शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा माळीण कधीच नको

By admin | Updated: June 29, 2017 00:55 IST

माळीण गाव रात्रीच्या अंधारात गाडले जाणे हा नियतीचा आघात होता. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर दु:खाचा डोंगर शब्दश: कोसळला होता.

माळीण गाव रात्रीच्या अंधारात गाडले जाणे हा नियतीचा आघात होता. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर दु:खाचा डोंगर शब्दश: कोसळला होता. माळीणमध्ये डोंगराच्या कुशीत नांदणाऱ्या ४४ कुटुंबातील १५१ जीव त्या एका रात्रीने गिळले होते. त्या दु:खाने सावरतानाच किती मोठा काळ गेला. अनेकांच्या कुटुंबातील सारेच्या सारे सदस्य त्या काळरात्री चिखलाच्या ढिगाऱ्यात गाडले गेले होते. कुणाचे छत्र हरपले होते, तर कुणाच्या चिमुकल्या जीवांचा श्वास त्यात गुदमरला होता. अनेकांचे सर्वस्व घरासह नष्ट झाले होते. या दु:खातून माळीण सावरावे म्हणून अनेकांचे मदतीचे हात पुढे झाले. प्रशासनानेही कंबर कसून मदत केली. नवे माळीण उभारण्याची घोषणाही झाली. प्रत्येकाला नवे घर मिळणार या आशेवर माळीणवासीय पत्र्याच्या घरात राहायलाही तयार झाले. जिआॅलॉजिकल सर्व्हे, भूगर्भाचा अभ्यास करून नव्या माळीणची जागा निश्चिती झाली. त्या जागी चांगली घरे बांधून व्हावीत यासाठी प्रशासनानेही प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे थाटात उद्घाटनही झाले आणि नव्या माळीणमधल्या नव्या घरात लोक राहायलाही गेले. परंतु २४ जुलैची रात्र पुन्हा एकदा माळीणची काळरात्र आठवून देणारी ठरली आणि पुन्हा एकदा माळीणवासीयांच्या अंगावर काटा आला. मुसळधार पाऊस झाला. त्याने भराव वाहून आला, रस्ते खचले, पोल वाकले, शाळेच्या भिंतींना तडे गेले. हे सारे चित्र पाहून माळीणवासीय हादरून गेले आहेत. तीन वर्ष थांबल्यानंतर जेव्हा अभ्यासपूर्णरीतीने घरांसाठी जागा निवडली जाते तेव्हा तिथे पुन्हा अशाच प्रकाराची चाहूल लागणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे हे निश्चित. जिल्हाधिकारी खुद्द माळीणमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहणी करून आले. निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही हे खरे पण दु:खातून एकदा सावरलेल्या लोकांना पुन्हा एकदा तशाच अनुभवाच्या जवळ जावे लागणे योग्य नाही. त्यामुळे नव्या गाव उभारणीच्या संपूर्ण निर्मितीप्रक्रियेत कुणाकडून कोणत्याही प्रकारची कुचराई अगर दिरंगाई झालेली असेल तर मात्र प्रशासकीय पातळीवर त्याची निरपेक्ष व तत्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच संबंधितांवर कारवाईदेखील होणे आवश्यक आहे. दु:खाचाही बाजार कुणी करू पाहात असतील तर त्यांच्यावर अंकुश हवाच!