शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नवा ‘भागवतधर्म’!

By admin | Updated: December 18, 2015 02:59 IST

भाजपाने किंवा खरे तर नरेन्द्र मोदी यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जो सपाटून मार खाल्ला त्याची कारणे शोधण्याचे अभियान अजून सुरु आहे. मोदींच्या विरोधात

भाजपाने किंवा खरे तर नरेन्द्र मोदी यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जो सपाटून मार खाल्ला त्याची कारणे शोधण्याचे अभियान अजून सुरु आहे. मोदींच्या विरोधात त्या राज्यातील साऱ्या राजकीय शक्ती एकवटल्या आणि या शक्तींनी त्यांच्या हक्काची मते परस्परातच कशी वाटली जातील व भाजपाला कसे त्यापासून वंचित ठेवले जाईल याची पुरेपूर दक्षता घेतली असा एक सर्वसाधारण निष्कर्ष फार आधीच काढून झाला आहे. तरीदेखील या पराभवाचा कापूस पिंजण्याचे काम अजून सुरुच आहे. खुद्द भाजपानेही सवयीप्रमाणे या पराभवावर चिंतन केले असणार आणि त्यांनाही नेमके कारण गवसले नसणार. पण त्यांच्या कुजबुज मंचामध्ये मात्र पराभवाचे खापर रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर दबक्या आवाजात का होईना फोडले जाते आहे. बिहार निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असतानाच भागवतांनी जातीधारित आरक्षणाची समीक्षा करण्याचा मुद्दा मांडला. मुद्दा कसला, तो एक बॉम्बच ठरला. त्यांच्या या विधानाच्या आधारे भाजपा आणि संघ परिवार आता जातीधारित आरक्षण मोडीत काढणार असा वेगाचा प्रचार त्या राज्यात सुरु झाला आणि लालूप्रसाद यादव यांनी अत्यंत यशस्वीपणे राज्यातील मागासवर्गीयांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण केले. भागवतांनी केलेल्या विधानापायी होत असलेले नुकसान सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न खुद्द संघातल्या काहींनी तर भाजपाच्या बहुतक साऱ्यांनी करुन पाहिला. पण त्याचा काहीही लाभ झाला नाही. बिहार राज्य पादाक्रांत करण्याचा मोदींचा मनसुबा धुळीला मिळाला. त्यानंतर आता इतक्या दिवसानंतर मोहन भागवत यांना पुन्हा उपरती झाली असून त्यांनी जातीधारित आरक्षणाचे खुल्या दिलाने समर्थन केले आहे. संघाची राष्ट्रीय राजधानी असलेल्या नागपुरात झालेल्या एका जाहीर समारंभात बोलताना ते म्हण्राले की जोवर समाजात जातीभेद कायम आहे, तोवर आरक्षणनीती सुरुच राहिली पाहिजे. तिच्यात बदल करण्याच्या किंवा आरक्षण मोडीत काढण्याच्या विरोधातलीच संघाची भूमिका आहे. त्यांच्या या ताज्या उद्गाारांवर मोदी-शाह यांची प्रतिक्रिया काय असेल?