही साखळी तोडायची असेल तर ब्रिटनमधील कोरोनाला आपल्या देशात मज्जाव करणे, हाच एक मार्ग उरतो. जगातील बहुतेक प्रमुख देशांनी हाच मार्ग अनुसरून ब्रिटनबरोबरचे हवाई संबंध तोडले. संचारबंदीपेक्षा आर्थिक व्यवहारांना प्राधान्य देण्याचे धोरण अमेरिकेने राबविले व त्याची मोठी किंमत आता तो देश चुकवीत आहे. युरोपने तसे केले नाही व लोकांच्या आरोग्याला अधिक महत्त्व देऊन आर्थिक व्यवहार मंदावले तरी चालेल, अशी भूमिका घेतली.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची भूमिका साधारण तशीच आहे. मात्र, एक महत्त्वाचा फरकही आहे. नव्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी ब्रिटनमधील विमाने थांबविणे, तेथून आलेल्यांना क्वारंटाईन करणे हे उपाय समजू शकतात. युरोपने ते  योजले; पण युरोपप्रमाणे संसर्गग्रस्त भागात लॉकडाऊन न करता फक्त रात्रीच्या संचारबंदीसारखे कामचलाऊ उपाय योजण्यातून ठाकरे सरकार काय साधणार हे तज्ज्ञांना कळत नाही. महाराष्ट्रातील शहरांमध्ये दिवसा जनजीवन नेहमीच्या गर्दीने सुरू असताना फक्त रात्री संचारबंदी लादून संसर्ग रोखला जाईल, असे समजणे शास्त्राला धरून नाही. दिवसा अमेरिकेसारखे वागायचे व रात्री युरोपचा मार्ग धरायचा, असे विचित्र धोरण राबविले जात आहे. यापेक्षा ३१ डिसेंबरच्या आधीचे दोन दिवस उत्सवी कार्यक्रमांवर बंदी घातली असती तर त्याचा जास्त फायदा झाला असता.  ‘संचारबंदी’ हा शब्द आला की लोकांमधील धास्ती वाढते. धास्तीच्या सावटातून बाहेर पडणारा समाज पुन्हा स्वतःला आक्रसून घेतो. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर होतो. आर्थिक व्यवहार आक्रसणे हे युरोपला परवडू शकते, भारतासारख्या गरीब देशाला नाही.

सुदैवाने या साथीचा फटका मनुष्यहानीचा विचार करता भारताला फारच कमी बसला. मात्र, आर्थिक किंमत मोठी मोजावी लागली. तो खड्डा भरून काढण्यासाठी समाज सरसावत असताना संचारबंदीसारख्या शब्दांमुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडते. ‘नियंत्रणाबाहेर गेलेला कोरोना’ (आऊट ऑफ कंट्रोल) असा आततायी शब्दप्रयोग ब्रिटनच्या एका मंत्र्यांनी केल्यानंतर तेथे हडकंप माजला. हे विधान संसर्गाच्या वेगाशी संबंधित होते, मृत्यूसंख्येशी नव्हे. जग भीतीच्या सावटाखाली असताना प्रत्येक शब्द महत्त्वाचा ठरतो याचे भान ब्रिटनसह सर्व राज्यकर्त्यांनी ठेवायला हवे. नव्या कोरोनामुळे नवी आव्हाने समोर ठाकली आहेत. नवे विषाणू येतील, जुने विषाणू स्वतःमध्ये बदल करतील, अशा वेळी सातत्याने संशोधन करीत नवी औषधे वेगाने शोधावी लागतील. संशोधनावर खर्च करावा लागेल. त्याचबरोबर साथरोगांमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांची फळी उभी करावी लागेल. वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढवावी लागेल. तेथील अभ्यासक्रम बदलावे लागतील. जिल्हा पातळीवरील आरोग्यसेवा मजबूत करावी लागेल.

नव्या साथींमधील जटीलता लक्षात घेऊन तसे वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागेल. यासाठी वेळ लागेल व अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हे अब्जावधी रुपये उभे करण्यासाठी उद्योगविश्व गतिमान करणे आणि खासगी गुंतवणूकदारांना आरोग्यसेवेत आणणे याशिवाय दुसरा मार्ग नाही. एकट्या सरकारला हा भार पेलणारा नाही. सध्याच्या शेतकरी आंदोलनाच्या काळात भांडवलदार, उद्योगपती हे सामाजिक शत्रू अशी बाष्कळ मांडणी करून टीआरपी मिळविला जात आहे; पण उद्योग क्षेत्र गतिमान झाल्याशिवाय आरोग्य, शिक्षण, पौष्टिक अन्नासाठी लागणारा पैसा उभा करता येत नाही, हे भान सर्वांनी ठेवायची गरज आहे. परिस्थितीनुसार बदलण्याची जी अक्कल कोरोनाला आहे, ती आपणही वापरली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या