शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

चेस लीग’च्या रूपाने भारतीय बुद्धिबळाच्या डावात नवी रंगत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:35 IST

ही स्पर्धा ऑनलाइन खेळली जात होती.

पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीनं झालेल्या चेस आॅलिम्पियाडमध्ये भारतानं सुवर्णपदक मिळवलं. भारताचं हे पहिलंच सांघिक सुवर्णपदक. तब्बल १६३ देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि रशियाच्या बरोबरीनं भारताला या स्पर्धेत संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.

१९८३चा क्रिकेट विश्वचषक भारतानं जिंकल्यानंतर क्रिकेट आणि एकूणच भारतीय क्रीडाक्षेत्रावर त्याचा जो सकारात्मक परिणाम झाला, तोच परिणाम किमान बुद्धिबळाच्या क्षेत्रात तरी यानिमित्तानं दिसावा अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त केली जात आहे. यापूर्वी विश्वनाथन आनंदनं तब्बल पाच वेळा बुद्धिबळाचं विश्वविजेतेपद मिळवलं असलं तरी जागतिक पातळीवर सांघिक विजेतेपदापासून भारत बराच दूर होता. यंदाच्या विजयानं त्या कोऱ्या पाटीवर पहिल्यांदाच आपलं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल.

कोरोनामुळे पहिल्यांदाच भरवलेलं आॅनलाइन आॅलिम्पियाड, नाशिकचा युवा खेळाडू विदित गुजराथीला पहिल्यांदाच देण्यात आलेलं कर्णधारपद आणि भारताचा पहिलाच सांघिक विजय, असं अनेक अर्थांनी या पहिलेपणाचं महत्त्व खूप मोठं असलं तरी या घटनेत भविष्याची अनेक बिजं पेरलेली दिसतात. या स्पर्धेत भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद खेळत असतानाही कर्णधारपद युवा खेळाडू विदित गुजराथीकडे देण्यात आलं. भारतीय बुद्धिबळ महासंघ हा निर्णय घेऊ शकला कारण, विश्वनाथन आनंदने या निर्णयाला उमदेपणाने दिलेला पाठिंबा!

ही स्पर्धा आॅनलाइन खेळली जात होती. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे अनेक देशांतल्या अनेक खेळाडूंना अडचणी आल्या. भारतालाही त्याचा मोठा फटका बसला; पण विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या स्पर्धेला आॅनलाइन प्रेक्षकांचाही खूप मोठा पाठिंबा होता. तब्बल साठ ते ऐंशी हजार चाहते ही स्पर्धा एकाचवेळी आॅनलाइन पाहात होते. या खेळाप्रति लोकांचं वाढत असलेलं आकर्षण ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे.

ख्यातनाम उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ही स्पर्धा अतिशय उत्सुकतेने पाहिली. ‘ही स्पर्धा आॅनलाइन पाहतानाही इतकी उत्कंठावर्धक असू शकेल याची आपल्याला कल्पना नव्हती’, असं ट्विट तर आनंद महिंद्रा यांनी केलंच; पण चेस लीग सुरू करण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दाखवली. भारतात चेस लीग जर सुरू झाली आणि त्यामागे आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीचा पुढाकार असला, तर खचितच भारतीय बुद्धिबळाला खºया अर्थाने सुगीचे दिवस येऊ शकतील.

ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांचंही तेच म्हणणं आहे.. ‘नाशिकमध्ये विदित गुजराथीसारखा आंतरराष्टÑीय पातळीवरचा मोठा युवा खेळाडू आहे, आनंद महिंद्रा यांचं नाशिकसाठीचं योगदानही मोठं आहे. या दोघांच्या पुढाकारानं ‘चेस लीग’ सुरू झाली, तर बुद्धिबळासाठी ती मोठी गोष्ट ठरेल. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत.’

लीग स्पर्धांमुळे खेळाला किती मोठी भरारी मिळते, हे क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन यांसारख्या खेळांत दिसून आलं आहे. महाराष्टÑात काही वर्षांपूर्वी ‘एमसीएल’ (महाराष्टÑ चेस लीग) खेळवली जात होती; पण आपापसातल्या भांडणांमुळे ती बंद पडली. सुमारे चार वर्षे ही लीग सुरू होती. २०१६मध्ये ती बंद पडली. असं आता होऊ नये.

काही वर्षांपासून भारतीय क्रीडा मंत्रालय बुद्धिबळाकडे सापत्नभावाने पाहत आहे. विश्वनाथन आनंद यानंही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. गेली सात वर्षं कोणत्याही बुद्धिबळ खेळाडूला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला नाही, तर गेल्या चौदा वर्षात बुद्धिबळासाठी द्रोणाचार्य पुरस्कारही देण्यात आलेला नाही.

२०१३ मध्ये अभिजित गुप्ताला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. द्रोणाचार्य पुरस्कार तर आतापर्यंत केवळ दोनच बुद्धिबळ खेळाडूंना देण्यात आला आहे. रघुनंदन गोखले (१९८४) आणि कोनेरू अशोक (२००६) हे दोघेच आतापर्यंत द्रोणाचार्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेत चीन, रशियासारखे अनेक तगडे प्रतिस्पर्धी होते. रशियाच्या खेळाडूंचं गुणांकन तर भरतीय खेळाडूंपेक्षा खूपच सरस होतं. तरीही भारतानं चेस आॅलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवलं. या विजयाचं चिज करणं आता क्रीडा मंत्रालयासह संघटना, खेळाडू आणि चाहते या साऱ्यांच्या हातात आहे.