शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नवा शैक्षणिक वाद

By admin | Updated: January 4, 2017 04:29 IST

देशभरातील आधुनिक वैद्यकीय अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांमधील अध्यापन आणि अन्य सुविधा यांच्याबाबत प्रचंड असमानता असल्याने तेथून एमबीबीएसची पदवी घेऊन

देशभरातील आधुनिक वैद्यकीय अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांमधील अध्यापन आणि अन्य सुविधा यांच्याबाबत प्रचंड असमानता असल्याने तेथून एमबीबीएसची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांच्या गुणवत्तेतही बराच फरक पडत असल्याची चर्चा दीर्घकाळ देशभर होत आली आहे. पण त्या बाबतीत फारसे असे काही आजवर होऊ शकले नाही. परंतु आता किमान वैद्यकीय विद्या शाखेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देताना सर्व विद्यार्थी समान गुणवत्तेचे असावेत म्हणून केन्द्र सरकारने संसदेत जे सुधारणा विधेयक सादर केले आहे, त्याने एका मोठ्या वादाला आमंत्रण दिले आहे. या विधेयकाच्या मसुद्याला संसदेने मंजुरी दिली असली तरी त्यावर नागरिकांच्या सूचना आणि तक्रारी सरकारने पाचारण केल्या आहेत. सदर विधेयकातील दोन्ही प्रमुख सुधारणांना डॉक्टर्स आणि सध्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक यांचा कडवा विरोध आहे. यातील एक सुधारणा ‘एक्झीट’च्या संदर्भातली आहे. एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या आणि पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या साऱ्यांना ही परीक्षा अनिवार्य करण्यात येणार आहे. मुळात साडेपाच वर्षांच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जात असताना पुन्हा ही परीक्षा कशासाठी, असा आक्षेप सुधारणांना विरोध करणाऱ्या दोन्ही गटांनी नोंदविला आहे. अर्थात दावा म्हणून हा युक्तिवाद बिनतोड असला तरी मूळ शैक्षणिक दर्जातच असमानता असल्याचा आणि गुणवत्ता तपासणी प्रक्रियेतच घोटाळे होत असल्याचा मुख्य आक्षेप असल्याचे येथे लक्षात घ्यावे लागेल. दुसरा आक्षेप आहे तो सरकारी डॉक्टर्ससाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याबाबतचा. मुळातच पदवी स्तरापासून विशिष्ट वर्गांसाठी पन्नास टक्क््यांचे आरक्षण आहे व उर्वरित जाागांमध्ये पन्नास टक्के म्हणजे एक्झीट दिल्यानंतरदेखील ुजे सरकारी डॉक्टर नाहीत त्यांच्यासाठी केवळ २५ टक्के जागाच उपलब्ध राहाणार आहेत. याचा अर्थ ज्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचेच आहे, त्यांचा प्रतीक्षा काळ बराच लांबवला जाऊ शकेल आणि त्यातून कदाचित वैद्यकीय विद्या शाखेकडेच तरुण वर्ग पाठ फिरवील अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. ही भीती निराधार असल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचबरोबर एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काही काळ शासकीय सेवा करण्याची अनिवार्यता टाळणारे आणि अनिवार्य म्हणून का होईना ती करणारे अथवा आपणहून सरकारी सेवेला आपलेसे करणारे यांच्यात भेद करणे व तो करताना शासकीय सेवा म्हणजेच गरजवंतांची सेवा करणारे यांच्यात फरक करुन दुसऱ्या श्रेणीतील डॉक्टरांना झुकते माप देणे सामाजिक न्यायाचा विचार करता योग्यच ठरते.