शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा माळीण कधीच नको

By admin | Updated: June 29, 2017 00:55 IST

माळीण गाव रात्रीच्या अंधारात गाडले जाणे हा नियतीचा आघात होता. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर दु:खाचा डोंगर शब्दश: कोसळला होता.

माळीण गाव रात्रीच्या अंधारात गाडले जाणे हा नियतीचा आघात होता. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर दु:खाचा डोंगर शब्दश: कोसळला होता. माळीणमध्ये डोंगराच्या कुशीत नांदणाऱ्या ४४ कुटुंबातील १५१ जीव त्या एका रात्रीने गिळले होते. त्या दु:खाने सावरतानाच किती मोठा काळ गेला. अनेकांच्या कुटुंबातील सारेच्या सारे सदस्य त्या काळरात्री चिखलाच्या ढिगाऱ्यात गाडले गेले होते. कुणाचे छत्र हरपले होते, तर कुणाच्या चिमुकल्या जीवांचा श्वास त्यात गुदमरला होता. अनेकांचे सर्वस्व घरासह नष्ट झाले होते. या दु:खातून माळीण सावरावे म्हणून अनेकांचे मदतीचे हात पुढे झाले. प्रशासनानेही कंबर कसून मदत केली. नवे माळीण उभारण्याची घोषणाही झाली. प्रत्येकाला नवे घर मिळणार या आशेवर माळीणवासीय पत्र्याच्या घरात राहायलाही तयार झाले. जिआॅलॉजिकल सर्व्हे, भूगर्भाचा अभ्यास करून नव्या माळीणची जागा निश्चिती झाली. त्या जागी चांगली घरे बांधून व्हावीत यासाठी प्रशासनानेही प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे थाटात उद्घाटनही झाले आणि नव्या माळीणमधल्या नव्या घरात लोक राहायलाही गेले. परंतु २४ जुलैची रात्र पुन्हा एकदा माळीणची काळरात्र आठवून देणारी ठरली आणि पुन्हा एकदा माळीणवासीयांच्या अंगावर काटा आला. मुसळधार पाऊस झाला. त्याने भराव वाहून आला, रस्ते खचले, पोल वाकले, शाळेच्या भिंतींना तडे गेले. हे सारे चित्र पाहून माळीणवासीय हादरून गेले आहेत. तीन वर्ष थांबल्यानंतर जेव्हा अभ्यासपूर्णरीतीने घरांसाठी जागा निवडली जाते तेव्हा तिथे पुन्हा अशाच प्रकाराची चाहूल लागणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे हे निश्चित. जिल्हाधिकारी खुद्द माळीणमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहणी करून आले. निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही हे खरे पण दु:खातून एकदा सावरलेल्या लोकांना पुन्हा एकदा तशाच अनुभवाच्या जवळ जावे लागणे योग्य नाही. त्यामुळे नव्या गाव उभारणीच्या संपूर्ण निर्मितीप्रक्रियेत कुणाकडून कोणत्याही प्रकारची कुचराई अगर दिरंगाई झालेली असेल तर मात्र प्रशासकीय पातळीवर त्याची निरपेक्ष व तत्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच संबंधितांवर कारवाईदेखील होणे आवश्यक आहे. दु:खाचाही बाजार कुणी करू पाहात असतील तर त्यांच्यावर अंकुश हवाच!